शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
इन्फोसिसचा ऑस्ट्रेलियात मोठा व्यवहार! १३०० कोटी रुपयांमध्ये खरेदी केली 'ही' कंपनी
5
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताची मिसाईल ताकद पाहून घाबरला पाकिस्तान; आता उचललं 'हे' मोठं पाऊल!
6
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
7
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
8
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
9
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
10
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
11
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
12
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
13
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
14
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
15
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
16
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
17
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
18
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
19
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
20
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र - फुंडकर

By admin | Updated: June 13, 2017 00:18 IST

‘सबका साथ... सबका विकास’ संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना गत तीन वर्षांच्या कार्यकाळात जन सामान्यांसाठी सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे आज देशात चैतन्याचे वातावरण असून सर्व घटकांचा विकास होत आहे. अशा कल्याणकारी योजनांमुळे देशातील शेवटच्या घटकाचा विकास होत आहे. शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाच्यावतीने सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘सबका साथ... सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प सभापती श्वेताताई महाले, सुनील गव्हाळे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक विलास ब्राह्मणकर, व्यवस्थापक राकेश जवादे, महेश पाटील, सचीन देशमुख, मोहन शर्मा, नंदू अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षेचे कवच उपलब्ध करून दिल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पीक विमा योजनेत गतवर्षी दीड कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या सरकारने गतवर्षी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून १६०० कोटी रूपयांची मदत दिली. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागण्याची गरज नाही. तसेच अन्य शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचा दरही कमी आहे. पंतप्रधान सिंचन योजना केंद्र सरकारने अंमलात आणली असून, राज्यातील ५० टक्के अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी दिला आहे. गत काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्जमाफीवरून अशांततेचे वातावरण होते. मात्र, राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, राज्यामध्ये ६ लाख मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती व आमदार आकाश फुंडकर यांनी केंद्र सरकारच्या दोन वर्षातील योजनांचा लेखा-जोखा मांडला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. माजी आमदार धृपदराव सावळे यांनी आभार मानले.