शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर

By विवेक चांदुरकर | Updated: May 20, 2024 16:57 IST

आदिवासी ग्राम वसाली येथील घटना : आगीत अन्नधान्य, कपडे, रोकड, कागदपत्रांसह इतर साहित्य भस्मसात 

संग्रामपूर : तालुक्यातील आदिवासी ग्राम वसाली येथे सोमवारी सकाळी ११:३० वा. दरम्यान अचानक घराला आग लागल्यामुळे घरासह साहित्य जळून खाक झाल्याने कुटुंब रस्त्यावर आले आहे. १६ लाख ७८ हजार रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. वसाली येथील तेजलीबाई गणेश मोरे कुटुंबासह शेतात गेल्या असता त्यांच्या घराला अचानक आग लागली. यामध्ये घरासह इतर सर्व साहित्य भस्मसात झाले. घरी कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही. या आगीत सागाचे ४९ खांब, १० क्विंटल गहू, १० क्विंटल ज्वारी, ५ क्विंटल मका, १ क्विंटल भुईमूग, १ क्विंटल तूरडाळ, ५० किलो मूगडाळ, ५० किलो उडीदडाळ, २० किलो हरभरा असे धान्य जळून नष्ट झाले. 

तसेच, अंथरून, कपड्यांसह २ लाख ३० हजारांची रोकड, अडीच किलो चांदी, ८० हजारांचे सोन्याचे दागिने, त्याचप्रमाणे अत्यावश्यक कागदपत्रे यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, मुला- मुलींच्या शाळेतील कागदपत्रे, घरातील एलईडी टी.व्ही., लॅपटॉप, मोबाइल, शिलाई मशीन, २ कूलर, दिवान, कपाट, पलंगाची राख रांगोळी झाली आहे. घराला आग कशाने लागली हे स्पष्ट झाले नाही. अन्नधान्यासह इतर साहित्य जळून खाक झाल्याने मोरे कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. मंडळ अधिकारी राजू चामलाटे, ग्रामसेवक बी. पी. धोंडगे, तलाठी एस. ए. गाडे, सोनाळा तलाठी डी. एच. जाधव यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अहवाल तहसील कार्यालयात सादर केला. शासनस्तरावरून या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदतीची मागणी करण्यात येत आहे. आग लागली तेव्हा संपूर्ण कुटुंब शेतात होतेतेजलीबाई गणेश मोरे यांना १४ वर्षीय बादल नामक एक मुलगा आहे. तर अंजली (वय १२ वर्षे), आरुषी गणेश मोरे (वय १० वर्षे), अमृता (वय ८ वर्षे) अशा ३ मुली आहेत. सकाळी त्या मुला -मुलींसह शेतात गेले असता अचानक त्यांच्या घराला आग लागली. त्यामुळे कुटुंब बेघर झाले असून त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाfireआग