शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल

By admin | Updated: October 3, 2016 02:57 IST

जिल्ह्यातील ८८.९६ टक्के काम पुर्ण झाले असून ८६९ पैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. 0२- पंचायतराज बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केले असून ग्रामीण भागाचा उद्धार जास्तीत जास्त प्रमाणात कसा केला जाईल, या उद्देशाने या अभियानांतर्गत काम करण्यात येते. या अभियानांतर्गत अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून ८६९ ग्राम पंचायतींपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.ग्रामीण प्रशासन आणि सामाजिक, आर्थिक विकास पंचायत महत्त्वाची भूमिका १९५0 पासून ओळखली गेली आहे. पंचायतच्या योजनांचा लाभ लोकांना पोहोचवण्याची खात्री करणे शासनाला महत्त्वाचे वाटते. म्हणून पंचायत बळकट करण्यासाठीची गरज, समाजकल्याण आणि समाविष्ट कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येतो. याबाबत ग्रामपंचायतीयच्या कामाचे मूल्यमापन ऑनलाइन भरण्यात येते. या कामात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याचे प्रथम स्थान मिळविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ८६९ ग्रामपंचायतीपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १२१0 ग्राम पंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.८0 आहे. अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी फक्त ९ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.६६ आहे. वाशिम जिल्ह्यातील ६ तालुक्या तील ४९३ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी ३ आहे. तर अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत येणार्‍या ८४३ ग्रामपंचायतीं पैकी फक्त १0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्यांची टक्केवारी १.१८ आहे.ऑनलाइन ग्रामपंचायतींमुळे कामाला गतीअमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांची माहिती त्वरित वरिष्ठांकडे पाठविण्याच्या कामाला गती आली आहे. या माध्यमातून कामकाजात येणार्‍या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येत असून खर्‍या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यात डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.