शहरं
Join us  
Trending Stories
1
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
2
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
3
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
4
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
5
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
6
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
7
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
8
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
9
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
10
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
11
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
12
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
13
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
14
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
15
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
16
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
17
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
18
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
19
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
20
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत

गरज ३ कोटींची, मिळाले ३३ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:42 IST

ब्रह्मानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये शिष्यवृत्ती आल्याने ११ हजार  विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्यवृत्ती रखडल्याने नवीन शिष्यवृत्तीचे अर्ज करावे की नाही, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.अस्वच्छ व्यवसायात काम करणाºया पालकांच्या ...

ठळक मुद्देअस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती रखडली!जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित.

ब्रह्मानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये शिष्यवृत्ती आल्याने ११ हजार  विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्यवृत्ती रखडल्याने नवीन शिष्यवृत्तीचे अर्ज करावे की नाही, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.अस्वच्छ व्यवसायात काम करणाºया पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलने, कातडी कमावणे व कागदाचा कचरा गोळा करणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना अनुज्ञेय आहे; परंतु जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे भिजत घोंगडे आहे.सन २०१५-१६ मध्ये अस्वच्छ व्यवसाय योजनेंतर्गतची शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये या योजनेंतर्गत ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले. या प्राप्त निधीतून सन २०१५-१६ मध्ये अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात ११ हजार लाभार्थी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने शिष्यवृत्तीच्या योजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सध्या शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, या अर्जाची मुदत ३१ आॅगस्ट आहे.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे ७ हजार विद्यार्थी वंचितमुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना निर्माण करण्यात आलेली आहे; परंतु या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांना वारंवार शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ७ हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.राज्यातील २८ लाख ९७ हजार विद्यार्थी वंचितराज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत; परंतु अनेक विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दहावीपूर्व शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे; परंतु त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होऊनही राज्यात जवळपास २८ लाख ९७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.  

अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे केवळ ३३ लाख रुपये प्राप्त झाल्याने त्याचा नियमानुसार लाभ देण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची बिले काढलेली आहेत. लवकरच ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. 

- मनोज मेरतजिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा