शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

उज्ज्वला पुन्हा चुलीवर; कनेक्शन मोफत, पण गॅस कसा भरणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:39 IST

संदीप वानखडे बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला याेजना सुरू ...

संदीप वानखडे

बुलडाणा : ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगणाऱ्या लाेकांना स्वयंपाकाचा माेफत गॅस देण्यासाठी केंद्र सरकारने उज्ज्वला याेजना सुरू केली आहे. या याेजनेंतर्गत गॅस कनेक्शन माेफत मिळत असले तरी सिलिंडर महागल्याने सर्वसामांन्याना परवडत नसल्याचे चित्र आहे. सबसिडीही जवळपास बंदच झाल्याने उज्ज्वला योजनेचे ग्रामीण भागातील लाभार्थी पुन्हा चुलीवर स्वयंपाक करीत असल्याचे चित्र आहे.

स्वयंपाकाच्या गॅसचे दर प्रत्येक महिन्याला वाढतच असून, यामुळे सर्वांचेच ‘बजेट’ कोलमडत आहे. त्यात पगारदार, व्यावसायिकही चिंतित असताना अल्प उत्पन्न असणाऱ्यांसमोर तर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. स्वयंपाकासाठी महिलांना वणवण भटकंती करीत सरपण जमा करावे लागते व धुराचा सामना करीत चूल पेटवावी लागत आहे. आधीच महागाई वाढत असल्याने त्यात गॅस सिलिंडरचीही भर पडली आहे. सध्या सिलिंडर ८५५ रुपयांना मिळत असून, सबसिडी बंद झाल्यातच जमा असल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे.

गत काही महिन्यांपासून सिलिंडरचे भाव वाढतच आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट काेलमडले आहे. आधीच कोरोनामुळे अनेकांवर आर्थिक संकटे आलेली असताना त्यातच सिलिंडरचे भावही वाढले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावेत.

मीना विजय खरात, गृहिणी

सिलिंडरचे भाव ९०० रुपयांपर्यंत पाेहोचले आहेत. दुसरीकडे सबसिडी मात्र तीन ते चार रुपये मिळत आहे, त्यामुळे, केंद्र सरकारने गॅसचे दर कमी करावेत, तसेच सबसिडी वाढविण्याची गरज आहे.

साेनाली वैभव मगर, गृहिणी

काेराेनामुळे गतवर्षीपासून सर्वसामान्य आर्थिक संकटात सापडले आहेत. त्यातच महागाई वाढल्याने अनेकांचे नियाेजन बिघडले आहे. गॅसचे भावही दुपटीने वाढले असून, मिळणारी सबसिडी बंदच झाली आहे. त्यामुळे, सिलिंडरचे वाढलेले भाव कमी करण्याची गरज आहे. साेनू गणेश जुनघरे, गृहिणी

अत्यल्प मिळते सबसिडी

गॅस सिलिंडरवर आधी २०० ते २५० रुपये सबसिडी मिळत हाेती. त्यामुळे, गॅस सर्वसामान्यांच्या आवाक्यात हाेता. मात्र, आता सिलिंडरचे दर वाढलेले असताना केवळ २ ते ३ रुपये खात्यात जमा हाेत आहेत. या सबसिडीसाठी ग्राहकांना बँकेेचे खाते काढावे लागत आहे. त्यासाठी बँकेत काही रक्कम डिपाॅझिट ठेवावी लागते. त्यामुळे, ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत.