शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
4
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
5
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
6
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
7
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
8
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
9
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
11
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
12
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
13
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
14
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
15
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
16
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
17
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
18
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
19
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
20
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

बुलडाणा : गेल्या वर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ ५९६ शेतकऱ्यांना ११२१ कोटी ४० लाख रुपयांची ...

बुलडाणा : गेल्या वर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ ५९६ शेतकऱ्यांना ११२१ कोटी ४० लाख रुपयांची पीककर्ज माफी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर बँकांनीही जिल्ह्यात २०१६ नंतरचे विक्रमी पीककर्ज वाटप केले आहे. परिणामी कोरोना संकटाच्या काळात जेथे सर्व अर्थकारण ठप्प झाले होते तेथे कृषी क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थकारणास चांगला हातभार लावल्याचे आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ लाख १९ हजार ७८२ शेतकऱ्यांना २ हजार ७३३ कोटी ७२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे वार्षिक पतआराखड्यातंर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी खरीप व रब्बी मिळून जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७४१ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार ४८४ कोटी १७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. एकूण उद्दिष्टाच्या ते ५४ टक्के होते. परिणामी २०१७ नंतरचे हे विक्रमी पीककर्ज वाटप म्हणावे लागले.

यामध्ये खरपी हंगामात २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपये पीककर्ज १ लाख ७९ हजार ४७१ शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार २६० कोटी ५४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बी हंगामात ४० हजार ३११ शेतकऱ्यांना २७३ कोटी ३७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी २६ हजार ७८६ शेतकऱ्यांना बँकांनी २२३ कोटी ६३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बीच्या एकूण उद्दिष्टाच्या ८२ टक्के वाटप यंदा झालेले आहे. जिल्ह्याचा एकंदरीत विचार करता २०१५-१६ या आर्थिक वर्षानंतर प्रथमच पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा उच्चांक करण्यात आला आहे. ही अैाद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रासाठीची दिलासादायक बाब म्हणावी लागले.

--सहा वर्षांत वाटप झालेले पीक कर्ज--

वर्षे कर्जवाटप (टक्केवारी)

२०१५-१६ ८७.१० टक्के

२०१६-१७ ७९.३९ २०१७-१८ २६.१३ २०१८-१९ ३१.७९ २०१९-२० २६.७९ २०२०-२१ ५४.०० --कर्जमुक्तीचा लाभ मिळालेले शेतकरी--

१,६९,५९६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा जिल्ह्यात लाभ मिळाला. ११२१.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती आतापर्यंत या शेतकऱ्यांना मिळाली. २५००० शेतकरी अद्यापही कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

५,३०० शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणिकरण रखडलेले आहे.