शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
2
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
3
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
4
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
5
Asia Cup 2025: मोहसिन नक्वींच्या हकालपट्टीची मागणी; पाकिस्तानातच जोर धरू लागली...
6
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
7
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
8
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
9
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
10
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
11
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
12
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...
13
इंजिनियरचं धक्कादायक कृत्य, आधी पत्नीची हत्या केली, त्यानंतर मित्राला केला व्हिडीओ कॉल आणि ...
14
IndiGo Bomb Threat: इंडिगोच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, दिल्ली विमानतळावर 'इमर्जन्सी'!
15
जेव्हा पाकिस्तान सरकारनं आपल्याच क्रिकेटर्सना चुना लावला; दिलेले चेकच बाऊन्स झाले; किती होती रक्कम? 
16
१ ऑक्टोबरपासून बदलणार इंट्राडे ट्रेडिंगचे नियम, गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
17
जीएसटी: २.२९ लाख रुपयांना लाँच झालेली ही बाईक, आता मिळतेय १.५५ लाख रुपयांना...
18
प्रेम विवाह: लग्नानंतर तुमची जोडी यशस्वी ठरेल की नाही? कुंडलीतील 'या' योगावरून मिळते उत्तर!
19
"आम्ही १५ वर्षांपासून वेगळे राहतोय...", गोविंदाच्या पत्नीचा मोठा खुलासा, सुनिता अहुजा म्हणाली...
20
संरक्षण, इन्फ्रा ते फायनान्स! 'हे' ५ शेअर्स करणार श्रीमंत! तुमच्या पोर्टफोलिओसाठी उत्तम पर्याय, टार्गेट प्राईस जाहीर

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधूपिता

By admin | Updated: December 29, 2014 00:08 IST

उपवर मुलींचे लग्न ढकलावे लागत आहेत पुढच्या वर्षावर.

सुधीर चेके पाटील/चिखलीसध्या राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात बुलडाणा जिल्हय़ातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून या दुष्काळात होरपळत असून, दुष्काळाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. चालू वर्षात एकूण १५ तर या आठवड्यात जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे. शिवाय दुष्काळासोबतच तीव्र पाणीटंचाईची छळ प्रत्येकाला सोसावी लागत आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या लग्न सोहळ्यावरही झाला आहे. लागोपाठ तिसर्‍यांदा आलेल्या या दुष्काळाने वधूपित्यांच्या जीवाला घोर लावला आहे. त्यामुळे उपवर मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ह्यनेमेचि येतो दुष्काळह्ण या उक्तीनुसार दुष्काळ पाचविलाच पुजलेला आहे. अतवृष्टी, गारपीट, अत्यल्प पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या तीन वर्षांंपासून शेतकरी दुष्काळाच्या दाहकतेत होरपळ आहे. निसर्गाच्या अवकृपेने सलग तिसर्‍या वर्षी शेतीचे नियोजन कोलमडल्याने एकूण अर्थचक्र बिघडले आहे. खरिपातील नगदी पीक सोयाबीन जिथे सरासरी १0 क्विंटल व्हावयास हवे होते ते २ क्विंटलवर येऊन ठेपल्याने मार्केटमध्येही आवक अत्यंत कमी झाली असून, मार्केट यार्डात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसात शेतकर्‍यांच्या हातात खरिपात उत्पादित शेतमालाचा पैसा पडतो. त्या पैशांच्या भरवशावर अर्थचक्र फिरत असते; मात्र यावर्षी शेतकर्‍यांच्या हाती पैसा नसल्याने हे अर्थचक्र फिरणे थांबले आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या बाजारपेठा व व्यवसायाला बसला आहे. याच काळात गावागावात उपवर मुला-मुलींचे लग्न ठरतात. कुणाच्या लग्नाची बोलणी होते, कुणाची सुपारी फुटते, तर कुणाच्या लग्नाची शिदोरी गावात येते. सारखपुडा, कुंकू-टिळ्याचे कार्यक्रम होतात.लग्नाच्या तारखा निघतात; मात्र यावर्षी शेतकर्‍यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यांनाही ह्यब्रेकह्ण लागला आहे. सद्य:परिस्थितीत दरवर्षी रब्बीचा हंगाम बहरलेला असतो; मात्र यावर्षी रब्बी हंगामातील हरभरा, तूर, गहू या पिकांना मध्यंतरी झालेला पाऊस व त्यानंतर आलेल्या थंडीच्या लाटेचा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातून हाती पैसा येईल याची शाश्‍वती नाही. या वर्षी रब्बी हंगामावर अवलंबून राहिल्यास फेब्रुवारीनंतर तीव्र पाणीटंचाईची छळ सोसावी लागणार असल्याने विशेषत: शेतकरी आपल्या मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली असल्याची माहिती अनेक शेतकर्‍यांनी दिली आहे.