शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळाच्या झळांमध्ये होरपळतोय वधूपिता

By admin | Updated: December 29, 2014 00:08 IST

उपवर मुलींचे लग्न ढकलावे लागत आहेत पुढच्या वर्षावर.

सुधीर चेके पाटील/चिखलीसध्या राज्यात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ पडला आहे. त्यात बुलडाणा जिल्हय़ातील शेतकरी गत तीन वर्षांंपासून या दुष्काळात होरपळत असून, दुष्काळाच्या या दुष्टचक्रात अडकलेल्या शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर वाढ होत आहे. चालू वर्षात एकूण १५ तर या आठवड्यात जिल्हय़ात दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याचे विदारक चित्र आहे. शिवाय दुष्काळासोबतच तीव्र पाणीटंचाईची छळ प्रत्येकाला सोसावी लागत आहे. याचा विपरीत परिणाम यंदाच्या लग्न सोहळ्यावरही झाला आहे. लागोपाठ तिसर्‍यांदा आलेल्या या दुष्काळाने वधूपित्यांच्या जीवाला घोर लावला आहे. त्यामुळे उपवर मुलींचे लग्न पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. ह्यनेमेचि येतो दुष्काळह्ण या उक्तीनुसार दुष्काळ पाचविलाच पुजलेला आहे. अतवृष्टी, गारपीट, अत्यल्प पाऊस यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे गेल्या तीन वर्षांंपासून शेतकरी दुष्काळाच्या दाहकतेत होरपळ आहे. निसर्गाच्या अवकृपेने सलग तिसर्‍या वर्षी शेतीचे नियोजन कोलमडल्याने एकूण अर्थचक्र बिघडले आहे. खरिपातील नगदी पीक सोयाबीन जिथे सरासरी १0 क्विंटल व्हावयास हवे होते ते २ क्विंटलवर येऊन ठेपल्याने मार्केटमध्येही आवक अत्यंत कमी झाली असून, मार्केट यार्डात सर्वत्र शुकशुकाट दिसून येत आहे. दरवर्षी या दिवसात शेतकर्‍यांच्या हातात खरिपात उत्पादित शेतमालाचा पैसा पडतो. त्या पैशांच्या भरवशावर अर्थचक्र फिरत असते; मात्र यावर्षी शेतकर्‍यांच्या हाती पैसा नसल्याने हे अर्थचक्र फिरणे थांबले आहे. याचा फटका सर्व प्रकारच्या बाजारपेठा व व्यवसायाला बसला आहे. याच काळात गावागावात उपवर मुला-मुलींचे लग्न ठरतात. कुणाच्या लग्नाची बोलणी होते, कुणाची सुपारी फुटते, तर कुणाच्या लग्नाची शिदोरी गावात येते. सारखपुडा, कुंकू-टिळ्याचे कार्यक्रम होतात.लग्नाच्या तारखा निघतात; मात्र यावर्षी शेतकर्‍यांच्या हातात पैसा नाही. त्यामुळे लग्न सोहळ्यांनाही ह्यब्रेकह्ण लागला आहे. सद्य:परिस्थितीत दरवर्षी रब्बीचा हंगाम बहरलेला असतो; मात्र यावर्षी रब्बी हंगामातील हरभरा, तूर, गहू या पिकांना मध्यंतरी झालेला पाऊस व त्यानंतर आलेल्या थंडीच्या लाटेचा फटका बसला आहे. त्यामुळे रब्बी हंगामातून हाती पैसा येईल याची शाश्‍वती नाही. या वर्षी रब्बी हंगामावर अवलंबून राहिल्यास फेब्रुवारीनंतर तीव्र पाणीटंचाईची छळ सोसावी लागणार असल्याने विशेषत: शेतकरी आपल्या मुला-मुलींचे लग्न लांबणीवर टाकण्याची वेळ आली असल्याची माहिती अनेक शेतकर्‍यांनी दिली आहे.