शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

अजिम नवाज राही यांच्या कविता आता सोलापूर विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या ...

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच करण्यात आलेला आहे, तर आता २०२१ च्या नवीन सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमामध्ये ‘व्यवहाराचा काळा घोडा’ कविता संग्रहातील कवितांचा समावेश करण्यात आला असल्याने अजीम नवाज राही यांच्या वस्तुनिष्ठ शब्दसाधनेचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता १० वी व इयत्ता ११ वीच्या पाठ्यपुस्तकात कविता संग्रहाच्या समावेशानंतर अजीम नवाज राही यांच्या शब्दसंपदेने कोल्हापूर विद्यापीठापर्यंतचा प्रशंसनीय पल्ला गाठला होता; तर आता त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दखल घेऊन अख्खा कवितासंग्रह बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यापूर्वी त्यांच्या कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड, मुंबई विद्यापीठ, मुंबई, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अशा महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांत अजीम नवाज राही यांच्या साहित्यसंपदेच्या समावेशाच्या माध्यमातून वैदर्भीय वाङ्मय परंपरेचा पर्यायाने बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य परंपरेचा आभाळउंचीचा सन्मान झाला आहे. महाराष्ट्राच्या नऊ विद्यापीठांत राहींच्या कवितांचा समावेश होणे हा तसा वाङ्मयीन विक्रमच. सोलापूर विद्यापीठाने व्यवहाराचा काळा घोड्याचं बी. ए.तृतीय वर्षात समावेश केल्याबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, मराठी विभागप्रमुख प्रा. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राही यांनी आभार मानले आहे.

चर्चेतील कवी-

नव्वदोत्तरीनंतर मराठी कवितेत ज्या कवींची नावे ताकदीने पुढे आली, त्या नामावलीत अजीम नवाज राही यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या कवितेत गावमातीत राबणाऱ्या परिघावरच्या कष्टकरी, सर्वहारा वर्गाच्या वस्तुनिष्ठ वेदना बोलक्या होतात. त्यांचा अख्खा शब्दप्रवाह आशयघन, वस्तुनिष्ठ अस्सल सल असलेला. जगणे व कवितेचे एकरूपत्व अधोरेखित करणारा म्हणावा लागेल. आतापर्यंत त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार त्यांच्या या तीन कवितासंग्रहांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील ११ नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत.