शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधूपिता

By admin | Updated: December 29, 2014 00:08 IST

उपवर मुलींचे लग्न ढकलावे लागत आहेत पुढच्या वर्षावर.

सुधीर चेके पाटील/चिखलीसध्या राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात बुलडाणा जिल्हय़ातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून या दुष्काळात होरपळत असून, दुष्काळाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. चालू वर्षात एकूण १५ तर या आठवड्यात जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे. शिवाय दुष्काळासोबतच तीव्र पाणीटंचाईची छळ प्रत्येकाला सोसावी लागत आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या लग्न सोहळ्यावरही झाला आहे. लागोपाठ तिसर्‍यांदा आलेल्या या दुष्काळाने वधूपित्यांच्या जीवाला घोर लावला आहे. त्यामुळे उपवर मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ह्यनेमेचि येतो दुष्काळह्ण या उक्तीनुसार दुष्काळ पाचविलाच पुजलेला आहे. अतवृष्टी, गारपीट, अत्यल्प पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या तीन वर्षांंपासून शेतकरी दुष्काळाच्या दाहकतेत होरपळ आहे. निसर्गाच्या अवकृपेने सलग तिसर्‍या वर्षी शेतीचे नियोजन कोलमडल्याने एकूण अर्थचक्र बिघडले आहे. खरिपातील नगदी पीक सोयाबीन जिथे सरासरी १0 क्विंटल व्हावयास हवे होते ते २ क्विंटलवर येऊन ठेपल्याने मार्केटमध्येही आवक अत्यंत कमी झाली असून, मार्केट यार्डात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसात शेतकर्‍यांच्या हातात खरिपात उत्पादित शेतमालाचा पैसा पडतो. त्या पैशांच्या भरवशावर अर्थचक्र फिरत असते; मात्र यावर्षी शेतकर्‍यांच्या हाती पैसा नसल्याने हे अर्थचक्र फिरणे थांबले आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या बाजारपेठा व व्यवसायाला बसला आहे. याच काळात गावागावात उपवर मुला-मुलींचे लग्न ठरतात. कुणाच्या लग्नाची बोलणी होते, कुणाची सुपारी फुटते, तर कुणाच्या लग्नाची शिदोरी गावात येते. सारखपुडा, कुंकू-टिळ्याचे कार्यक्रम होतात.लग्नाच्या तारखा निघतात; मात्र यावर्षी शेतकर्‍यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यांनाही ह्यब्रेकह्ण लागला आहे. सद्य:परिस्थितीत दरवर्षी रब्बीचा हंगाम बहरलेला असतो; मात्र यावर्षी रब्बी हंगामातील हरभरा, तूर, गहू या पिकांना मध्यंतरी झालेला पाऊस व त्यानंतर आलेल्या थंडीच्या लाटेचा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातून हाती पैसा येईल याची शाश्‍वती नाही. या वर्षी रब्बी हंगामावर अवलंबून राहिल्यास फेब्रुवारीनंतर तीव्र पाणीटंचाईची छळ सोसावी लागणार असल्याने विशेषत: शेतकरी आपल्या मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली असल्याची माहिती अनेक शेतकर्‍यांनी दिली आहे.