शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
3
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
4
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
5
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
6
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
7
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
8
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
9
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
10
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
11
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
12
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
13
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
14
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
15
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
16
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
17
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
18
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
19
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
20
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’

By admin | Updated: July 25, 2015 01:25 IST

महसूल व वन विभागाचा निर्णय ; शेतक-यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम.

मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा): गत तीन वर्षातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे उत्पादन घटुन शेतकर्‍यांच्या डोईवर कर्जाचा भार वाढतच आहे. दुष्काळातील जगणे सुसह्य झालेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असून, गत तीन वर्षात सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्‍यांचा आत्महत्येचा वारू बेफाम आहे; शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय शासनाच्या महसूल व वन विभागाने २४ जुलै रोजी घेतला आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरिता शासनस्तरावरून अनेक उपक्रम वेळोवेळी राबविल्या जात आहेत; मात्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येला काही ब्रेक लागलेला नाही. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने विशेष मदतीचा कार्यक्रम हाती घेतला असून, राज्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्येने ग्रासलेल्या शेतकर्‍यांचे मनोबल उंचावून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याकरिता जिल्हास्तरीय समित्या, ग्रामस्तरीय समित्या निर्माण करून बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येणार असून, सुरुवातीला विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, त्यानंतर राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. सततच्या नापिकीमुळे वाढत्या कर्जापायी आलेल्या नैराश्येने कंटाळून राज्यातील शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियान राज्यभरातील आत्महत्या होणार्‍या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता पथदश्री प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत त्रस्त शेतकरी कुटुंब ओळखण्याकरिता ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून यादी बनवून गावात शेतीविषयक शासकीय योजना कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व माहिती देण्यात येणार आहे. गावात सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्तीबाबत भजन, कीर्तन, पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, त्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय सेवेत समुपदेशन करण्याचे नियोजन व उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत ठरावीक कालांतराने गावोगावी स्वास्थ शिबिरे आयोजित करून शेतकर्‍यांना मानसोपचार तज्ज्ञांची तसेच समाजसेवकांची सेवा शिबिरांमधून उपलब्ध करून देणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.