शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
4
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
6
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
7
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
8
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
9
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
10
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
11
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
12
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
13
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
14
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
15
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
16
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
17
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
18
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
19
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
20
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

By admin | Updated: May 30, 2017 00:19 IST

जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कुठलीही जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी बचावासाठी सज्ज रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या बचावासाठी महसूल विभागाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज रहावे. बचावाच्या अनुषंगाने लाइफ बोट, लाइफ मन, दोर तसेच आवश्यक बाबींची तपासणी करून मुख्यालयी साधनसामग्री तयार ठेवावी. संचार व्यवस्था, स्थलांतर, शोध व बचाव, वैद्यकीय प्रतिसाद व ट्रामा केअर यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध होईल, याचे अगोदरच नियोजन करावे. अतिवृष्टी झालीच तर महसूल विभागाने त्या भागात जाऊन तातडीने पंचनामे करून कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने प्रकल्पात किती जलसाठा आहे, याची तपासणी करावी. तसेच अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पांमध्ये अधिक किती जलसाठा सामावून राहील, याची २४ तास निगराणी तपासणी करावी. त्यासाठी विशेष चमू नियुक्ती करावी. महसूल विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची भौगोलिक स्थिती जाणून तशा प्रकारची बचावात्मक कार्यवाही ग्रामपंचायत व तालुका स्तरावर प्रथमच करून ठेवावी. पूर बाधित जीवनावश्यक वस्तूंचे साठवणूक, आरोग्य सुविधा, तात्पुरत्या निवासाची सोय आदी बाबींचे नियोजन करावे. गाव तलाव, पाझर तलाव तसेच एखाद्या प्रकल्पातून परत येणाऱ्या (बॅक वॉटर ) मुळे प्रभावित होणाऱ्या गावांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी बचावात्मक सुविधांचे नियोजन करुन सज्ज ठेवाव्यात. पिण्याच्या पाण्यासंदर्भात सूचना देताना जिल्हाधिकारी पुलकुंडवार म्हणाले, पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होते व रोगराई पसरते. यापासून संरक्षण मिळावे व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा पुरेसा पुरवठा असावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता करून ठेवावी, आदी सूचना पुलकुंडवार यांनी दिल्या.