शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमुक्ती योजनेमुळे पीककर्ज वाटपात बँका मेहरबान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:30 IST

बुलडाणा : गेल्या वर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ ५९६ शेतकऱ्यांना ११२१ कोटी ४० लाख रुपयांची ...

बुलडाणा : गेल्या वर्षी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६९ ५९६ शेतकऱ्यांना ११२१ कोटी ४० लाख रुपयांची पीककर्ज माफी मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर बँकांनीही जिल्ह्यात २०१६ नंतरचे विक्रमी पीककर्ज वाटप केले आहे. परिणामी कोरोना संकटाच्या काळात जेथे सर्व अर्थकारण ठप्प झाले होते तेथे कृषी क्षेत्राने जिल्ह्याच्या अर्थकारणास चांगला हातभार लावल्याचे आर्थिक वर्षाच्या अखेरीस स्पष्ट होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात गेल्या वर्षी २ लाख १९ हजार ७८२ शेतकऱ्यांना २ हजार ७३३ कोटी ७२ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप करण्याचे वार्षिक पतआराखड्यातंर्गत बँकांना उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी खरीप व रब्बी मिळून जिल्ह्यातील १ लाख ८० हजार ७४१ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार ४८४ कोटी १७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. एकूण उद्दिष्टाच्या ते ५४ टक्के होते. परिणामी २०१७ नंतरचे हे विक्रमी पीककर्ज वाटप म्हणावे लागले.

यामध्ये खरपी हंगामात २ हजार ४६० कोटी ३५ लाख रुपये पीककर्ज १ लाख ७९ हजार ४७१ शेतकऱ्यांना वाटपाचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ लाख ५३ हजार ९५५ शेतकऱ्यांना बँकांनी १ हजार २६० कोटी ५४ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बी हंगामात ४० हजार ३११ शेतकऱ्यांना २७३ कोटी ३७ लाख रुपयांचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले गेले होते. त्यापैकी २६ हजार ७८६ शेतकऱ्यांना बँकांनी २२३ कोटी ६३ लाख रुपयांचे पीककर्ज वाटप केले. रब्बीच्या एकूण उद्दिष्टाच्या ८२ टक्के वाटप यंदा झालेले आहे. जिल्ह्याचा एकंदरीत विचार करता २०१५-१६ या आर्थिक वर्षानंतर प्रथमच पात्र असलेल्या शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करण्याचा उच्चांक करण्यात आला आहे. ही अैाद्योगिकदृष्ट्या मागास असलेल्या बुलडाणा जिल्ह्याच्या दृष्टीने कृषी क्षेत्रासाठीची दिलासादायक बाब म्हणावी लागले.

--सहा वर्षांत वाटप झालेले पीक कर्ज--

वर्षे कर्जवाटप (टक्केवारी)

२०१५-१६ ८७.१० टक्के

२०१६-१७ ७९.३९ २०१७-१८ २६.१३ २०१८-१९ ३१.७९ २०१९-२० २६.७९ २०२०-२१ ५४.०० --कर्जमुक्तीचा लाभ मिळालेले शेतकरी--

१,६९,५९६ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा जिल्ह्यात लाभ मिळाला. ११२१.२१ कोटी रुपयांची कर्जमुक्ती आतापर्यंत या शेतकऱ्यांना मिळाली. २५००० शेतकरी अद्यापही कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित आहेत.

५,३०० शेतकऱ्यांचे अद्याप आधार प्रमाणिकरण रखडलेले आहे.