शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
Tejasvee Ghosalkar: तेजस्वी घोसाळकर मुंबै बँकेच्या संचालकपदी
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर!

By admin | Updated: March 18, 2017 01:10 IST

८५ हजार शेतकरी; १७0४ कोटी कर्जाचे ओझे.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १७- गत चार वर्षांचा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यावर कर्जाचा बोजा वाढला असून, जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्‍यांवर १७0४ कोटींचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. भविष्यात हे कर्ज माफ व्हावे, अशी अपेक्षा आता बळीराजाकडून व्यक्त होत आहे. सततची नापिकी, दुष्काळ आणि दरातील अभावामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणखीनच उद्ध्वस्त झाला. गत दिडवर्षात जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारी स्थितीमुळे १२२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर कमी व्हावा,यासाठी सध्या लोकप्रतिनिंधीकडून कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. शेतकरी कर्जमाफीचा हा निर्णय घ्यायचा झाल्यास शासनाच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडू शकतो, याची आकडेमोड सुरू आहे. आता कर्जमाफी व्हावी,अशी अपेक्षा बळीराजाकडूनही व्यक्त होत आहे.१७0४ कोटीचे पीक कर्ज थकले!जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्‍यांकडे तब्बल १७0४ कोटी रुपयाचे कर्ज थकले आहे. यात खरीपातील १ लाख १0 हजार शेतकरी व रब्बीतील ७४ हजार ५00 शेतकर्‍यांना समावेश आहे. जिल्हा केंद्रीय बँकेकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा सहकारी बँकेचे ३४२ कोटी आणि सर्व राष्ट्रीय बँका व ग्रामीण बँका यांचे १३६२ कोटीचे पिककर्ज थकले आहे.वर्षभरात २१७ शेतकरी आत्महत्यासततची नापिकी व वाढण्यार्‍या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून वर्षभरात बुलडाणा जिल्ह्यात २१७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापैकी नापिकीमुळे ६१ आणि कर्जबाजारीपणातून ६१ अशा १२२ शेतकर्‍यांची आत्महत्या केल्याची नोंद शासणदरबारी आहे.यंदा वाटले १0६२ कोटीचे पीक कर्ज !२0१६-१७ खरीप आणि रब्बी हंगामात विविध बँकाकडून जिल्ह्यातील जवळपास १ लाख ६५ हजार ३३८ शेतकर्‍यांना १0६२ कोटी रुपयाचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. यात खरीपासाठी १ लाख ४७ हजार ६७५ शेतकर्‍यांना ९८६.२१ कोटी आणि रब्बीसाठी १७ हजार ६६३ शेतकर्‍यांना ७६.१८ कोटीचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.