शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

नैसर्गिक आपत्तींपासून रक्षणासाठी सजग राहा!

By admin | Updated: May 30, 2017 00:19 IST

जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : आगामी पावसाळा लक्षात घेता जिल्ह्यात पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास कुठलीही जीवित हानी किंवा वित्त हानी होऊ नये, यासाठी शासकीय यंत्रणांनी बचावासाठी सज्ज रहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व तयारींचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन, अपर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र टापरे, तहसीलदार शैलेश काळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्यासह विभागप्रमुख प्रामुख्याने उपस्थित होते.याप्रसंगी जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती अथवा नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्यावर मात करण्यासाठी नागरिकांच्या बचावासाठी महसूल विभागाने तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाने सज्ज रहावे. बचावाच्या अनुषंगाने लाइफ बोट, लाइफ मन, दोर तसेच आवश्यक बाबींची तपासणी करून मुख्यालयी साधनसामग्री तयार ठेवावी. संचार व्यवस्था, स्थलांतर, शोध व बचाव, वैद्यकीय प्रतिसाद व ट्रामा केअर यासारख्या सुविधा तातडीने उपलब्ध होईल, याचे अगोदरच नियोजन करावे. अतिवृष्टी झालीच तर महसूल विभागाने त्या भागात जाऊन तातडीने पंचनामे करून कार्यपूर्ती अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. ते पुढे म्हणाले, जलसंपदा विभागाने प्रकल्पात किती जलसाठा आहे, याची तपासणी करावी. तसेच अतिवृष्टी झाल्यास प्रकल्पांमध्ये अधिक किती जलसाठा सामावून राहील, याची २४ तास निगराणी तपासणी करावी. त्यासाठी विशेष चमू नियुक्ती करावी. महसूल विभागाने पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांची भौगोलिक स्थिती जाणून तशा प्रकारची बचावात्मक कार्यवाही ग्रामपंचायत व तालुका स्तरावर प्रथमच करून ठेवावी. पूर बाधित जीवनावश्यक वस्तूंचे साठवणूक, आरोग्य सुविधा, तात्पुरत्या निवासाची सोय आदी बाबींचे नियोजन करावे. गाव तलाव, पाझर तलाव तसेच एखाद्या प्रकल्पातून परत येणाऱ्या (बॅक वॉटर ) मुळे प्रभावित होणाऱ्या गावांची यादी तयार करावी. त्या ठिकाणी बचावात्मक सुविधांचे नियोजन करुन सज्ज ठेवाव्यात. पिण्याच्या पाण्यासंदर्भात सूचना देताना जिल्हाधिकारी पुलकुंडवार म्हणाले, पावसामुळे पिण्याचे पाणी दूषित होते व रोगराई पसरते. यापासून संरक्षण मिळावे व नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळण्यासाठी ग्रामपंचायत व तहसील कार्यालयात ब्लिचिंग पावडरचा पुरेसा पुरवठा असावा. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधांची उपलब्धता करून ठेवावी, आदी सूचना पुलकुंडवार यांनी दिल्या.