शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

आत्महत्या रोखण्यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’

By admin | Updated: July 25, 2015 01:25 IST

महसूल व वन विभागाचा निर्णय ; शेतक-यांचे मनोबल वाढविण्यासाठी उपक्रम.

मयूर गोलेच्छा / लोणार (जि. बुलडाणा): गत तीन वर्षातील दुष्काळ, गारपीट, अवकाळी पाऊस इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे उत्पादन घटुन शेतकर्‍यांच्या डोईवर कर्जाचा भार वाढतच आहे. दुष्काळातील जगणे सुसह्य झालेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असून, गत तीन वर्षात सततच्या नापिकीला कंटाळून शेतकर्‍यांचा आत्महत्येचा वारू बेफाम आहे; शेतकर्‍यांच्या आत्महत्येवर आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय शासनाच्या महसूल व वन विभागाने २४ जुलै रोजी घेतला आहे. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्याकरिता शासनस्तरावरून अनेक उपक्रम वेळोवेळी राबविल्या जात आहेत; मात्र शेतकर्‍यांच्या आत्महत्येला काही ब्रेक लागलेला नाही. शेतकर्‍यांच्या वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने विशेष मदतीचा कार्यक्रम हाती घेतला असून, राज्यातील आत्महत्याग्रस्त क्षेत्रातील नैराश्येने ग्रासलेल्या शेतकर्‍यांचे मनोबल उंचावून त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्याकरिता जिल्हास्तरीय समित्या, ग्रामस्तरीय समित्या निर्माण करून बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येणार असून, सुरुवातीला विदर्भातील यवतमाळ आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद जिल्ह्याची निवड करण्यात आली असून, त्यानंतर राज्यभर हे अभियान राबविण्यात येणार आहे. सततच्या नापिकीमुळे वाढत्या कर्जापायी आलेल्या नैराश्येने कंटाळून राज्यातील शेतकर्‍यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. राज्यातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता शासन स्तरावरुन बळीराजा चेतना अभियान राज्यभरातील आत्महत्या होणार्‍या जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्याकरिता पथदश्री प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अभियानांतर्गत त्रस्त शेतकरी कुटुंब ओळखण्याकरिता ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून यादी बनवून गावात शेतीविषयक शासकीय योजना कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व माहिती देण्यात येणार आहे. गावात सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्तीबाबत भजन, कीर्तन, पथनाट्याद्वारे जनजागृती करणे, त्रस्त शेतकरी कुटुंबातील प्रमुख व्यक्तीला शासकीय सेवेत समुपदेशन करण्याचे नियोजन व उपक्रम राबविण्यात येणार आहे. जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या मार्फत ठरावीक कालांतराने गावोगावी स्वास्थ शिबिरे आयोजित करून शेतकर्‍यांना मानसोपचार तज्ज्ञांची तसेच समाजसेवकांची सेवा शिबिरांमधून उपलब्ध करून देणे यासारखे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.