शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यपदार्थात भेसळ कराल तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या ...

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र या विभागाकडे मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे; मात्र बुलडाणा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात ३८० आस्थापनांची तपासणी करून तब्बल १६१ ठिकाणी नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत.

कोरोना काळात धडाकेबाज कारवाई

अन्न व औषध विभागाने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत जिल्ह्यातील ३८० आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी १६१ अन्न नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले, तर त्यापैकी ७ नमुने अप्रमाणित(कमी दर्जाचे) आढळून आले. तर १०८ नमुने प्रमाणित आढळून आले. सात पैकी चार प्रकरणी न्याय निर्णयासाठी दाखल केले असून, तीन प्रकरणांत ७३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोबतच ११ अन्न पदार्थांच्या जप्ती कारवाया केल्या असून, ५५ लाख ९९ हजार ६६१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर तडजोडी प्रकरणात ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दोन परवाने निलंबित

अन्न व औषध विभागाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईमध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर जिल्ह्यातील दोन आस्थापनांचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे. यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोणत्याही हाॅटेल्स, रेस्टॉरंट वा इतर ठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास त्याची थेट कारवाई अन्न व औषध विभागाकडे नागरिकांनी करावी. प्रशासन सजग असून, नागरिकांनी दक्ष राहून विभागाकडे माहिती द्यावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

-एस.डी. केदारे, सहायक आयुक्त अन्न, बुलडाणा.