शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

घर दोघांचे, पण नोंदणी पुरुषांच्याच नावे!

By admin | Updated: March 8, 2016 02:34 IST

सातबा-यावरही नाव देण्याची मागणी; ग्रामविकास मंत्रालयाच्या परिपत्रकाची प्रभावी अंमलबजावणी नाही.

बुलडाणा : घर दोघांचे असते ते दोघांनी सावरायचे असते..एकाने पसरवले तर दुसर्‍याने आवरायचे असते..अशा अनेक ओळींनी घरामध्ये पतिपत्नीचे महत्त्व अधोरेखित केले जाते. हे घर दोघांचे असले तरी घराची नोंदणी मात्र पुरुषांच्याच नावावर असण्याचा प्रकार सर्वाधिक आहे. विशेष म्हणजे पतीच्या मालमत्तेत हक्क देतानाच स्त्रियांचा आत्मसन्मान वाढविण्यासाठी घर दोघांच्या नावे करण्यात यावे, असे परिपत्रक राज्य शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने २0१३ मध्ये काढले होते, त्या परिपत्रकाचीही पूर्णपणे अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याने अनेक गावांमध्ये महिलांना आर्थिक सुरक्षितता देण्याच्या दृष्टीने केलेला हा प्रयत्न प्रशासकीय उदासीनतेमुळे यशस्वी झाला नाही. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभाग शासन परिपत्रक क्र.व्ही.पी.एम. २६0३/प्र.क्र. २0६८ मंत्रालय मुंबई दि.२0 नोव्हेंबर २00३ रोजी प्रसिद्ध करून घर दोघांच्या नावाने करण्याबाबत सूचित केले होते; मात्र या परिपत्रकांची अजूनही जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींनी पूर्तता केलेली नाही. जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींनी नमुना आठ वर नोंद घेताना पती-पत्नीच्या नावाची नोंद घेतली आहे; मात्र घर विकताना महिलेची संमती गृहित धरली जात असल्याने महिला सुरक्षिततेच्या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. अनेकदा पतीच्या निधनानंतर पतीच्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्तापित करताना महिलांना अनेक कायदेशीर अडचणींना सामोरे जावे लागते. जर आधीच पती-पत्नीच्या नावांची नोंद महसुली दप्तरात असेल तर अशा अडचणी येऊ नये, हा शासनाचा उद्देश आहे. शासनाच्या महिलाविषयक धोरणांची अंमलबजावणी पूर्णपणे झाली तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.