शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

सीमावर्ती भागात नाकेबंदी

By admin | Updated: June 26, 2015 01:32 IST

राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून आणि ४ जुलै रोजी मतदान होणार आहे.

जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी : निवडणूकसंबंधी आंतरराज्य सीमा बैठक गोंदिया : राज्यात केवळ गोंदिया आणि भंडारा जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३० जून आणि ४ जुलै रोजी मतदान होणार आहे. दोन्ही जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया सुरक्षित व शांततेत पार पाडण्यासाठी या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात आंररराज्य नाकेबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा परिषद निवडणुकीबाबत आंतरराज्य सीमा बैठक पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी बोलत होते. बैठकीला भंडारा जिल्हाधिकारी धीरजकुमार, पोलीस अधीक्षक शशीकुमार मीना, राजनांदगावचे (छत्तीसगड) अप्पर जिल्हाधिकारी के.आर. उगले, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, बालाघाटचे (मध्य प्रदेश) अप्पर पोलीस अधीक्षक नीरज सोनी, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, राजनांदगावचे (छत्तीसगड) अप्पर पोलीस अधीक्षक वाय.पी. सिंग, भंडारा अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारावकर, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक, लांजीचे (मध्य प्रदेश) उपविभागीय पोलीस अधिकारी जी.एस. वर्धमान आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांढरकर व उपजिल्हा निवडणूक अधिकारी उमेश काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, निवडणुकीच्या काळात गोंदिया व भंडारा जिल्ह्यात मध्य प्रदेश, छत्तीसगड व गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेतून प्रवेश करणाऱ्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करावी. बालाघाट व राजनांदगावच्या सीमावर्ती भागात विशेष लक्ष द्यावे. सीमावर्ती भागातून जिल्ह्यात मद्य पुरवठा होणार नाही, याची काळजी घ्यावी. २९ व ३० जूनला गोंदिया जिल्ह्यात, ३ व ४ जुलैला भंडारा जिल्ह्यात मतदान व ६ जुलै रोजी दोन्ही जिल्ह्यात मतमोजणी होणार आहे. त्यामुळे परवानाधारक मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार असल्यामुळे या दिवशी मद्यविक्री होणार नाही. तसेच चोरट्या मार्गाने दारू येणार नाही याची दक्षता घ्यावी.मतदानासाठी मतदारांना कुणी पैसे व दारुचे आमिष दाखवित असेल तर संबंधितांची माहिती द्यावी असे सांगून डॉ. सूर्यवंशी म्हणाले, मतदानाच्या वेळी कुणीही बोगस मतदान करणार नाही याकडे विशेष लक्ष असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही ते म्हणाले.जिल्हाधिकारी धीरजकुमार म्हणाले, दोन्ही जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त तैनात असावा. नक्षलग्रस्त भागातील मतदान केंद्राकडे पोलिसांनी विशेष लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले.राजनांदगाव, बालाघाट आणि गडचिरोली जिल्ह्यातून बैठकीला आलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांनीदेखील निवडणूकीच्या काळात सीमावर्ती भागात आवश्यक त्या उपाययोजना करणार असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)