शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख १० हजार शेतक-यांचे अर्ज भरणे बाकीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून सवलतीच्या दराने पीक कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते; परंतु गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. शेतकºयांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात नुकसान झाल्याने बहुतांश शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बँकेचे थकबाकीदार राहिले. शेतकरी बँक भरू शकले नाही. त्यामुळे शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध नियमांवर बोट ठेवून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनेक शेतकरी हे अर्ज भरू शकत नाहीत. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्याची पक्रिया कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या तीन एजन्सीमार्फत सुरू आहे. आपले सरकार, महा ई-सेवा केंद्र व संगाम केंद्रावर सदर अर्ज भरण्यात येत आहेत; परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यात विविध अडचणी येत असल्याने अनेक शेतकºयांना दररोज अर्ज भरण्यासाठी संबंधित केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात ३ लाख ४९ हजार शेतकरी पात्र असून, आतापर्यंत केवळ ४८ हजार ६६४ शेतकºयांनीच कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. आॅनलाइन अर्जाच्या या किचकट प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्जमाफी अर्जातील त्रुटी शिथिल करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाºयांसमोर निवेदनाचा खच वाढत आहे.