शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात सरासरी २५ टक्के कमी पाऊस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 21:59 IST

सर्वत्र रिमझिम पाऊस, प्रकल्प कोरडेच!

हर्षनंदन वाघ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात मागिल चार-पाच दिवसांपासून सर्वत्र रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या  पावसामुळे पिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असला, तरी जिल्ह्यातील प्रकल्प मात्र कोरडे आहेत. मागिल वर्षीेपेक्षा यावर्षी जवळपास सरासरी २५ टक्के कमी पाऊस असल्यामुळे भविष्यात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.यावर्षी पाऊस चांगला होणार असल्याचे संकेत हवामान विभागाने दिले होते. त्यानुसार थोड्या उशिरा का होईना, पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे अनेक शेतकºयांनी पेरणीला सुरुवात केली; मात्र पिकांनी जमिनीबाहेर मान काढल्यानंतर पावसाने दडी मारली. त्यामुळे अनेक परिसरातील पिके कोमेजली.  दरम्यान, दोन दिवस कमी-जास्त प्रमाणात पाऊस झाल्याने काही प्रमाणात पिकांना दिलासा मिळाला,  तर अनेक शेतकºयांनी दुबार पेरणी केली. त्यानंतर पुन्हा आॅगस्ट महिन्यात सुरुवातीला दडी मारल्याने  चांगल्या परिस्थितीत असलेल्या पिकांनी माना टाकायला सुरुवात केली. आता पुन्हा मागिल चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे पुन्हा शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत; मात्र पावसाचे प्रमाण पाहता भविष्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान सरासरी ७१२.७ मि.मी. आहे. मागिलवर्षी आज पर्यंत ५५५.४ मि.मी.  पाऊस झाला होता, तर यावर्षी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला आहे. यावरून मागिल वर्षीपेक्षा यावर्षी सरासरी २५ टक्के कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे यावर्षी सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे जिल्ह्यात प्रकल्पात अल्प जलसाठा असून, भविष्यात तीव्र पाणी पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.आतापर्यंत सरासरी ४१९ मि.मी. पाऊसयावर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर आजपर्यंत सरासरी ४१९.२ मि.मी. पाऊस झाला असून, रविवारी रात्री ते सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३२.६ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यात बुलडाणा तालुक्यात २९.० मि.मी., चिखली १७.०, देऊळगाव राजा ४८.०, मेहकर १६.०,  लोणार ९०.०, सिंदखेड राजा ३९.६, मलकापूर ३२.०, नांदूरा ३६.०, मोताळा ४२.०, खामगाव ०४.२,  शेगाव २१.०, जळगाव जामोद ३७.०, संग्रामपूर तालुक्यात १०.० मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.तब्बल ४५ दिवसांनंतर पावसाची हजेरीधाड : तब्बल ४५ दिवसानंतर बुलडाणा तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावत खरिपांच्या पिकांना जीवनदान दिले; मात्र या भागात प्रदीर्घ पावसाच्या उघडीपीचा सोयाबीन, मका, कपाशी या नगदी  पकांना ३० टक्के फटका बसला आहे. शेवटी प्रदीर्घ खंडानंतर १९ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता सुरू झालेला संततधार पाऊस २० आॅगस्ट रोजी सकाळी १० पर्यंत सुरूच होता. अगोदरचकर्जमाफीच्या घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यामध्ये हैराण झालेल्या शेतकºयास दुष्काळी स्थितीने गलीतगात्र केले. शेतशिवारात पिके सुकून माना टाकताना दिसत होते.