शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

भरपाईसाठी विमा कंपनीची टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2020 05:00 IST

कृषी कर्ज घेत असताना शेतकऱ्यांचे खात्यामधून पैसे कापून  विमा कंपन्या पिकांना सुरक्षा कवच देतात. परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवली असतांना मात्र शेतकऱ्यांना मदतीकरिता वंचित राहावे लागत आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकरी कृषी कर्ज घेतले आहेत.

ठळक मुद्देशेतकरी अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत : सर्वेक्षणासाठी विमा प्रतिनिधी फिरेनात

लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) :  तुडतुडा रोगाने धान  पिक  फस्त  झाले आहे. अशावेळी विमा  कंपन्यानी  बळीराजाला मदतीचा हात  देण्याची गरज आहे. मात्र  प्रत्यक्षात विमा कंपन्या कीड रोगाने नुकसान झालेल्या पिकांच्या नुसानभरपाई देण्यास टाळाटाळ करीत आहेत. पिकांना सुरक्षा कवच देण्यासाठी शासनाकडून   पंतप्रधान पिक विमा योजना  राबविला जाते. परंतु जिल्ह्यात नैसर्गिक आपत्ती ओढवली असतांना मात्र शेतकऱ्यांना मदतीकरिता  विमा कंपनीकडून प्रतिक्षा  करावी  लागत आहे.  अनेकांना आजही मदतीसाठी ताटकळत राहावे लागत आहे. विमा कंपन्याचे विरोधात सिहोरा परिसरात सर्वपक्षीय आंदोलन होणार आहे. कृषी कर्ज घेत असताना शेतकऱ्यांचे खात्यामधून पैसे कापून  विमा कंपन्या पिकांना सुरक्षा कवच देतात. परंतु नैसर्गिक आपत्ती ओढवली असतांना मात्र शेतकऱ्यांना मदतीकरिता वंचित राहावे लागत आहे. खरीप हंगामापूर्वी शेतकरी कृषी कर्ज घेतले आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि बँकेच्या  माध्यमातून विमा कंपन्यांना पिक विम्याची राशी दिली जात आहे. नैसर्गिक आपत्तीत  हा एक प्रकारचा सुरक्षा कवच आहे. परंतु  आपत्ती ओढवल्यावरही विमा कंपन्या हात वर करीत आहेत. यामुळे विमा कंपन्या शेतकऱ्यांची लूट करीत असल्याचे आरोप होत आहे.  धान पिकांचे पूर, परतीचा पाऊस, मावा तुडतुडा रोगाने प्रचंड नुकसान झाले आहे. ही नैसर्गिक आपत्ती असताना सर्वेक्षण करीता विमा कंपन्यानी शेतकऱ्यांचे शेत शिवारात धाव घेतली नाही. बँकेचे व्यवस्थापन मंडळ मनावर घेत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही. तुडतुडा रोगाने शेत शिवारात फक्त तनस उभी आहे. कृषी विभागाच्या वतीने दखल घेण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना धान शेत शिवारात उभे ठेवण्याचे विमा कंपनीकडून सांगण्यात येत आहे.  मात्र तुडतुड्याच्या भितीने कधी पर्यंत धान उभे ठेवणार आहेात. हे सांगायला मात्र कृषी विभाग विसरत  आहे. उन्हाळी धान पिकांची लागवड शेतकरी करीत आहेत. खरीप हंगामातील नुकसान झालेले धान शेत शिवारात उभे ठेवणे शक्य नाही. उन्हाळी धान पिकांचे उत्पादन करीता शेतकऱ्यांची लगबग सुरू झाली आहे.  शेतकरी चौफेर संकटात असताना मदतीचा हात दिला जात नाही. विमा कंपन्या शेतकऱ्यांचे पैसे कपात करीत आहेत. मदतीचा हात देताना कानाडोळा करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासन या कंपन्याचे कारवाईचा बडगा उगारत नाही. या विमा कंपन्याना चपराक दिली जात नाही. यामुळे विमा कंपन्याची हिंमत  वाढली आहे. शेतकरी राज्य शासनाला दोष देत आहेत. परंतु विमा कंपन्या आपली  जबाबदारी सांभाळत नाही. यात सरकारचा काडीमात्र  दोष नाही. बँक आणि विमा कंपन्याचे प्रशासन दोषी आहे. गत वर्षात मावा, तुडतुडा रोगाने धान पिकांचे नुकसान झाल्यानंतर चुल्हाड बस स्थानकावर रास्ता रोको आंदोलन झाले होते. कंपन्या खडबडून जाग्या झाल्या होत्या. तुडतुडा नुकसानीची आर्थिक मदत जमा करण्यात आली होती. परंतु असे चित्र यंदा नाही. शेतकरी मदतीकरिता ओरड करीत असताना विमा कंपन्याचे प्रतिनिधी टाळाटाळ करत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

नुकसानीचा आकडा फुगणारसिहोरा परिसरात निम्याहून अधीक गावात पुराचे पाण्याने धान पिकांचे होत्याचे नव्हते केले. हलक्या धान पिकाला परतीच्या पावसाने झोडपले, या नंतर भारी धान पिकावर शेतकऱ्यांचे अपेक्षा वाढल्या असता मावा तुडतुडा रोगाने सारे काही चौपट केले. घरी तनीस सुध्दा आणता आली नाही. शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले, नैसर्गिक आपत्तीने सर्वकाही हिरावले. परंतु विमा कंपन्या, कृषी विभाग, बँक प्रशासन गंभीर झाले नाही. यामुळे असंतोष खदखदत आहे. राज्य शासनाने या संदर्भात दखल घेण्याची मागणी आहे.

सिहोरा परिसरात मावा तुडतुडा रोगाने धान पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बँक आणि विमा कंपन्यांनी नुकसानग्रस्त धान पिकांची दखल घेतली पाहिजे. कृषी विभागाने तात्काळ सर्वेक्षण करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे मदतीकरिता राज्य शासन कटिबद्द असल्याने शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. - धनेद्र तुरकर, माजी सभापती सिहोरा. 

गेल्या वर्षात युती शासनाचे कार्यकाळात मावा तुडतुडा अंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात आली होती. बचत खात्यात पैसे जमा करण्यात आले होते. यामुळे शेतकऱ्यांना आधार मिळाला होता, परंतु महाआघाडी शासनाने अशा स्वरूपाची मदत जाहीर केली नाही. यामुळे आंदोलन करण्यात येईल.- किशोर राहगडाले,  युवा नेते भाजप, बपेरा.