शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील शेतक-यांवर कर्जाचा डोंगर!

By admin | Updated: March 18, 2017 01:10 IST

८५ हजार शेतकरी; १७0४ कोटी कर्जाचे ओझे.

नीलेश शहाकारबुलडाणा, दि. १७- गत चार वर्षांचा दुष्काळामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यावर कर्जाचा बोजा वाढला असून, जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्‍यांवर १७0४ कोटींचे कर्ज असल्याचे समोर आले आहे. भविष्यात हे कर्ज माफ व्हावे, अशी अपेक्षा आता बळीराजाकडून व्यक्त होत आहे. सततची नापिकी, दुष्काळ आणि दरातील अभावामुळे गेल्या चार वर्षांपासून शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर शेतकरी आणखीनच उद्ध्वस्त झाला. गत दिडवर्षात जिल्ह्यात नापिकी व कर्जबाजारी स्थितीमुळे १२२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या असून आत्महत्याचे सत्र सुरुच आहे. शेतकर्‍यांवरील कर्जाचा डोंगर कमी व्हावा,यासाठी सध्या लोकप्रतिनिंधीकडून कर्जमाफीच्या मागणीने जोर धरला आहे. शेतकरी कर्जमाफीचा हा निर्णय घ्यायचा झाल्यास शासनाच्या तिजोरीवर किती आर्थिक बोजा पडू शकतो, याची आकडेमोड सुरू आहे. आता कर्जमाफी व्हावी,अशी अपेक्षा बळीराजाकडूनही व्यक्त होत आहे.१७0४ कोटीचे पीक कर्ज थकले!जिल्ह्यातील ८५ हजार ५00 शेतकर्‍यांकडे तब्बल १७0४ कोटी रुपयाचे कर्ज थकले आहे. यात खरीपातील १ लाख १0 हजार शेतकरी व रब्बीतील ७४ हजार ५00 शेतकर्‍यांना समावेश आहे. जिल्हा केंद्रीय बँकेकडून प्राप्त माहितीनुसार जिल्हा सहकारी बँकेचे ३४२ कोटी आणि सर्व राष्ट्रीय बँका व ग्रामीण बँका यांचे १३६२ कोटीचे पिककर्ज थकले आहे.वर्षभरात २१७ शेतकरी आत्महत्यासततची नापिकी व वाढण्यार्‍या कर्जाच्या डोंगरामुळे जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या कमी न होता वाढतच असून वर्षभरात बुलडाणा जिल्ह्यात २१७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. विशेष म्हणजे यापैकी नापिकीमुळे ६१ आणि कर्जबाजारीपणातून ६१ अशा १२२ शेतकर्‍यांची आत्महत्या केल्याची नोंद शासणदरबारी आहे.यंदा वाटले १0६२ कोटीचे पीक कर्ज !२0१६-१७ खरीप आणि रब्बी हंगामात विविध बँकाकडून जिल्ह्यातील जवळपास १ लाख ६५ हजार ३३८ शेतकर्‍यांना १0६२ कोटी रुपयाचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले. यात खरीपासाठी १ लाख ४७ हजार ६७५ शेतकर्‍यांना ९८६.२१ कोटी आणि रब्बीसाठी १७ हजार ६६३ शेतकर्‍यांना ७६.१८ कोटीचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले.