शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

एक किलो मिठाची थैली २२०१ रुपयांत, तर अर्धा किलोसाठी ११००

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:38 IST

नायगाव दत्तापूर : येथील हनुमान मंदिरात पारायण व महाप्रसादाची परंपरा गत १६९ वर्षांपासून जपली जात आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी ...

नायगाव दत्तापूर : येथील हनुमान मंदिरात पारायण व महाप्रसादाची परंपरा गत १६९ वर्षांपासून जपली जात आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी येथे लोकवर्गणीतून महाप्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता झाली. त्यानंतर उरलेल्या धान्याची दुसऱ्या दिवशी २० सप्टेंबरला हार्राशी करण्यात आली. या वेळी भाविकांनी एक किलो मिठाची थैली २२०१ रुपयांत, तर अर्धा किलोसाठी ११०० रुपये देऊन मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी हातभार लावला.

येथील गावाचे ठाण म्हणून ओळख असलेल्या हनुमान मंदिरात सर्व जातीधर्मीयांच्या एकात्मतेचे दर्शन होते. या मंदिरात फार पूर्वीपासून दरवर्षी आषाढी एकादशीला एक महिना पारायण करण्याची परंपरा सुरू आहे. त्याच ठिकाणी गणेशाची स्थापना व विसर्जनावेळी जोड अमृत योग म्हणून सर्व गावकऱ्यांची गहू, तांदूळ आणि तूरडाळ वर्गणी जमा करून संपूर्ण गावाचा १० क्विंटलचा महाप्रसाद येथे होतो. त्यात सर्व गावकरी आनंदाने सहभागी होत असतात. परंतु मंदिराचा जीर्णोद्धार करण्यासाठी व विकास करण्यासाठी ६ नवयुवक मंडळी प्रयत्न करीत आहेत. मंदिराचे पुजारी म्हणून येथील गजानन तुकाराम निकम हे नि:शुल्क आपली अखंड सेवा देत आहेत. १६९ वर्षांची जुनी परंपरा आजही जोपासत पारायणाची सांगता करण्यात आली. गणरायाची मिरवणूक टाळाच्या गजरात व मृदंगाच्या निनादात काढण्यात आली. महिलांनी अंगणात सडे, रांगोळी काढत फुलांचा वर्षाव केला. संपूर्ण दिवस भक्तिमय होऊन १९ सप्टेंबर रोजी १० क्विंटलचा भंडारा सर्व गावकऱ्यांच्या सहभागातून पार पडला.

अशी झाली हार्राशी

२० सप्टेंंबर रोजी उरलेल्या धान्याची दुसऱ्या दिवशी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत हार्राशी पार पडली. यात मंदिराचे धान्य घेण्यासाठी गावकऱ्यांतून चढाओढ होत असते. त्यात उरलेल्या धान्यातून एक किलो मिठाची थैली येथील विजय दत्तात्रय निकम यांनी २२०१ रुपयांत घेतली तर अर्धा किलो मिठाची थैली ११०० रुपयांपर्यंत बऱ्याच मंडळींनी घेतली. बाकी उरलेले धान्यही बाजाराच्या पाच पट भावांत विकत घेऊन मंदिराला हातभार लावण्याचे काम दरवर्षी येथे गावकरी मोठ्या आनंदाने करीत आहेत.