शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गाेठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST

रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी तालुक्यात वेग घेतला आहे. शेतकरी खरिपात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या मूठभर पीक विकून रब्बी हंगामाची पेरणी केली ...

रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी तालुक्यात वेग घेतला आहे. शेतकरी खरिपात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या मूठभर पीक विकून रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ७० टक्के रब्बी पेरणी आटोपली असून, या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. त्यात दिवसाला वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू राहतो, तर वन्यप्राणी अंकुरलेल्या गहू, हरभऱ्याच्या कोवळ्या रोपांवर ताव मारत आहेत. काही शेतात शेतकऱ्यांनी पेरलेले रब्बी बियाणे रानडुकरे उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले असून, रात्री पिकांना पाणी देण्यासह वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.

वन्यप्राण्यांचा हैदोस सुरूच

खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाकडे आशेने पाहू लागले आहेत. तथापि, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलास लागूनच आहे. या जंगलातील हरीण, रानडुक्कर हे प्राणी अंकुरलेले पीक फस्त करीत आहेत. शिवाय पेरलेले बियाणे उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत जागरण करून पिकाचे राखण करावे लागत आहे.