शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

पंचायतराज सशक्तीकरण अभियानात बुलडाणा अव्वल

By admin | Updated: October 3, 2016 02:57 IST

जिल्ह्यातील ८८.९६ टक्के काम पुर्ण झाले असून ८६९ पैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.

हर्षनंदन वाघ बुलडाणा, दि. 0२- पंचायतराज बळकटीकरणासाठी केंद्र शासनाने पंचायत सशक्तीकरण अभियान सुरू केले असून ग्रामीण भागाचा उद्धार जास्तीत जास्त प्रमाणात कसा केला जाईल, या उद्देशाने या अभियानांतर्गत काम करण्यात येते. या अभियानांतर्गत अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याने अव्वल स्थान प्राप्त केले असून ८६९ ग्राम पंचायतींपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत.ग्रामीण प्रशासन आणि सामाजिक, आर्थिक विकास पंचायत महत्त्वाची भूमिका १९५0 पासून ओळखली गेली आहे. पंचायतच्या योजनांचा लाभ लोकांना पोहोचवण्याची खात्री करणे शासनाला महत्त्वाचे वाटते. म्हणून पंचायत बळकट करण्यासाठीची गरज, समाजकल्याण आणि समाविष्ट कार्यक्रमांवर झालेल्या खर्चाचा आढावा घेण्यात येतो. याबाबत ग्रामपंचायतीयच्या कामाचे मूल्यमापन ऑनलाइन भरण्यात येते. या कामात अमरावती विभागात बुलडाणा जिल्ह्याचे प्रथम स्थान मिळविले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील १३ तालुक्यातील ८६९ ग्रामपंचायतीपैकी ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्यातील १६ तालुक्यातील १२१0 ग्राम पंचायतींपैकी ३४ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.८0 आहे. अकोला जिल्ह्यातील ७ तालुक्यातील ५४२ ग्रामपंचायतींपैकी फक्त ९ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी २.६६ आहे. वाशिम जिल्ह्यातील ६ तालुक्या तील ४९३ ग्रामपंचायतींपैकी १५ ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्याची टक्केवारी ३ आहे. तर अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यांतर्गत येणार्‍या ८४३ ग्रामपंचायतीं पैकी फक्त १0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्या असून त्यांची टक्केवारी १.१८ आहे.ऑनलाइन ग्रामपंचायतींमुळे कामाला गतीअमरावती विभागातील बुलडाणा जिल्ह्यातील ८६0 ग्रामपंचायती ऑनलाइन झाल्यामुळे ग्रामीण भागातील विकास कामांची माहिती त्वरित वरिष्ठांकडे पाठविण्याच्या कामाला गती आली आहे. या माध्यमातून कामकाजात येणार्‍या अडचणी सोडविण्यावर भर देण्यात येत असून खर्‍या अर्थाने बुलडाणा जिल्ह्यात डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण झाले आहे.