शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

पावसासाठी इंद्रदेवाला साकडे!

By admin | Updated: July 10, 2017 01:08 IST

भरोसा ग्रामस्थांची २० वर्षांपासूनची परंपरा

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : पावसाने दडी मारल्यामुळे भरोसा येथील महिलांनी हिंदू धर्मग्रंथानुसार जल, वायू आणि अग्नी या तिन्ही शक्तींचा अधिपती असलेल्या देवांचा राजा इंद्राचा धावा सुरू केला आहे. येथील महिलांनी पावसासाठी ८ जुलै रोजी गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये इंद्रदेवाची स्थापना करून, सात दिवस अखंड हरीजप सुरू केला आहे.जिल्ह्यात पावसाने उघाड दिल्याने शेतातील उभी पिके वाळायला लागली आहेत, तर काही जागी पेरण्या उलटल्या आहेत. अनेकांच्या पेरण्याही खोळंबल्या आहेत. त्यामुळे दुष्काळी परिस्थितीची भीती व्यक्त केली जात आहे. बळीराजाला या संकटातून सोडवण्यासाठी भरोसा येथील महिलांनी देवाचा राजा इंद्राची आराधना सुरू केली आहे. ८ जुलै रोजी मातीच्या इंद्राच्या मूर्तीची गावामधून वाजत गाजत मिरवणूक काढून महादेवाच्या मंदिरामध्ये स्थापना करून, सात दिवसांच्या अखंड हरिनाम जपाला सुरुवात केली आहे. यामध्ये गावातील बहुसंख्य महिलांनी सहभाग घेतला आहे. पावसासाठी येथील महिलांकडून देवेंद्राची स्थापना करून सात दिवस हरिनाम जप करण्याची २० वर्षांपासूनची परंपरा असून, हरिनाम जप सुरू झाल्यानंतर पाऊस येतो, अशी येथील महिलांची धारणा आहे.