शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

भिका-यांना काम अन् कलावंत भिकेला!

By admin | Updated: August 10, 2015 23:29 IST

लोकमत परिचर्चेतील सूर; शाहीर, लोककलावंतांनी व्यक्त केली खंत.

बुलडाणा : अनादिकाळापासून जेव्हा प्रचार व प्रसाराचे कोणतेही साधन नव्हते तेव्हा राजे - महाराजांच्या दरबारात कलेला मानाचे स्थान होते, कलेला लोकाश्रय होता, तीच परंपरा कलावंतांनी जोपासली आणि आज कलेला राजश्रय मिळाला. भारूड, गोंधळी, पोतराज, पोवाडे, कीर्तन आणि नृत्यकलेच्या माध्यमातून आजही खेडोपाडी कलावंत समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत, कला एक साधना आहे, ती मिळविण्यासाठी तपश्‍चर्या, अभ्यास, ज्ञान व तसा गुण लागतो. याच कलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम कलावंत अविरतपणे करीत आहेत. असे असताना शासनाने कलावंतांना डावलून भिकार्‍यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्याची गरज का भासली? असा सवाल लोक कलावंतांनी उपस्थित केला. ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सोमवारी आयोजित परिचर्चेत कलेच्या क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपले प्रखर मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली छबी देशभरातील लोकांसमोर उभी केली, त्यावेळी तज्ज्ञ व अभ्यासू आणि विद्वान लोकांचा वापर केला तर, गुजरात राज्याचा केलेला विकास देशभरात सांगताना अमिताभ बच्चनसारख्या ज्येष्ठ कलावंतांचा वापर मोदींना करावा लागला. मग शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोदीजींना भिकारीच का आठवले? असा प्रश्न उपस्थित करून शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी भिकार्‍यांचा वापर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचेही कलावंतांनी मांडले. या परिचर्चेमध्ये शाहीर ए ओ बावस्कर, शाहीर नवृत्ती घोंगटे, धोंडू खराटे, डी. आर इंगळे, विजय सोनुने, वासुदेव देशपांडे यांनी परिचर्चेत सहभाग घेतला.