शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अजिम नवाज राही यांच्या कविता आता सोलापूर विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या ...

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच करण्यात आलेला आहे, तर आता २०२१ च्या नवीन सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमामध्ये ‘व्यवहाराचा काळा घोडा’ कविता संग्रहातील कवितांचा समावेश करण्यात आला असल्याने अजीम नवाज राही यांच्या वस्तुनिष्ठ शब्दसाधनेचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता १० वी व इयत्ता ११ वीच्या पाठ्यपुस्तकात कविता संग्रहाच्या समावेशानंतर अजीम नवाज राही यांच्या शब्दसंपदेने कोल्हापूर विद्यापीठापर्यंतचा प्रशंसनीय पल्ला गाठला होता; तर आता त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दखल घेऊन अख्खा कवितासंग्रह बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यापूर्वी त्यांच्या कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड, मुंबई विद्यापीठ, मुंबई, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अशा महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांत अजीम नवाज राही यांच्या साहित्यसंपदेच्या समावेशाच्या माध्यमातून वैदर्भीय वाङ्मय परंपरेचा पर्यायाने बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य परंपरेचा आभाळउंचीचा सन्मान झाला आहे. महाराष्ट्राच्या नऊ विद्यापीठांत राहींच्या कवितांचा समावेश होणे हा तसा वाङ्मयीन विक्रमच. सोलापूर विद्यापीठाने व्यवहाराचा काळा घोड्याचं बी. ए.तृतीय वर्षात समावेश केल्याबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, मराठी विभागप्रमुख प्रा. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राही यांनी आभार मानले आहे.

चर्चेतील कवी-

नव्वदोत्तरीनंतर मराठी कवितेत ज्या कवींची नावे ताकदीने पुढे आली, त्या नामावलीत अजीम नवाज राही यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या कवितेत गावमातीत राबणाऱ्या परिघावरच्या कष्टकरी, सर्वहारा वर्गाच्या वस्तुनिष्ठ वेदना बोलक्या होतात. त्यांचा अख्खा शब्दप्रवाह आशयघन, वस्तुनिष्ठ अस्सल सल असलेला. जगणे व कवितेचे एकरूपत्व अधोरेखित करणारा म्हणावा लागेल. आतापर्यंत त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार त्यांच्या या तीन कवितासंग्रहांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील ११ नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत.