शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात वीस वर्षांपासून भूमापन नाही

By admin | Updated: January 22, 2015 00:36 IST

बुलडाणा जिल्ह्यात १९९४ मध्ये झाले होते ११३ गावांचे भूमापन.

नीलेश शहाकार /बुलडाणा :राज्यात १९६४ पासून भू-मापन प्रक्रिया सुरु आहे. यानुसार १९९४ मध्ये बुलडाणा जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या ११३ गावांचे अत्यंत क्लिष्ट पद्धतीने भू-मापन करण्यात आले; मात्र गेल्या वीस वर्षांंनंतरही जिल्ह्यातील एकूण गावांपैकी १ हजार १८१ गावांचे अद्यापही भू-मापन झाले नसल्याची माहिती आहे.महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १२२ व १२६ नुसार भूमापन मोजणी करण्यात येते. ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महानगरपालिका स्तरावर ही प्रक्रिया राबविण्यात येत असते. यातून स्थानिक नागरिकांना जागेचा मूळ अभिलेख प्राप्त होऊन नझूल आकारला जातो. दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामसभेत भू-मापनाचा ठराव घ्यायचा असतो. सदर ठराव ग्रामपंचायतीतून मंजूर होऊन जिल्हाधिकारी यांच्याकडे जातो. त्यास मंजुरात देऊन जिल्हाधिकारी आदेश काढून भूमिअभिलेख विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवितात; मात्र भूमापनाची ही प्रक्रिया क्लिष्ट आहे. ही प्रक्रिया दीर्घकाल सुरु राहते. बुलडाणा जिल्ह्यातील १९९0 नंतर भूमिअभिलेख कार्यालयाची निर्मिती करण्यात आली होती. त्यावेळी जिल्ह्याचा विस्तार कमी असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने जिल्ह्यातील दोन हजार लोकवस्ती असलेल्या गावांमध्ये भूमापन प्रक्रिया राबविण्यात आली; मात्र आज बर्‍याच गावांची लोकसंख्या वाढली आहे. शिवाय मूळ जमिनीचे मोठय़ा प्रमाणात पोटविभाजन झाले. ही बाब गावठाणाच्या पुनर्मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण करीत आहे. शासनाने दिलेल्या नवीन आदेशानुसार अद्ययावत प्रणालीच्या आधारे उपग्रहाद्वारे भूमापन कार्यक्रम राबविला जाणार आहे, यासाठी लवकरच जिल्ह्यात प्रक्रिया राबवली जाणार आहे. जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयाचे सहायक प्रवीण पांडे यांनी राष्ट्रीय भूमिअभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात जमिनीची पुनर्मोजणी व भूमापन सुरु असल्याचे स्पष्ट केले. प्रक्रिया क्लिष्ट असल्यमुळे भूमापनाला किमान एक वर्षाचा कालावधी लागेल, असेही ते म्हणाले. शासनाच्या आदेशानुसार २00१ पासून जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरीय भूमापन अधिकारी यांच्याकडे किमान एक गावाचे भूमापन करण्याची जबाबदारी देण्यात आली होती. यानंतर निघालेल्या नवीन आदेशानुसार २0११ पासून प्रत्येक अधिकार्‍याकडे आणखी एक गाव जोडण्यात आले; मात्र या भूमापन कामाला गती मिळाली नसल्यामुळे उद्दिष्टपूर्ती झाली नाही.*कमी कर्मचार्‍यांमुळे अडचणजिल्ह्यातील गावठाणचे भूमापन कामासाठी जिल्हास्तरीय अधिकारी व्यतिरिक्त तालुकास्तरावर हे अधिकारी काम करतात; मात्र १३ तालुक्यांपैकी केवळ ७ ठिकाणी तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत, त्यामुळे गावठाणाचे भूमापन करणे, मोजमाप झाल्यानंतर त्याबाबत चौकशी पुरावे गोळा करण्याच्या कार्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत.