शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

गाेठवणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांचे जागरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:30 IST

रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी तालुक्यात वेग घेतला आहे. शेतकरी खरिपात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या मूठभर पीक विकून रब्बी हंगामाची पेरणी केली ...

रब्बी हंगामाच्या पेरण्यांनी तालुक्यात वेग घेतला आहे. शेतकरी खरिपात नैसर्गिक आपत्तीतून वाचलेल्या मूठभर पीक विकून रब्बी हंगामाची पेरणी केली आहे. जिल्ह्यात ७० टक्के रब्बी पेरणी आटोपली असून, या पिकांना पाणी देणे आवश्यक आहे. त्यात दिवसाला वीजपुरवठ्याचा खेळखंडोबा सुरू राहतो, तर वन्यप्राणी अंकुरलेल्या गहू, हरभऱ्याच्या कोवळ्या रोपांवर ताव मारत आहेत. काही शेतात शेतकऱ्यांनी पेरलेले रब्बी बियाणे रानडुकरे उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर पुन्हा संकट ओढावले असून, रात्री पिकांना पाणी देण्यासह वन्यप्राण्यांपासून पिके वाचविण्यासाठी शेतकरी जागरण करीत असल्याचे चित्र तालुक्यात पहायला मिळत आहे.

वन्यप्राण्यांचा हैदोस सुरूच

खरीप हंगामात सततच्या पावसामुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी रब्बी हंगामाकडे आशेने पाहू लागले आहेत. तथापि, जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे शेत जंगलास लागूनच आहे. या जंगलातील हरीण, रानडुक्कर हे प्राणी अंकुरलेले पीक फस्त करीत आहेत. शिवाय पेरलेले बियाणे उकरून खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना कुडकुडणाऱ्या थंडीत जागरण करून पिकाचे राखण करावे लागत आहे.