शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र - फुंडकर

By admin | Updated: June 13, 2017 00:18 IST

‘सबका साथ... सबका विकास’ संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना गत तीन वर्षांच्या कार्यकाळात जन सामान्यांसाठी सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे आज देशात चैतन्याचे वातावरण असून सर्व घटकांचा विकास होत आहे. अशा कल्याणकारी योजनांमुळे देशातील शेवटच्या घटकाचा विकास होत आहे. शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाच्यावतीने सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘सबका साथ... सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प सभापती श्वेताताई महाले, सुनील गव्हाळे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक विलास ब्राह्मणकर, व्यवस्थापक राकेश जवादे, महेश पाटील, सचीन देशमुख, मोहन शर्मा, नंदू अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षेचे कवच उपलब्ध करून दिल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पीक विमा योजनेत गतवर्षी दीड कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या सरकारने गतवर्षी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून १६०० कोटी रूपयांची मदत दिली. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागण्याची गरज नाही. तसेच अन्य शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचा दरही कमी आहे. पंतप्रधान सिंचन योजना केंद्र सरकारने अंमलात आणली असून, राज्यातील ५० टक्के अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी दिला आहे. गत काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्जमाफीवरून अशांततेचे वातावरण होते. मात्र, राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, राज्यामध्ये ६ लाख मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती व आमदार आकाश फुंडकर यांनी केंद्र सरकारच्या दोन वर्षातील योजनांचा लेखा-जोखा मांडला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. माजी आमदार धृपदराव सावळे यांनी आभार मानले.