शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

By admin | Updated: December 22, 2014 23:41 IST

अडत कपातीला व्यापा-यांचा विरोध.

खामगाव (बुलडाणा) : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अडत्यांनी आपले कमीशन यापुढे शे तकर्‍यांकडून कपात न करता शेतमाल खरेदी करणार्‍या व्यापार्‍यांकडून वसूल करावे या निर्णयाविरोधात आज सोमवारी व्यापार्‍यांनी विरोध दर्शविल्याने बाजार समितीचे व्यवहार आज ठप्प होते.गेल्या अनेक दिवसांपासून बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीस आणणार्‍या शेतकर्‍याला त्यांच्या मालाचा भाव ठरविण्याचा कुठलाही अधिकार नाही. यामुळे व्यापारी मागेल त्या भावात शेतकर्‍याला माल विकावा लागत आहे. यामुळे शेतकर्‍यांची अडवणूक होत आहे. अगोदरच शेतकरी दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक संकटात सापडला आहे. त्याला झालेल्या अल्प मालाला विकण्यासाठी अडत कापावी लागते. परिणामी शेतकर्‍यांनाच आर्थिक फटका सहन करावा लागतो. यामुळे पणन संचालकांनी बाजार समित्यांमधील अडत्यांनी त्यांचे कमीशन शेतकर्‍यांकडून न घेता व्यापार्‍यांकडून वसूल करावे, असे आदेश काढले आहेत. या आदेशाला व्यापार्‍यांनी विरोध करीत आज अघोषितपणे बाजार बंद पुकारला. दरम्यान अशा प्रकारचा आदेश शनिवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीला मिळाला. मात्र रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने शेतकर्‍यांना कोणत्याच प्रकारच्या सूचना न मिळाल्याने शेतकर्‍यांनी आपला माल विक्रीस आणला होता. मात्र बाजार समिती बंद असल्याने शे तकर्‍यांना त्रास सहन करावा लागला.