शहरं
Join us  
Trending Stories
1
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
2
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
3
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले...
4
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
5
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
6
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
7
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
8
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
9
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
10
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
11
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
12
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी
13
तेल, टॅरिफ अन् S-400..; डोनाल्ड ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर अजित डोवाल रशियात दाखल
14
शाळेच्या गेटमधून आत शिरली, अचानक चक्कर येऊन कोसळली; सहावीतील विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू
15
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
16
दुसरा श्रावण गुरुवार: १० मिनिटांत होणारे प्रभावी ‘गुरुस्तोत्र’ म्हणा; दत्तगुरूंची कृपा मिळवा
17
डोळ्यांवर काकडी ठेवल्याने खरंच रिलॅक्स वाटतं की फक्त ब्यूटी ट्रेंड? सत्य समजल्यावर वाटेल आश्चर्य
18
शेतकऱ्यांसाठी १ दिवस मुंबई बंदचा आवाज उठवावा; 'शिवतीर्थ'वर बच्चू कडूंनी घेतली राज ठाकरेंची भेट
19
अपेक्षाभंग! RBI च्या निर्णयानंतर बाजार गडगडला; २.१३ लाख कोटींचा फटका! 'या' क्षेत्रात सर्वाधिक घसरण
20
...अन् धूर्त कोल्होबानं क्रिकेटच्या पंढरीतील Live मॅच थांबवली, नेमकं काय घडलं?

Buldhana: "चित्ता पूनर्वसन प्रकल्प पाच वर्षात यशस्वी होईल, संरक्षण क्षेत्रातही १ लाख करोड रुपयांचे उत्पादन" - भूपेंद्र यादव

By निलेश जोशी | Updated: June 9, 2023 20:23 IST

Buldhana: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला.

- नीलेश जोशीबुलढाणा: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला. सोबतच गेल्या नऊ वर्षात देश आत्मनिर्भर होत असून एकट्या संरक्षण क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांचे उत्पादन भारत करत आहे. त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही मिळाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मोदी ॲट नाईन’ या उपक्रमातंर्गत बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते आले होते. त्यावेळी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. भारतात आफ्रिका खंडातून चिते आणल्यानंतर त्यांचा मृत्यू होत आहे. हा मुद्दा घेऊन त्यांना विचारणा केली असता उपरोक्त वक्तव्य त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, माजी आ. चैनसुख संचेती, श्वेता महाले, भाजपा नेते योगेंद्र गोडे, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यावेळी उपस्थित होते.

गेल्या नऊ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तीन मुद्द्यांना धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकार काम करत आहे. कोरोना काळात २०० कोटी नागरिकांचे लसिकरण ही एक मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रासह आर्थिक क्षेत्रातही मोठे काम या नऊ वर्षात झाले असून आज इंग्लन्डपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली असल्याचे ते म्हणाले. साडेतीन कोटी नागरिकांना या नऊ वर्षात निवास उपलब्ध करून दिल्याचेही ते म्हणाले. शेवटच्या व्यक्तीला लाभ देण्याचे निर्धारित लक्ष्य गाठतांनाच तेही वेळेत तो लाभ मिळावा यासाठीच ९ वर्ष आम्ही कार्यरत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारची पावले योग्य दिशेनेमहाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे यांचे सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून विकासाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात आज इतिहासाची तरोडमरोड केल्या जात असून त्यातून असामाजिक तत्वांना उभारी देण्याचे काम येथील विरोधी पक्ष व काँग्रेस करत असल्याचा आरोपही यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा