शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीच्या निर्णयाकडे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 11:28 IST

Mahavikas Aghadi News महाविकास आघाडी एकत्र येते की या निवडणुका स्वतंत्रपणे सर्व पक्ष लढतात, याबाबत सध्या उत्सुकता आहे. 

ठळक मुद्देग्रामीण भागातील राजकारण सध्या तापलेले आहे. २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

बुलडाणा :  जिल्ह्यातील ५२७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या निवडणुकात महाविकास आघाडी एकत्र येते की या निवडणुका स्वतंत्रपणे सर्व पक्ष लढतात, याबाबत सध्या उत्सुकता आहे. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक ही गावपातळीवरची महत्त्वाची निवडणूक असून, ही निवडणूक राजकीय पक्ष त्यांच्या चिन्हावर लढत नाहीत; मात्र ग्रामपंचायत निवडणूक महाविकास आघाडी प्रसंगी एकत्रित लढण्यासंदर्भात विधीमंडळ अधिवेशन झाल्यानंतर निर्णय घेऊ शकते, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करत आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांच्या नेत्यांकडून अद्याप त्यासंदर्भातील सूतोवाच करण्यात आलेले नाही; मात्र जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात असा निर्णय होऊ शकतो; परंतु ही बाब वरिष्ठ स्तरावरूनच ठरेल असे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या जिल्हास्तरीय नेत्यांनी स्पष्ट केले.जिल्ह्यातील ८७० ग्रामपंचायतींपेकी मुदत संपलेल्या ५२७ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. निम्म्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतीमध्ये जिल्ह्यात निवडणूक होत असल्याने ग्रामीण भागातील राजकारण सध्या तापलेले आहे. १५ डिसेंबर रोजी निवडणुकीसंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध झाली असून, २३ ते ३० डिसेंबरदरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे.

स्थानिक गटातटांचे राजकारणमहाविकास आघाडी ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता कमी असून, गावपातळीवरील गटातटाचे राजकारण या निवडणुकीत प्रभावी असते. त्यामुळे हे पक्ष शक्यतो ग्रामपंचायत निवडणुकीत एकत्रित येण्याची शक्यता कमी आहे; मात्र परस्पर सहकार्य त्यांच्याकडून होऊ शकते.

ठरावीक पक्षांचा ग्रा. प. मध्ये दबदबा नाहीग्रामपंचायत निवडणूक पक्षीय चिन्हावर लढवल्या जात नाही. त्यामुळे ठरावीक पक्षांचा ग्रामपंचायतीमध्ये दबदबा आहे, असे म्हणता येणार नाही. ग्रामपातळीवरील राजकारण यात महत्त्वाचे असते. त्यामुळे स्थानिक प्रश्नांवर या निवडणुका होतील. ठरावीक पक्षांचे प्रभुत्व किंवा दबदबा ग्रामपंचायतीमध्ये फारसा दिसून येत नाही.

मोठ्या ग्रामपंचायतीत प्रयोगाची शक्यताजिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये महाविकास आघाडी एकत्र येऊन लढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याबाबत मात्र प्रत्यक्ष विधीमंडळ अधिवेशनानंतर पक्षीय पातळीवर काय सूचना येतात यावर गोष्टी अवलंबून आहेत. प्रसंगी येत्या दोन ते तीन दिवसात अशी बैठक होऊ शकते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाPoliticsराजकारणgram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक