शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

संदीप वानखडे बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला याेजना सुरू ...

संदीप वानखडे

बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत गॅस कनेक्शन माेफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामांन्याना परवडत नसल्याचे चित्र आहे. सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागत आहे. आधीच महागाई वाढत असल्याने त्यात गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. सध्या सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत असून, सबसिडी बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

गत काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावेत.

मीना विजय खरात, गृहिणी

सिलिंडरचे भाव ९०० रुपयांपर्यंत पाेहोचले आहेत. दुसरीकडे सबसिडी मात्र तीन ते चार रुपये मिळत आहे, त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावेत, तसेच सबसिडी वाढविण्याची गरज आहे.

साेनाली वैभव मगर, गृहिणी

काेराेनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियाेजन बिघडले आहे. गॅसचे भावही दुपटीने वाढले असून, मिळणारी सबसिडी बंदच झाली आहे. त्यामुळे, सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे. साेनू गणेश जुनघरे, गृहिणी

अत्यल्प मिळते सबसिडी

गॅस सिलिंडरवर आधी २०० ते २५० रुपये सबसिडी मिळत हाेती. त्यामुळे, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्यात हाेता. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढलेले असताना केवळ २ ते ३ रुपये खात्यात जमा हाेत आहेत. या सबसिडीसाठी ग्राहकांना बँकेेचे खाते काढावे लागत आहे. त्यासाठी बँकेत काही रक्कम डिपाॅझिट ठेवावी लागते. त्यामुळे, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.