शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

मंडळनिहाय निकषाचा शेतक-यांना फटका

By admin | Updated: June 4, 2016 02:43 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ८६ हजार शेतकरी मदतीपासून वंचित.

गणेश मापारी / खामगावखरिपातील मूग, उडिदाच्या पिकाची 'माती' झाली, तर सोयाबीनचे उत्पादनही घटले. त्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांची आशा असलेल्या पीक विम्यानेही त्यांचा घात केला आहे. पीक विमा देताना मंडळनिहाय निकष ठेवल्यामुळे एकाच जिल्ह्यातील शेती आणि शेतकरी असतानाही, ८६ हजार शेतकर्‍यांना पीक विम्याची रक्कम मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी अनेक उपाययोजना करीत असले तरी अनेक शासकीय धोरणांचे भूत शेतकर्‍यांच्या मानगुटीवरच बसलेले आहे. पावसाच्या लहरीपणामुळे दरवर्षी उत्पादनात होणारी घट पाहता, अनेक शेतकरी खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पिकांचा पीक विमा उतरवितात. ज्वारी, तूर, मूग, उडिद, सोयाबीन, तीळ, कापूस आणि भुईमूग या खरिपातील पिकांसाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधून ३ लाख ६३ हजार २४६ शेतकर्‍यांनी पीक विमा उतरविला. यापैकी २ लाख ७६ हजार ९0८ शेतकर्‍यांचाच पीक विमा मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ८६ हजार ३३८ शेतकर्‍यांना पीक विम्याच्या मोबदल्यात कोणतीही मदत मिळणार नाही. ही संख्या मोठी असल्याने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. कर्मचार्‍यांचीही डोकेदुखीमहसूल मंडळातील सरासरी उत्पन्न, उंबरठा उत्पन्न यावरून संबंधित महसूल मंडळातील नुकसान ठरविण्यात येते. या प्रकारामुळे एकाच भागातील शेतीला शेती लागून असलेल्या शेतकर्‍यांच्या मदतीतही मोठी तफावत राहते. एका शेतकर्‍याला विम्याची मदत मिळते, तर लगतच्या शेतकर्‍याला मात्र विम्याची रक्कम नाकारली जाते. हा प्रकार शासनाने लावून दिलेल्या धोरणामुळे होत असून, शेतकर्‍यांप्रमाणेच कर्मचार्‍यांचीही यामुळे चांगलीच डोकेदुखी होते.जोखीम स्तराबाबत शेतकरी अनभिज्ञराष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पिकांचा जोखीम स्तर महत्त्वाचा आहे. बहुतांश शेतकर्‍यांना जोखीम स्तराबाबत माहिती नसल्यामुळेही मदतीच्या रकमेत तफावत राहते. यापुढे शासनाने पंतप्रधान पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यामुळे संबंधित योजनेबाबत शेतकर्‍यांना पूर्ण मार्गदर्शन करण्याची गरज आहे.