शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

खाद्यपदार्थात भेसळ कराल तर खबरदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:38 IST

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या ...

देशभरात ५ ऑगस्ट २००६ पासून अन्नसुरक्षा आणि मानके कायदा लागू करण्यात आला. त्यातील कलम ५० अन्वये विक्री केल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांचा दर्जा योग्य नसल्यास पाच लाख, कमी दर्जाच्या अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक व विक्री केल्यास पाच लाख आणि खोटी जाहिरात दिल्यास दहा लाखांपर्यंत दंड होऊ शकतो; मात्र या विभागाकडे मुळातच मनुष्यबळ अगदीच कमी असल्याने अन्नपदार्थ नमुने तपासण्याचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. त्यामुळे भेसळखोरांचे फावत असल्याचे दिसून येत आहे; मात्र बुलडाणा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाच महिन्यात ३८० आस्थापनांची तपासणी करून तब्बल १६१ ठिकाणी नमुने घेतले असून, तपासणीसाठी पाठविले आहेत.

कोरोना काळात धडाकेबाज कारवाई

अन्न व औषध विभागाने एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत जिल्ह्यातील ३८० आस्थापनांची तपासणी केली. त्यापैकी १६१ अन्न नमुने प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले, तर त्यापैकी ७ नमुने अप्रमाणित(कमी दर्जाचे) आढळून आले. तर १०८ नमुने प्रमाणित आढळून आले. सात पैकी चार प्रकरणी न्याय निर्णयासाठी दाखल केले असून, तीन प्रकरणांत ७३ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. सोबतच ११ अन्न पदार्थांच्या जप्ती कारवाया केल्या असून, ५५ लाख ९९ हजार ६६१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर तडजोडी प्रकरणात ७८ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

दोन परवाने निलंबित

अन्न व औषध विभागाने जिल्ह्यात केलेल्या कारवाईमध्ये भेसळखोरांचे धाबे दणाणले असून, लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. तर जिल्ह्यातील दोन आस्थापनांचा परवाना निलंबित केला असल्याची माहिती अन्न व औषध विभागाने दिली आहे. यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

जिल्ह्यात कोणत्याही हाॅटेल्स, रेस्टॉरंट वा इतर ठिकाणी मिळणाऱ्या खाद्यपदार्थांमध्ये भेसळ आढळल्यास त्याची थेट कारवाई अन्न व औषध विभागाकडे नागरिकांनी करावी. प्रशासन सजग असून, नागरिकांनी दक्ष राहून विभागाकडे माहिती द्यावी, संबंधितांवर योग्य ती कारवाई केली जाईल.

-एस.डी. केदारे, सहायक आयुक्त अन्न, बुलडाणा.