शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र - फुंडकर

By admin | Updated: June 13, 2017 00:18 IST

‘सबका साथ... सबका विकास’ संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : केंद्र व राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजना गत तीन वर्षांच्या कार्यकाळात जन सामान्यांसाठी सुरू केल्या आहेत. या योजनांमुळे आज देशात चैतन्याचे वातावरण असून सर्व घटकांचा विकास होत आहे. अशा कल्याणकारी योजनांमुळे देशातील शेवटच्या घटकाचा विकास होत आहे. शेतकऱ्यांना हवामानाची पूर्वसूचना देण्यासाठी राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी सोमवारी केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावती विभागाच्यावतीने सहकार विद्या मंदिरच्या सांस्कृतिक सभागृहात केंद्र सरकारला तीन वर्ष पूर्ण झाल्यामुळे ‘सबका साथ... सबका विकास’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, आ. आकाश फुंडकर, जि.प अध्यक्ष उमाताई तायडे, माजी आमदार धृपदराव सावळे, जि.प सभापती श्वेताताई महाले, सुनील गव्हाळे, जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा पोलीस अधीक्षक शशीकुमार मीणा, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक विलास ब्राह्मणकर, व्यवस्थापक राकेश जवादे, महेश पाटील, सचीन देशमुख, मोहन शर्मा, नंदू अग्रवाल, शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवंत आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. केंद्र शासनाने शेतकऱ्यांना पंतप्रधान कृषी पीक विमा योजनेच्या माध्यमातून आर्थिक सुरक्षेचे कवच उपलब्ध करून दिल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले, पीक विमा योजनेत गतवर्षी दीड कोटी शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या सरकारने गतवर्षी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेच्या माध्यमातून १६०० कोटी रूपयांची मदत दिली. या योजनेत सहभागी होण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागण्याची गरज नाही. तसेच अन्य शेतकऱ्यांसाठी विमा हप्त्याचा दरही कमी आहे. पंतप्रधान सिंचन योजना केंद्र सरकारने अंमलात आणली असून, राज्यातील ५० टक्के अपूर्ण असलेल्या सिंचन प्रकल्पांना निधी दिला आहे. गत काही दिवसांपासून राज्यामध्ये कर्जमाफीवरून अशांततेचे वातावरण होते. मात्र, राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देत त्यांना कर्जाच्या दुष्टचक्रातून बाहेर काढले आहे. जमिनीच्या आरोग्य पत्रिकेची माहिती देताना पालकमंत्री म्हणाले, राज्यामध्ये ६ लाख मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी खासदार प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती व आमदार आकाश फुंडकर यांनी केंद्र सरकारच्या दोन वर्षातील योजनांचा लेखा-जोखा मांडला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक सचिन देशमुख यांनी केले. माजी आमदार धृपदराव सावळे यांनी आभार मानले.