शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्के कमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:59 IST

सर्वत्र रिमझिम पाऊस, प्रकल्प कोरडेच!

हर्षनंदन वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागिल चार-पाच दिवसांपासून सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या  पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्यातील प्रकल्प मात्र कोरडे आहेत. मागिल वर्षीेपेक्षा यावर्षी जवळपास सरासरी २५ टक्के कमी पाऊस असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार थोड्या उशिरा का होईना, पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली; मात्र पिकांनी जमिनीबाहेर मान काढल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक परिसरातील पिके कोमेजली.  दरम्यान, दोन दिवस कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला,  तर अनेक शेतकºयांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर पुन्हा आॅगस्ट महिन्यात सुरुवातीला दडी मारल्याने  चांगल्या परिस्थितीत असलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. आता पुन्हा मागिल चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पुन्हा शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण पाहता भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सरासरी ७१२.७ मि.मी. आहे. मागिलवर्षी आज पर्यंत ५५५.४ मि.मी.  पाऊस झाला होता, तर यावर्षी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यावरून मागिल वर्षीपेक्षा यावर्षी सरासरी २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यात प्रकल्पात अल्प जलसाठा असून, भविष्यात तीव्र पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.आतापर्यंत सरासरी ४१९ मि.मी. पाऊसयावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सरासरी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला असून, रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २९.० मि.मी., चिखली १७.०, देऊळगाव राजा ४८.०, मेहकर १६.०,  लोणार ९०.०, सिंदखेड राजा ३९.६, मलकापूर ३२.०, नांदूरा ३६.०, मोताळा ४२.०, खामगाव ०४.२,  शेगाव २१.०, जळगाव जामोद ३७.०, संग्रामपूर तालुक्यात १०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.तब्बल ४५ दिवसांनंतर पावसाची हजेरीधाड : तब्बल ४५ दिवसानंतर बुलडाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत खरिपांच्या पिकांना जीवनदान दिले; मात्र या भागात प्रदीर्घ पावसाच्या उघडीपीचा सोयाबीन, मका, कपाशी या नगदी  पकांना ३० टक्के फटका बसला आहे. शेवटी प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार पाऊस २० आॅगस्ट रोजी सकाळी १० पर्यंत सुरूच होता. अगोदरचकर्जमाफीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये हैराण झालेल्या शेतकºयास दुष्काळी स्थितीने गलीतगात्र केले. शेतशिवारात पिके सुकून माना टाकताना दिसत होते.