शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

मोहोतखेड येथील सरपंच पदाचा चावडीवर लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 20:53 IST

लोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देसरपंचपद विकल्या गेले ४ लाख २१ हजारात

लोकमत न्यूज नेटवर्कलोणार : लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतची निवडणूक प्रक्रिया सुरू असून आहे. तालुक्यातील मोहोतखेड येथे सरपंच पदासाठी जाहीरपणे चावडीवर लिलाव झाला असून, सरपंच पदासाठी चक्क ४ लाख २१ हजार रुपये इच्छुकाने बोली बोलुन सरपंच पदाची माळ गळयात घालुन घेण्याचा प्रयत्न केला.लोकशाही मार्गाने होणाºया निवडणुकीमध्ये वेगळेच रूप धारण केले असल्याचे नुकतेच उघड झाले आहे. याबाबत आचारसंहीताचा भंग केल्याप्रकरणी लहुशक्ती संग्राम परिषद महाराष्ट्र राज्याचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे यांनी निवडणुक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करून सदर सरपंच पदाचा लिलाव करणाºयांवर कडक कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाव्दारे केली आहे. लोणार तालुक्यातील ३९ ग्रामपंचायत व ३३९ ग्रामपंचायत सदस्यासाठी निवडणुक सुरू आहे. लोणार तालुक्यातील मोहोतखेड, निजामपुर, मातरखेड या तीन गाव मिळून एक  गटग्रामपंचायत आहे. सर्वात जास्त मतदान हे मोहोतखेड येथे असल्यामुळे या गावामध्ये सरपंच पदाचा जाहीर लिलाव झाल्याची घटना समोर आली आहे. या गावातील नेते मंडळीनी खुलेआम चावडीवरील लाउडस्पीकरवर सरपंच पदाचा लिलाव असल्याचे सांगुन लोकांना चावडीवर बोलाविले व सरपंच पदाचा लिलाव करुन लोकशाहीचे वाभाडे काढले. यामध्ये सर्वात अधिक बोली ४ लाख २१ हजार रुपये ठरली. मात्र मोहोतखेड या गावातील नेत्यांनी ईतर गावातील नागरिकांना विश्वासात घेतले नाही. एवढेच नव्हे तर त्यांनी मतदान जास्त असल्यामुळे एकतर्फी निर्णय घेतला व त्याप्रमाणे उमेदवारी अर्ज सादर केले. मात्र याबाबतची माहीती निजामपुर व मातरखेड येथील नागरिकांना लागताच त्यांनी याबाबत लहुशक्ती संग्राम परिषदेचे विदर्भ अध्यक्ष समाधान साठे यांच्याकडे तक्रार केली. त्यावर समाधान साठे यांनी नामनिर्देशन छाणनीपूर्वी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदन देउन सदर प्रक्रिया रद्द करून आचारंसहीतेचा भंग केल्याप्रकरणी दोषींवर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. लोकशाही मार्गाने होणाºया निवडणुका दडपशाही मार्गाने होत आहे. त्यामुळे जाहीर लिलाव करून अवैधरित्या सरपंच पदाचा उमेदवार ठरविणाºयांवर कडक कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.