शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

बुलडाणा जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा कहर!

By admin | Updated: May 11, 2017 07:10 IST

दोघांचा मृत्यू, तर बारा रुग्ण पॉझिटिव्ह : प्रशासन झटकतेय हात!

विवेक चांदूरकर बुलडाणा : एक महिन्यापासून जिल्ह्यात स्वाइन फ्लूच्या आजाराने कहर केला असून, दोघांचा मृत्यू, तर पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. या व्यतिरिक्तही जिल्ह्यात स्वाइन फ्लूचे रुग्ण असून, त्यांचे नमुनेच पाठविण्यात आले नसल्यामुळे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे प्रशासन मात्र हात झटकत असून, स्वाइन फ्लूचे रुग्णच नसल्याचा दावा करीत आहे. जिल्ह्यात एक महिन्यापासून स्वाइन फ्लूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. बुलडाणा शहरातील एका खाजगी रुग्णालयात ताप व सर्दी झालेले काही रुग्ण दाखल झाले होते. त्यांचे नमुने पुणे येथे तपासल्यानंतर पाच जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे निष्पन्न झाले. या रुग्णांपैकी मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील प्रदीप निनाजी नारखेडे यांचा मृत्यू झाला. तसेच बुलडाण्यातील केशवनगरातील ठेकेदार मोहम्मद अफजल मो. नजीर यांचा औरंगाबाद येथे स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराने एमआयटी हॉस्पिटल औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. यासोबतच सविता संजय चोपडे, राहुल चव्हाण यासह बारा जणांना या भीषण आजाराची लागण झाली आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये स्वाइन फ्लूच्या आजाराचे रुग्ण आहेत. मात्र, त्यांचे नमुने तपासण्यात आले नसून, काही नमुने घेण्यातही टाळाटाळ करण्यात येत आहे. त्यामुळे स्वाइन फ्लूने बाधित रुग्णांचा आकडा समोर येत नाही. जिल्ह्यातील काही रुग्ण हे अकोला व औरंगाबाद येथील रुग्णालयात दाखल आहेत. त्यांना स्वाइन फ्लू झाला असून, त्यांची आकडेवारीही समोर येत नाही.           स्वाइन फ्लू आहे की नाही, हे तपासण्याकरिता नमुने पुण्याला व्हायसॉलॉजी लॅबमध्ये पाठविण्यात येतात. सदर नमुने पाठविण्याकरिता खासगी डॉक्टरांना जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क करावा लागतो. त्यानंतर शासकीय रुग्णालयातून एक किट मिळत असून, या किटमध्येच रुग्णांचे नमुने पुण्याला पाठविण्यात येतात. या किचकट प्रक्रियेमुळे अनेक डॉक्टर रुग्णांचे नमुने पाठविण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे आणखी काही रुग्णांना स्वाइन फ्लू असला, तरी त्याचे निदान होत नसल्याचे वास्तव आहे. माझ्या रुग्णालयात काही रुग्ण सर्दी व ताप असल्यामुळे दाखल झाले होते. मी त्यांचे नमुने पुण्याला स्वाइन फ्लूच्या तपासणीसाठी पाठविले. यामध्ये पाच रुग्णांना स्वाइन फ्लू झाल्याचे पुण्याहून आलेल्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. तसेच नारखेडे यांचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. नागरिकांनी रेल्वे स्थानक, बसस्थानकासारख्या ठिकाणी जाणे टाळण्याची गरज असून, स्वाइन फ्लू आजार होणार नाही, यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. - डॉ. दीपक लद्धड, बुलडाणा.