शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

आठ रेती घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST

मधल्या काळात जवळपास दोन वर्षे न्यायालयीन प्रकरणे तथा पर्यावरण समितीच्या मान्यता अभावी जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे ...

मधल्या काळात जवळपास दोन वर्षे न्यायालयीन प्रकरणे तथा पर्यावरण समितीच्या मान्यता अभावी जिल्ह्यातील रेती घाटांचे लिलाव झाले नव्हते. त्यामुळे अवैध रेती उपशाचे प्रमाण वाढले होते. मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून आता टप्प्याटप्प्याने हे लिलाव होत असून, तिसऱ्या टप्प्यातील ८ रेती घाटांच्या लिलाव प्रक्रियेस प्रारंभ होत आहे.

दरम्यान, या आर्थिक वर्षात खनिकर्म विभागाला ९३ कोटी रुपयांचा महसूल मिळविण्याचे उद्दिष्ट देण्यात आले असून, त्यापैकी ६६ कोटी ४२ लाख २८ हजार रुपयांचा महसूल आतापर्यंत खनिकर्म विभागाने मिळविला आहे. पहिल्या टप्प्यात १२ रेती घाटांचा लिलाव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ६ रेती घाटांचा ५ कोटी २३ लाख रुपयांमध्ये लिलाव झाला होता. दरम्यान, दंडापोटी तथा अवैध उपसा प्रकरणांमध्ये खनिकर्म विभागाने ३ कोटी ५० लाख २३ हजार ९५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

अवैध रेती उपशाला लगाम लावण्यासाठी खनिकर्म विभाग सध्या प्रयत्नरत असून, त्यादृष्टीने महसूल विभागाची पथके सक्रिय आहेत. दरम्यान, अद्यापही जिल्ह्यातील ६० पैकी २४ रेती घाटांचे लिलाव बाकी असून, २५ मार्चपासून देऊळगाव राजा तालुक्यातील एक, नांदुरा तालुक्यातील सहा आणि शेगाव तालुक्यातील बोनगाव येथील एका रेती घाटाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दुसरीकडे सिंदखेड राजा, लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रेतीचे अवैध उत्खनन सुरू असून, त्याकडेही खनिकर्म विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.