शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Buldhana: "चित्ता पूनर्वसन प्रकल्प पाच वर्षात यशस्वी होईल, संरक्षण क्षेत्रातही १ लाख करोड रुपयांचे उत्पादन" - भूपेंद्र यादव

By निलेश जोशी | Updated: June 9, 2023 20:23 IST

Buldhana: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला.

- नीलेश जोशीबुलढाणा: देशाने यापूर्वी पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने टायगर प्रोजेक्टसह अन्य काही प्रोजेक्ट उत्कृष्टपणे यशस्वी केले आहेत. चित्यांचे पूनर्वसन हा प्रकल्पही आगमी पाच वर्षाच यशस्वी होईल, असा विश्वास केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी बुलढाणा येथे व्यक्त केला. सोबतच गेल्या नऊ वर्षात देश आत्मनिर्भर होत असून एकट्या संरक्षण क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांचे उत्पादन भारत करत आहे. त्यातून रोजगाराच्या मोठ्या संधीही मिळाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘मोदी ॲट नाईन’ या उपक्रमातंर्गत बुलढाणा जिल्ह्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर ते आले होते. त्यावेळी बुलढाणा येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली. भारतात आफ्रिका खंडातून चिते आणल्यानंतर त्यांचा मृत्यू होत आहे. हा मुद्दा घेऊन त्यांना विचारणा केली असता उपरोक्त वक्तव्य त्यांनी केले. यावेळी माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ. संजय कुटे, ॲड. आकाश फुंडकर, माजी आ. चैनसुख संचेती, श्वेता महाले, भाजपा नेते योगेंद्र गोडे, लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे आणि शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यावेळी उपस्थित होते.

गेल्या नऊ वर्षात सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण या तीन मुद्द्यांना धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात केंद्र सरकार काम करत आहे. कोरोना काळात २०० कोटी नागरिकांचे लसिकरण ही एक मोठी उपलब्धी असल्याचे ते म्हणाले. कृषी क्षेत्रासह आर्थिक क्षेत्रातही मोठे काम या नऊ वर्षात झाले असून आज इंग्लन्डपेक्षाही भारताची अर्थव्यवस्था मोठी झाली असल्याचे ते म्हणाले. साडेतीन कोटी नागरिकांना या नऊ वर्षात निवास उपलब्ध करून दिल्याचेही ते म्हणाले. शेवटच्या व्यक्तीला लाभ देण्याचे निर्धारित लक्ष्य गाठतांनाच तेही वेळेत तो लाभ मिळावा यासाठीच ९ वर्ष आम्ही कार्यरत होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्र सरकारची पावले योग्य दिशेनेमहाराष्ट्रातील फडणवीस-शिंदे यांचे सरकार योग्य दिशेने पावले उचलत असून विकासाचा वेग वाढला आहे. महाराष्ट्रात आज इतिहासाची तरोडमरोड केल्या जात असून त्यातून असामाजिक तत्वांना उभारी देण्याचे काम येथील विरोधी पक्ष व काँग्रेस करत असल्याचा आरोपही यावेळी बोलतांना केंद्रीय मंत्री भुपेंद्र यादव यांनी केला.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा