शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

By admin | Updated: May 30, 2017 00:19 IST

जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कुठलीही जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी बचावासाठी सज्ज रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या बचावासाठी महसूल विभागाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज रहावे. बचावाच्या अनुषंगाने लाइफ बोट, लाइफ मन, दोर तसेच आवश्यक बाबींची तपासणी करून मुख्यालयी साधनसामग्री तयार ठेवावी. संचार व्यवस्था, स्थलांतर, शोध व बचाव, वैद्यकीय प्रतिसाद व ट्रामा केअर यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध होईल, याचे अगोदरच नियोजन करावे. अतिवृष्टी झालीच तर महसूल विभागाने त्या भागात जाऊन तातडीने पंचनामे करून कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने प्रकल्पात किती जलसाठा आहे, याची तपासणी करावी. तसेच अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पांमध्ये अधिक किती जलसाठा सामावून राहील, याची २४ तास निगराणी तपासणी करावी. त्यासाठी विशेष चमू नियुक्ती करावी. महसूल विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची भौगोलिक स्थिती जाणून तशा प्रकारची बचावात्मक कार्यवाही ग्रामपंचायत व तालुका स्तरावर प्रथमच करून ठेवावी. पूर बाधित जीवनावश्यक वस्तूंचे साठवणूक, आरोग्य सुविधा, तात्पुरत्या निवासाची सोय आदी बाबींचे नियोजन करावे. गाव तलाव, पाझर तलाव तसेच एखाद्या प्रकल्पातून परत येणाऱ्या (बॅक वॉटर ) मुळे प्रभावित होणाऱ्या गावांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी बचावात्मक सुविधांचे नियोजन करुन सज्ज ठेवाव्यात. पिण्याच्या पाण्यासंदर्भात सूचना देताना जिल्हाधिकारी पुलकुंडवार म्हणाले, पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होते व रोगराई पसरते. यापासून संरक्षण मिळावे व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा पुरेसा पुरवठा असावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता करून ठेवावी, आदी सूचना पुलकुंडवार यांनी दिल्या.