शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख १० हजार शेतक-यांचे अर्ज भरणे बाकीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून सवलतीच्या दराने पीक कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते; परंतु गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. शेतकºयांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात नुकसान झाल्याने बहुतांश शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बँकेचे थकबाकीदार राहिले. शेतकरी बँक भरू शकले नाही. त्यामुळे शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध नियमांवर बोट ठेवून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनेक शेतकरी हे अर्ज भरू शकत नाहीत. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्याची पक्रिया कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या तीन एजन्सीमार्फत सुरू आहे. आपले सरकार, महा ई-सेवा केंद्र व संगाम केंद्रावर सदर अर्ज भरण्यात येत आहेत; परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यात विविध अडचणी येत असल्याने अनेक शेतकºयांना दररोज अर्ज भरण्यासाठी संबंधित केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात ३ लाख ४९ हजार शेतकरी पात्र असून, आतापर्यंत केवळ ४८ हजार ६६४ शेतकºयांनीच कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. आॅनलाइन अर्जाच्या या किचकट प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्जमाफी अर्जातील त्रुटी शिथिल करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाºयांसमोर निवेदनाचा खच वाढत आहे.