शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

बुलडाणा : अखेर नाफेडच्या तूर खरेदीस मुदतवाढ; शेतकर्‍यांना दिलासा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 23:31 IST

मलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहि ती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकम त’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. 

ठळक मुद्देजिल्हा मार्केटींग फेडरेशनने दिला दुजोरा ‘लोकमत’ने वेधले होते लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : नाफेडच्या तूर खरेदीस १५ मेपर्यंत मुदतवाढ मिळाल्याची माहिती आहे. जिल्हा मार्केटींग फेडरेशनने यास दुजोरा दिला आहे. आजपासूनच  तूर खरेदीची बंद पडलेली प्रक्रिया सुरू होणार असल्याने मलकापुरसह  जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे. ‘लोकमत’ने २२ एप्रिल रोजी शेतकर्‍यांच्या अडचणींवर लक्ष वेधणारे वृत्त प्रकाशित  केले आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, नाफेडच्यावतीने जिल्हा मार्केटींग  फेडरेशन व व्ही.सी.एम.एस.मार्फत तूर खरेदी करण्यात येते. त्यांच्या उ पलक्ष्य सब एजन्सी म्हणून तालुका खरेदी-विक्री संघ काम करते. या  हंगामातील शासनाची तूर खरेदी १८ एप्रिल रोजी बंद करण्यात आल्याने  हजारो शेतकरी हवालदिल झाले होते.मलकापूर तालुक्यातील सुमारे ५0 हजार क्विंटल तूर शेतकर्‍यांच्या घरातच  आहे. पेरण्या येऊन ठेपल्या असताना त्यांच्या तयारीसाठी पैशाची गरज अस ताना तूर खरेदी बंद झाली. त्यामुळे ३ हजारावर शेतकरी अडचणीत आले  होते. त्यावर लक्ष वेधणारे वृत्त ‘लोकमत’ ने २२ एप्रिल रोजी प्रकाशित  केले. २३ एप्रिल रोजी शासनाने तूर खरेदी प्रक्रियेला १५ मे पर्यंत मुदतवाढ  देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा मार्केट भंग अधिकारी पी.एस.शिंगणे यांनी या  माहितीस दुजोरा दिला व तशा सूचना जिल्हाभर देणार असल्याचे ‘लोकम त’शी बोलताना सांगितले. जिल्हा पणन व्यवस्थापक संदीप पेठकर यांनीही  त्याविषयी सकारात्मक बाजू घेऊन आमच्याकडे सूचना येतील, असे सांगि तले. त्यामुळे एकंदरीत परिस्थितीत मागील काळात बंद पडलेली शासनाची  तूर खरेदी सुरू होणार, या वृत्तानेच मलकापूरसह हजारो शेतकर्‍यांना  दिलासा मिळाला आहे; मात्र १५ मेपर्यंतची मुदतवाढ पुरेशी नसल्याने त्यात  आणखी कालावधी वाढवावा, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत  आहे.

तुरीचे चुकारेही तत्काळ द्या! बर्‍याच शेतकर्‍यांनी तूर विकली आहे; मात्र अद्याप त्यांना चुकारे मिळाले  नाहीत. शेतकरी सध्या आर्थिक संकटात सापडले असून, तत्काळ ही र क्कम अदा करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.  जेणेकरून आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना खरिपाची पेरणी  करण्यासाठी मदत होऊ शकेल. लोकप्रतिनिधींनीसुद्धा या प्रकाराचा पाठ पुरावा प्रशासनाकडे करणे गरजेचे झाले आहे. 

टॅग्स :Malegaonमालेगांवbuldhanaबुलडाणा