शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
5
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
6
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
7
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
8
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
9
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
10
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
11
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
12
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
14
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
15
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
16
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
17
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
18
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
19
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
20
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...

बुलडाणा जिल्ह्यात ६५0 गावात पाणीटंचाईचे सावट!

By admin | Updated: February 22, 2017 02:36 IST

उन्हाळा सुरु होण्याआधीच गंभीर स्थिती

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २१- जिल्हा प्रशासनाने २0१६-१७ साठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असून जिल्ह्यात ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहेत.गत वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बर्‍याच प्रकल्पातील जलपातळीत मोठी वाढ जलसंकट काही प्रमाणात टळले होते. शिवाय ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येतही घट झाली. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, ऑक्टोबरनंतर अपेक्षीत पाऊस न झाल्याने जलसाठय़ातील पाणीपातळी खालावली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला. त्यानुसार ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित करुन उपाययोजना आखण्यात आल्या आहे. देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव व जळगाव जामोद सहा तालुक्यातील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहे.योजनांचे काम कासव गतीनेपाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला आराखडा ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ या कालर्मयादेसाठी तयार करण्यात आला आहे. यात नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती या योजनांची अंमलबजावणी ऑक्टोबरपासूनच झाली, तर उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईशी दोन हात करता येतील. मात्र, या योजनांचे काम कासव गतीने होत असून आतापर्यंत केवळ चार गावांमध्ये योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.सहा तालुक्यांत सर्वाधिक गावे टंचाईग्रस्त४पाच वर्षांपासून जिल्ह्यातील बरीच गावे कायमस्वरुपी पाणीटंचाईची छळ सोसत आहेत. यावर्षीही देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, शेगाव व जळगाव जामोद या सहा तालुक्यांतील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत.