शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

बुलडाणा जिल्ह्यात ६५0 गावात पाणीटंचाईचे सावट!

By admin | Updated: February 22, 2017 02:36 IST

उन्हाळा सुरु होण्याआधीच गंभीर स्थिती

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २१- जिल्हा प्रशासनाने २0१६-१७ साठी पाणीटंचाई निवारण आराखडा तयार केला असून जिल्ह्यात ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित केली आहेत.गत वर्षी जिल्ह्यात चांगला पाऊस झाला होता. त्यामुळे बर्‍याच प्रकल्पातील जलपातळीत मोठी वाढ जलसंकट काही प्रमाणात टळले होते. शिवाय ग्रामीण भागात पाणीपुरवठा करणार्‍या टँकरच्या संख्येतही घट झाली. जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे पाणीपातळी वाढविण्यात प्रशासनाला यश आले. मात्र, ऑक्टोबरनंतर अपेक्षीत पाऊस न झाल्याने जलसाठय़ातील पाणीपातळी खालावली आहे. उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता, जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाई निवारणार्थ आराखडा तयार केला. त्यानुसार ६५0 गावात संभाव्य पाणीटंचाई घोषित करुन उपाययोजना आखण्यात आल्या आहे. देऊळगावराजा, मेहकर, लोणार, सिंदखेडराजा, शेगाव व जळगाव जामोद सहा तालुक्यातील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहे.योजनांचे काम कासव गतीनेपाणीटंचाई निवारणार्थ प्रशासनाकडून तयार करण्यात आलेला आराखडा ऑक्टोबर २0१६ ते जून २0१७ या कालर्मयादेसाठी तयार करण्यात आला आहे. यात नवीन विंधन विहिरी, कूपनलिका, नळयोजना विशेष दुरुस्ती, विंधन विहिरीची दुरुस्ती या योजनांची अंमलबजावणी ऑक्टोबरपासूनच झाली, तर उन्हाळ्यात निर्माण होणार्‍या पाणीटंचाईशी दोन हात करता येतील. मात्र, या योजनांचे काम कासव गतीने होत असून आतापर्यंत केवळ चार गावांमध्ये योजनांची कामे पूर्ण झाली आहेत.सहा तालुक्यांत सर्वाधिक गावे टंचाईग्रस्त४पाच वर्षांपासून जिल्ह्यातील बरीच गावे कायमस्वरुपी पाणीटंचाईची छळ सोसत आहेत. यावर्षीही देऊळगाव राजा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, शेगाव व जळगाव जामोद या सहा तालुक्यांतील सर्वाधिक गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत.