शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

लस घेतलेल्या दोघांना झाला कोरोना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 05:06 IST

कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीकरणाला १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झालेली ...

कोविड या साथरोगासाठी कारणीभूत ठरणाऱ्या कोरोना विषाणूवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी कोविशिल्ड या लसीकरणाला १६ जानेवारीपासून जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. लसीकरण सत्रात पहिली लस बुलडाणा येथील डॉ.सोनाली मुंढे-इलग यांना देण्यात आली होती. या दिवशी ५७५ नोंदणीकृत लाभार्थ्यांना लस देण्यात आली होती. लस घेतल्यानंतरही मास्क लावणे, वारंवार हात धुणे व सामाजिक अंतर पाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सुरुवातीला बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालय, शेगाव, देऊळगाव राजा, खामगाव, चिखली व मलकापूर येथे लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती.

त्यानंतर टप्प्या टप्प्याने लसीकरणाच्या केंद्रामध्ये वाढ करण्यात आली. परंतू लस घेतल्यानंतरह आतापर्यंत दोन जणांना कोरोनाची लागन झाल्याचा प्रकार समोरा आला आहे. त्यामध्ये डोगणाव येथील वैद्यकीय अधिकारी व दुसरा खामगाव येथील आरोग्य कर्मचारी लस घेतल्यानंतर कोरोना पाॅझिटिव्ह सापडला आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात दीडशेपेक्षा अधिक लाभार्थ्यांना दुसऱ्या टप्प्यातील लस देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोविशिल्डचे ३६ हजार ५०० आणि कोव्हॅक्सिनचे ७ हजार १०० असे ४३ हजार ३०० डोस उपलब्ध करण्यात आले आहेत.

कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर, दुसरा डोस २८ दिवसांनी घ्यावा लागतो. त्यानंतर शरीरात ॲन्टीबाॅडीज तयार होतात. दोन्ही डोस घेण्याच्या दरम्यानच्या या कालावधीमध्ये कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

-डाॅ. नितीन तडस,

जिल्हा शल्यचिकित्सक, बुलडाणा

१३०० दररोजचे लसीकरणाचे उद्दिष्ट

कोविड लसीकरण जिल्ह्यात सुरू असून, सध्या १३ ठिकाणी हे लसीकरण होत आहे. प्रत्येक केंद्रावर १०० याप्रमाणे १ हजार ३०० लसीकरणाचे दररोजचे उद्दिष्ट आहे. कोविड लसीकरणामध्ये दुसऱ्या टप्प्यातील फ्रंटलाइन वर्करमधील व्यक्तींचे लसीकरण सध्या सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला प्रतिसाद मिळत आहे.

लस घेतल्यानंतर चार तास विश्रांती आवश्यक

कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नसल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले असले, तरी ही लस घेतल्यानंतर अस्वस्थ वाटणे, मळमळ, उलट्या होण्याचा त्रास जाणवतो. त्यामुळे लस घेतल्यानंतर किमान चार तास विश्रांती घेणे आवश्यक आहे, शिवाय फिजिकल डिस्टन्सिंग राखणे, तोंडाला मास्क बांधणे, सॅनिटायझरचा वापर करणेही आवश्यक असल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.