शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
6
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
7
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
8
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
9
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
10
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
11
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
12
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
13
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
14
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
15
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
16
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
17
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
18
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
19
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
20
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
Daily Top 2Weekly Top 5

भिका-यांना काम अन् कलावंत भिकेला!

By admin | Updated: August 10, 2015 23:29 IST

लोकमत परिचर्चेतील सूर; शाहीर, लोककलावंतांनी व्यक्त केली खंत.

बुलडाणा : अनादिकाळापासून जेव्हा प्रचार व प्रसाराचे कोणतेही साधन नव्हते तेव्हा राजे - महाराजांच्या दरबारात कलेला मानाचे स्थान होते, कलेला लोकाश्रय होता, तीच परंपरा कलावंतांनी जोपासली आणि आज कलेला राजश्रय मिळाला. भारूड, गोंधळी, पोतराज, पोवाडे, कीर्तन आणि नृत्यकलेच्या माध्यमातून आजही खेडोपाडी कलावंत समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत, कला एक साधना आहे, ती मिळविण्यासाठी तपश्‍चर्या, अभ्यास, ज्ञान व तसा गुण लागतो. याच कलेच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजनांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे काम कलावंत अविरतपणे करीत आहेत. असे असताना शासनाने कलावंतांना डावलून भिकार्‍यांच्या माध्यमातून शासकीय योजनांची माहिती देण्याची गरज का भासली? असा सवाल लोक कलावंतांनी उपस्थित केला. ह्यलोकमतह्ण जिल्हा कार्यालयात सोमवारी आयोजित परिचर्चेत कलेच्या क्षेत्रातील मान्यवरांनी केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावर आपले प्रखर मत मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली छबी देशभरातील लोकांसमोर उभी केली, त्यावेळी तज्ज्ञ व अभ्यासू आणि विद्वान लोकांचा वापर केला तर, गुजरात राज्याचा केलेला विकास देशभरात सांगताना अमिताभ बच्चनसारख्या ज्येष्ठ कलावंतांचा वापर मोदींना करावा लागला. मग शासनाच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोदीजींना भिकारीच का आठवले? असा प्रश्न उपस्थित करून शासकीय योजनांच्या प्रचार व प्रसारासाठी भिकार्‍यांचा वापर करणे म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार असल्याचेही कलावंतांनी मांडले. या परिचर्चेमध्ये शाहीर ए ओ बावस्कर, शाहीर नवृत्ती घोंगटे, धोंडू खराटे, डी. आर इंगळे, विजय सोनुने, वासुदेव देशपांडे यांनी परिचर्चेत सहभाग घेतला.