शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

जालना रस्त्याच्या कामाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:24 IST

नागपूर ते औरंगाबाद महामार्गावरील सुलतानपूर ते जालना दरम्यान रोडवर डांबरीकरणाचे काम सुरू होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले ...

नागपूर ते औरंगाबाद महामार्गावरील सुलतानपूर ते जालना दरम्यान रोडवर डांबरीकरणाचे काम सुरू होते. रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे दुरुस्ती व ८४ किलोमीटर अंतराच्या दरम्यान डांबरीकरणाचे दोन लियर टाकण्याचे काम शेट्टी कंपनीकडे देण्यात आले होते. २४ जून च्या सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान सुलतानपूर पासून डांबरीकरणाच्या कामास प्रारंभ करण्यात आला. याच वेळी सुलतानपूर, भानापूर, अंजनी या भागात जोरदार पाऊस झाला. पावसामध्ये डांबरीकरणाचे काम व्यवस्थित होत नाही, तरीदेखील संबंधित कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून डांबरीकरणाचे काम भर पावसामध्ये सुरू असल्यामुळे रस्त्याला डांबरीकरण चिटकत नव्हते. होणारे काम हे निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसत होते. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्य पती दिलीप वाघ यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबतची तक्रार केली. दरम्यान, होणारे निकृष्ट दर्जाचे काम त्वरित थांबवले. ७ जूनपासून विदर्भामध्ये मृग नक्षत्राच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे शासनानेच सात जून नंतर डांबरीकरण करण्यास बंदी घातलेली असतानादेखील नागपूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर सुलतानपूर ते जालना या दरम्यान भरपावसात व रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होत असलेले ८४ कोटी रुपयाचे निकृष्ट दर्जाचे काम ठेकेदार थातूरमातूर पूर्ण करण्याच्या तयारीत होते. या निकृष्ट दर्जाच्या होणाऱ्या कामाला दिलीप वाघ यांच्या तक्रारीनंतर ब्रेक लावण्यात आला.

काय म्हणतात प्रकल्प अधिकारी

जालना मार्गाचे काम पावसाळ्यात केल्यास काही दिवसातच पुन्हा ते डांबर उखडण्याची भीती आहे. त्यामुळे हे काम थांबणे आवश्यक होते. या महामार्गाचे काम पावसामध्ये होणार नाही, तर ऊन पडल्यानंतरच करण्यात येईल अशी माहिती औरंगाबाद येथील प्रकल्प अधिकारी कसबे यांनी भ्रमणध्वनीवरून दिली.