शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्के कमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:59 IST

सर्वत्र रिमझिम पाऊस, प्रकल्प कोरडेच!

हर्षनंदन वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागिल चार-पाच दिवसांपासून सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या  पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्यातील प्रकल्प मात्र कोरडे आहेत. मागिल वर्षीेपेक्षा यावर्षी जवळपास सरासरी २५ टक्के कमी पाऊस असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार थोड्या उशिरा का होईना, पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली; मात्र पिकांनी जमिनीबाहेर मान काढल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक परिसरातील पिके कोमेजली.  दरम्यान, दोन दिवस कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला,  तर अनेक शेतकºयांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर पुन्हा आॅगस्ट महिन्यात सुरुवातीला दडी मारल्याने  चांगल्या परिस्थितीत असलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. आता पुन्हा मागिल चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पुन्हा शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण पाहता भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सरासरी ७१२.७ मि.मी. आहे. मागिलवर्षी आज पर्यंत ५५५.४ मि.मी.  पाऊस झाला होता, तर यावर्षी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यावरून मागिल वर्षीपेक्षा यावर्षी सरासरी २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यात प्रकल्पात अल्प जलसाठा असून, भविष्यात तीव्र पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.आतापर्यंत सरासरी ४१९ मि.मी. पाऊसयावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सरासरी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला असून, रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २९.० मि.मी., चिखली १७.०, देऊळगाव राजा ४८.०, मेहकर १६.०,  लोणार ९०.०, सिंदखेड राजा ३९.६, मलकापूर ३२.०, नांदूरा ३६.०, मोताळा ४२.०, खामगाव ०४.२,  शेगाव २१.०, जळगाव जामोद ३७.०, संग्रामपूर तालुक्यात १०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.तब्बल ४५ दिवसांनंतर पावसाची हजेरीधाड : तब्बल ४५ दिवसानंतर बुलडाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत खरिपांच्या पिकांना जीवनदान दिले; मात्र या भागात प्रदीर्घ पावसाच्या उघडीपीचा सोयाबीन, मका, कपाशी या नगदी  पकांना ३० टक्के फटका बसला आहे. शेवटी प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार पाऊस २० आॅगस्ट रोजी सकाळी १० पर्यंत सुरूच होता. अगोदरचकर्जमाफीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये हैराण झालेल्या शेतकºयास दुष्काळी स्थितीने गलीतगात्र केले. शेतशिवारात पिके सुकून माना टाकताना दिसत होते.