शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

डिजिटल साक्षरतेत बुलडाणा जिल्हा माघारला!

By admin | Updated: February 19, 2016 01:33 IST

शासनाद्वारे रजिस्ट्रेशन बंद; त्यामुळे अनेकांना फटका, अभियानावर प्रश्नचिन्ह.

गिरीश राऊत / खामगावपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाला डिजिटल साक्षर करण्यासाठी राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (दिशा) सुरू केले आहे. या अभियान अंतर्गत पहिल्या टप्प्यात देशातील ५४ लाख नागरिकांना डिजिटल साक्षर करण्याचे लक्ष्य असून, राज्याला ६0 हजार नागरिकांना साक्षर करण्याचे लक्ष्य आहे; मात्र यासाठी नोंदणीमध्ये असमानता दिसून येत असून, यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यातील नोंदणी १0 हजाराच्या वर तर काही जिल्ह्यांतील नोंदणी ३ ते ४ हजारावरच थांबली आहे. आता वेबसाईट बंद झाल्याने याचा फटका बुलडाणा जिल्ह्यातील नागरिकांना बसत असून, जिल्ह्यात आतापर्यंंंत फक्त ४ हजार ९७७ नागरिकांचीच या प्रशिक्षणासाठी नोंदणी झाली आहे.                                 डिजिटल साक्षर अंतर्गत देशातील प्रत्येक नागरिकांना संगणक साक्षर करण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. यासाठी देशातील १८७२ सहयोगी कंपनीद्वारे ४८ लाख ८४ हजार ८७ नागरिकांची नोंदणी करण्यात आली आहे. यापैकी ३६ लाख ४१ हजार २३७ नागरिक डिजिटल साक्षर झाले असून, यापैकी १४ लाख ३५ हजार ४८६ जणांना डिजिटल साक्षरतेबाबत प्रमाणपत्रसुद्धा देण्यात आले आहेत. महाराष्ट्र राज्यासाठी या पहिल्या टप्प्यात फक्त ६0 हजार नागरिकांना साक्षरतेचे लक्ष्य देण्यात आले होते. यामधून २५ लाख लोकसंख्या असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील केवळ ४ हजार ९७७ नागरिकांची नोंदणी झाली असून, नोंदणी होणारी वेबसाईट बंद झाली आहे. यामुळे या अभियानाच्या सफलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्वस्त धान्य दुकानदार अशा एकूण ५२.५ नागरिकांना दोन टप्प्यात प्रशिक्षित केल्या जाणार आहे. पहिल्या टप्प्यात १0 लाख लाभार्थिंना या योजनेंतर्गत प्रशिक्षित केल्या जात आहे. यामध्ये ६.३ लाख लाभार्थिंना १ स्तराचे प्रशिक्षणासाठी तर २.७ लाख लाभार्थिंना स्तर २ चे तर ९ लाख लाभार्थिंना शासनाकडून प्रशिक्षण शुल्क सहायतेसाठी पात्र ठरविण्यात आले आहे, तर १ लाख लाभार्थिंना उद्योजक व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षित केल्या जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यात ४२.५ लाख नागरिकांना प्रशिक्षित केल्या जाणार आहे.