शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

अजिम नवाज राही यांच्या कविता आता सोलापूर विद्यापीठात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:40 IST

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या ...

‘कल्लोळातला एकांत’ आणि ‘वर्तमानाचा वतनदार’ या तीन दर्जेदार सकस कवितासंग्रहातील पाच कवितांचा समावेश शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या बी. ए.द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात यापूर्वीच करण्यात आलेला आहे, तर आता २०२१ च्या नवीन सत्रामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमामध्ये ‘व्यवहाराचा काळा घोडा’ कविता संग्रहातील कवितांचा समावेश करण्यात आला असल्याने अजीम नवाज राही यांच्या वस्तुनिष्ठ शब्दसाधनेचा सोलापूर विद्यापीठाकडून सन्मान करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाच्या इयत्ता १० वी व इयत्ता ११ वीच्या पाठ्यपुस्तकात कविता संग्रहाच्या समावेशानंतर अजीम नवाज राही यांच्या शब्दसंपदेने कोल्हापूर विद्यापीठापर्यंतचा प्रशंसनीय पल्ला गाठला होता; तर आता त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा या कविता संग्रहाचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने दखल घेऊन अख्खा कवितासंग्रह बी. ए. भाग ३ च्या अभ्यासक्रमात समावेश केला आहे. यापूर्वी त्यांच्या कविता संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ, नांदेड, मुंबई विद्यापीठ, मुंबई, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर अशा महाराष्ट्रातील नऊ विद्यापीठांत अजीम नवाज राही यांच्या साहित्यसंपदेच्या समावेशाच्या माध्यमातून वैदर्भीय वाङ्मय परंपरेचा पर्यायाने बुलडाणा जिल्ह्याच्या साहित्य परंपरेचा आभाळउंचीचा सन्मान झाला आहे. महाराष्ट्राच्या नऊ विद्यापीठांत राहींच्या कवितांचा समावेश होणे हा तसा वाङ्मयीन विक्रमच. सोलापूर विद्यापीठाने व्यवहाराचा काळा घोड्याचं बी. ए.तृतीय वर्षात समावेश केल्याबद्दल सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू, मराठी विभागप्रमुख प्रा. शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे राही यांनी आभार मानले आहे.

चर्चेतील कवी-

नव्वदोत्तरीनंतर मराठी कवितेत ज्या कवींची नावे ताकदीने पुढे आली, त्या नामावलीत अजीम नवाज राही यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांच्या कवितेत गावमातीत राबणाऱ्या परिघावरच्या कष्टकरी, सर्वहारा वर्गाच्या वस्तुनिष्ठ वेदना बोलक्या होतात. त्यांचा अख्खा शब्दप्रवाह आशयघन, वस्तुनिष्ठ अस्सल सल असलेला. जगणे व कवितेचे एकरूपत्व अधोरेखित करणारा म्हणावा लागेल. आतापर्यंत त्यांच्या व्यवहाराचा काळा घोडा, कल्लोळातला एकांत, वर्तमानाचा वतनदार त्यांच्या या तीन कवितासंग्रहांना आतापर्यंत साहित्य क्षेत्रातील ११ नामांकित पुरस्कार मिळालेले आहेत.