शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
2
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
3
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
4
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
5
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
6
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
7
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
8
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
9
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
10
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
11
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
12
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
13
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
14
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
15
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
16
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
17
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
18
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला
19
"गाव सोडणार नाही, गरज पडल्यास सैन्यासोबत उभे राहू"; पंजाबपासून काश्मीरपर्यंत एकच निर्धार
20
देशावर युद्धाचं सावट, जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्याचा साठा किती? केंद्र सरकारने दिली महत्त्वपूर्ण माहिती

बुलडाणा जिल्ह्यात ६६.६१ टक्के मतदान

By admin | Updated: February 17, 2017 01:39 IST

८७४ उमेदवारांचे भाग्य सीलबंद; जिल्हा परिषदेसाठी मतदान शांततेत.

बुलडाणा, दि. १६-जिल्हा परिषदेच्या ६0 गटासाठी व पंचायत समित्यांच्या १२0 जागांसाठी १ हजार ६९१ मतदान केंद्रांवर १६ फेब्रुवारी रोजी सरासरी ६६.६१ टक्के मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ३१७, तर पंचायत समितीच्या ५५७ उमेदवारांचे भाग्य सीलबंद झाले असून, २३ फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. गुरुवारी सकाळपासूनच मतदारांनी मतदान केंद्रांवर गर्दी केली. सकाळी पहिल्या टप्प्यात ९.३0 वाजेपर्यंत ७.६९ टक्के मतदान झाले. त्यानंतर ११.३0 वाजेपर्यंत १९.३0 टक्के, तर १.३0 वाजेपर्यंत ३४.१४ टक्के मतदान झाले. दुपारी ३.३0 पर्यंत ४९.३२ टक्के मतदान झाले. मेहकर तालुक्यातील डोमरूळ येथे सकाळी मतदान केंद्रावरील ईव्हीएम बंद पडल्याने एक ते दीड तास मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागले. तसेच सुलतानपूर येथे ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार अपक्ष उमेदवार आशाताई झोरे यांनी केल्यामुळे सदर ईव्हीएम सील करण्यात आली. मेहकर तालुक्यातील मोळा व जवळा येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला. मतदान सर्वत्र शांततेत पार पडले असून, कुठेही आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मतदानाकरिता ६ हजार ७६४ कर्मचार्‍यांनी आपले कर्तव्य बजावले. संग्रामपूर तालुक्यातील वसाडी येथील मतदान केंद्रावर ईव्हीएम बंद पडल्याने काही काळ मतदान बंद होते. अध्र्या तासात मशीन दुरुस्त करण्यात आली. तसेच खामगाव तालुक्यातील घाटपुरी मतदान केंद्रावर बॅलेट युनिटमधील एका उमेदवाराच्या चिन्हाचे बटण दबत नसल्याने काही काळ गोंधळ उडाला; मात्र लगेच हे बॅलेट युनिट बदलवण्यात येऊन मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. घाटाखालील सहा तालुक्यांत सरासरी ५0 ते ६५ टक्के मतदान झाले. दुपारी १२ वाजेपर्यंत ३0 ते ३५ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांचा ओघ वाढत जाऊन सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ६५ टक्के मतदान झाले. घाटाखालील खामगाव, शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर आणि नांदुरा या तालुक्यांमध्ये मतदान शांततेत पार पडले. या सहा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या २५, तर पंचायत समितीच्या ५0 जागांसाठी ६४७ केंद्रांवर मतदान झाले. यामध्ये खामगाव तालुक्यात जि. प. च्या सात जागा, तर पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. मलकापूर तालुक्यात जि.प.च्या तीन, तर पंचायत समितीच्या सहा जागा आहेत. नांदुरा तालुक्यात जि. प. च्या चार, तर पंचायत समितीच्या आठ, शेगाव तालुक्यामध्ये जि.प.च्या तीन, तर पंचायत समितीच्या सहा जागा, संग्रामपूर तालुक्यात जि.प.च्या चार, तर पंचायत समितीच्या आठ जागेसाठी आणि जळगाव जामोद तालुक्यात जि.प. च्या चार व पंचायत समितीच्या आठ जागांसाठी मतदान झाले. खामगाव तालुका ६९.३३ टक्के, शेगाव ७१.४0 टक्के, संग्रामपूर ४७ टक्के, जळगाव जामोद ७५ टक्के मतदान झाले.जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांचे दौरे जिल्हाधिकारी विजय झाडे व पोलीस अधीक्षक संजीवकुमार बावीस्कर यांनी नांदुरा, मलकापूर व खामगाव येथे जाऊन मतदान कशाप्रकारे सुरू आहे, याची पाहणी केली. तसेच बंदोबस्ताचा आढावा घेतला.