शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
3
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
4
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
5
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
6
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
7
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
8
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
9
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
10
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
11
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
12
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
13
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
14
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
15
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
16
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
17
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
18
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
19
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
20
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम

बुलडाणा जिल्ह्यात ३ लाख १० हजार शेतक-यांचे अर्ज भरणे बाकीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 22:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून ...

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याकरिता शेतकºयांना विविध अडचणी येत असल्याने जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. कर्जमाफी अर्जाच्या या किचकट प्रक्रियेच्या विरोधात विरोधकांसह शेतकºयांची आक्रमकता वाढत असून, शासकीय अधिकाºयांसमोर दररोज निवेदनांचा पाऊस पडत आहे.केंद्र व राज्य शासनामार्फत शेतकºयांना बँकेकडून सवलतीच्या दराने पीक कर्ज उपलब्ध करून दिल्या जाते; परंतु गेल्या चार वर्षांत जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे खरीप व रब्बी हंगामात ५० पैसेपेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात आली होती. शेतकºयांचे खरीप व रब्बी दोन्ही हंगामात नुकसान झाल्याने बहुतांश शेतकरी पीक कर्जाची परतफेड करू शकले नाही. त्यामुळे अनेक शेतकरी बँकेचे थकबाकीदार राहिले. शेतकरी बँक भरू शकले नाही. त्यामुळे शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत ३० जून २०१६ पर्यंत दीड लाख रुपयांपर्यंत थकबाकीदार शेतकºयांना कर्जमाफी दिली. या कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आॅनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. विविध नियमांवर बोट ठेवून आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने अनेक शेतकरी हे अर्ज भरू शकत नाहीत. तसेच तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्याची पक्रिया कासव गतीने सुरू आहे. जिल्ह्यात अर्ज भरण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या तीन एजन्सीमार्फत सुरू आहे. आपले सरकार, महा ई-सेवा केंद्र व संगाम केंद्रावर सदर अर्ज भरण्यात येत आहेत; परंतु आॅनलाइन अर्ज भरण्यात विविध अडचणी येत असल्याने अनेक शेतकºयांना दररोज अर्ज भरण्यासाठी संबंधित केंद्रावर चकरा माराव्या लागत आहेत. ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ अंतर्गत कर्जमाफीसाठी जिल्ह्यात ३ लाख ४९ हजार शेतकरी पात्र असून, आतापर्यंत केवळ ४८ हजार ६६४ शेतकºयांनीच कर्जमाफीचे अर्ज भरले आहेत. आॅनलाइन अर्जाच्या या किचकट प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील कर्जमाफीसाठी पात्र शेतकºयांपैकी ३ लाख १० हजार ३३६ शेतकºयांचे अर्ज भरणे अद्याप बाकी आहे. त्यामुळे या शेतकºयांना कर्जमाफीपासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी कर्जमाफी अर्जातील त्रुटी शिथिल करण्याच्या मागणीसाठी कृषी मंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाºयांसमोर निवेदनाचा खच वाढत आहे.