खामगाव (बुलडाणा) : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांनी आपले कमीशन यापुढे शे तकर्यांकडून कपात न करता शेतमाल खरेदी करणार्या व्यापार्यांकडून वसूल करावे या निर्णयाविरोधात आज सोमवारी व्यापार्यांनी विरोध दर्शविल्याने बाजार समितीचे व्यवहार आज ठप्प होते.गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणणार्या शेतकर्याला त्यांच्या मालाचा भाव ठरविण्याचा कुठलाही अधिकार नाही. यामुळे व्यापारी मागेल त्या भावात शेतकर्याला माल विकावा लागत आहे. यामुळे शेतकर्यांची अडवणूक होत आहे. अगोदरच शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला झालेल्या अल्प मालाला विकण्यासाठी अडत कापावी लागते. परिणामी शेतकर्यांनाच आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे पणन संचालकांनी बाजार समित्यांमधील अडत्यांनी त्यांचे कमीशन शेतकर्यांकडून न घेता व्यापार्यांकडून वसूल करावे, असे आदेश काढले आहेत. या आदेशाला व्यापार्यांनी विरोध करीत आज अघोषितपणे बाजार बंद पुकारला. दरम्यान अशा प्रकारचा आदेश शनिवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाला. मात्र रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने शेतकर्यांना कोणत्याच प्रकारच्या सूचना न मिळाल्याने शेतकर्यांनी आपला माल विक्रीस आणला होता. मात्र बाजार समिती बंद असल्याने शे तकर्यांना त्रास सहन करावा लागला.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प
By admin | Updated: December 22, 2014 23:41 IST