शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

बुलडाणा जिल्हा गारठला; पिकांवर हवामानाचा दुहेरी परिणाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 23:49 IST

बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर  किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देगव्हाला पोषक; तर तूर, हरभरा धोक्यात!

ब्रह्मनंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  जिल्ह्याच्या सरासरी रब्बी क्षेत्रापैकी ९५ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. दरम्यान,  बुलडाणा जिल्ह्यात दोन दिवसांपासून  हवामानात बदल झाला असून, वाढती थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा पिकांवर  किडीच्या प्रादुर्भावाचा धोका वाढला आहे. त्यामुळे रब्बी पिकांवर थंडी व ढगाळ हवामानाचा  दुहेरी परिणाम जाणवत आहे.  जिल्ह्यात १ लाख ३४ हजार १९४ हेक्टर क्षेत्रापैकी १ लाख २७ हजार ९0७ हेक्टर क्षेत्रावर  रब्बीची पेरणी झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झालेली आहे.  त्यात गहू पिकाचे क्षेत्र १५ हजार ५00 हेक्टर व हरभरा पिकाचे क्षेत्र ९१ हजार १३६ हेक्टर  आहे. सध्या गहू व हरभरा पीक चांगले बहरले असून,  तूरही शेंगांनी लदबदली आहे. दरम्यान,  जिल्ह्यात होत असलेल्या वातावरणातील बदलांचा परिणाम पिकांवर जाणवत आहे.  सध्या  थंडीचे प्रमाण वाढल्याने  ही थंडी गहू पिकासाठी अत्यंत फायद्याची ठरत आहे. गहू पिकास रात्री  थंड आणि दिवसा कोरडे हवामान मानवते. गहू पिकाच्या चांगल्या उत्पन्नासाठी गव्हाला जास्तीत  जास्त थंडी मिळणे आवश्यक असते; परंतु रब्बी हवामानाच्या दिवसांमध्ये जिल्ह्यात दरवर्षी  थंडीचा कालावधी पाहिजे तेवढय़ा प्रमाणात जाणवत नाही. तसेच रात्रीच्या तापमानातसुद्धा बरीच  तफावत आढळून येते. पीकवाढीच्या काळात अचानक तापमानात वाढ झाली तर पीक लवकर  फुलावर येते व पर्यायाने उत्पन्नात घट होते. सध्या गहू पिकाला जवळपास १५ दिवस झाले असून,  पाणी देण्याच्या दोन पाळ्या झाल्या आहेत. आता जिल्ह्यात वाढलेली थंडी गहू पिकासाठी पोषक  ठरत आहे. यामुळे गहू पीक वाढण्यास मदत होते. वाढत्या थंडीमुळे गहू उत्पादकांना दिलासा  मिळाला आहे; मात्र थंडीसोबतच जिल्ह्यात ढगाळ वातावरणही निर्माण झाल्याने तूर व हरभरा  िपकावर किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. 

२0 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान उपयुक्त गहू पीक वाढीसाठी सुरुवातीच्या काळात १0 ते २0 अंश सेल्सिअस पर्यंतचे तापमान उपयुक्त ठर ते. सध्या जिल्ह्यात २0 ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहत आहे. त्यामुळे या तापमानात  गहू बियाण्याची उगवण चांगली होत आहे; तसेच बागायती क्षेत्रावर आतापर्यंत झालेल्या गहू  पेरणीला थंडीचा जास्तीत जास्त लाभ मिळत आहे; मात्र डिसेंबर महिन्याच्या १५ तारखेनंतर  उशिरा किंवा अति उशिरा पेरणी केली असता, उत्पन्नात घट येऊ शकते. उशिरा पेरणी केलेल्या  गहू पिकास थंड हवामानाचा कालावधी फारच कमी मिळतो, त्यामुळे फुटव्यांची व ओंबीतील  दाण्यांची संख्या कमी होऊन उत्पन्नात घट येते.

तूर, हरभर्‍याचे नुकसान ढगाळ वातावरणामुळे तूर व हरभरा पिकावर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. तुरीचे पीक सध्या  शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, त्यावर शेंगा पोखरणार्‍या अळीने हल्ला केला आहे, तर हरभरा  पिकावरसुद्धा घाटे अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. ढगाळ वातावरणात किडीचा प्रादुर्भाव  नियंत्रणात ठेवणे शेतकर्‍यांसाठी अवघड झाले आहे. त्यामुळे तूर, हरभर पिकाचे नुकसान होत  आहे. 

बदलत्या हवामानाचा पिकांवर परिणाम होत आहे. थंडी सुटल्याने गहू पिकासाठी पोषण वातावरण  निर्माण झाले आहे; मात्र थंडीबरोबरच ढगाळ वातावरणही असल्याने तूर व हरभरा पिकावर  किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. तेव्हा पिकांवरील कीड नियंत्रणासाठी वेळीच उ पाययोजना कराव्या.- डॉ. सी.पी.जायभाये,शास्त्रज्ञ, कृषी संशोधक केंद्र, बुलडाणा.

टॅग्स :agricultureशेती