शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गरज ३ कोटींची, मिळाले ३३ लाख!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:42 IST

ब्रह्मानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये शिष्यवृत्ती आल्याने ११ हजार  विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्यवृत्ती रखडल्याने नवीन शिष्यवृत्तीचे अर्ज करावे की नाही, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.अस्वच्छ व्यवसायात काम करणाºया पालकांच्या ...

ठळक मुद्देअस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती रखडली!जिल्ह्यातील ११ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित.

ब्रह्मानंद जाधव।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मागणी केली होती; मात्र त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये शिष्यवृत्ती आल्याने ११ हजार  विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शिष्यवृत्ती रखडल्याने नवीन शिष्यवृत्तीचे अर्ज करावे की नाही, असा प्रश्न या विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाला आहे.अस्वच्छ व्यवसायात काम करणाºया पालकांच्या मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व त्यांना समाज प्रवाहात आणण्यासाठी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. अस्वच्छ व्यवसायात काम करणारे, अस्वच्छ व्यवसायाशी परंपरेने संबंधित सफाईगार, कातडी सोलने, कातडी कमावणे व कागदाचा कचरा गोळा करणे या व्यवसायात गुंतलेल्या व्यक्तींच्या पाल्यांना अनुज्ञेय आहे; परंतु जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे भिजत घोंगडे आहे.सन २०१५-१६ मध्ये अस्वच्छ व्यवसाय योजनेंतर्गतची शिष्यवृत्ती देण्यात आली नाही. त्यानंतर सन २०१६-१७ मध्ये या योजनेंतर्गत ३ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती; परंतु त्यासाठी केवळ ३३ लाख रुपये समाजकल्याण विभागाला प्राप्त झाले. या प्राप्त निधीतून सन २०१५-१६ मध्ये अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीच्या लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यात ११ हजार लाभार्थी अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाकडूनच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नसल्याने शिष्यवृत्तीच्या योजना कुचकामी ठरत आहेत. त्यामुळे सध्या शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, या अर्जाची मुदत ३१ आॅगस्ट आहे.सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचे ७ हजार विद्यार्थी वंचितमुलींचे प्राथमिक शाळेतील गळतीचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना निर्माण करण्यात आलेली आहे; परंतु या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विद्यार्थ्यांना वारंवार शिष्यवृत्तीची प्रतीक्षा करावी लागत आहे. जिल्ह्यातील ७ हजार विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे.राज्यातील २८ लाख ९७ हजार विद्यार्थी वंचितराज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृत्ती योजना सुरू आहेत; परंतु अनेक विद्यार्थ्यांना या योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे. अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना दहावीपूर्व शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे; परंतु त्यापैकी अनेक विद्यार्थ्यांना गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. केंद्र शासनाकडून अनुदान प्राप्त होऊनही राज्यात जवळपास २८ लाख ९७ हजार विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत.  

अस्वच्छ व्यवसाय शिष्यवृत्तीचे केवळ ३३ लाख रुपये प्राप्त झाल्याने त्याचा नियमानुसार लाभ देण्यात आला. तसेच सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती व मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्तीची बिले काढलेली आहेत. लवकरच ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा होईल. 

- मनोज मेरतजिल्हा समाज कल्याण अधिकारी, बुलडाणा