शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई

By admin | Updated: September 8, 2014 01:37 IST

जादा किंमत वसूल करण्यासाठी दाखविल्या जाते टंचाई.

खामगाव : यावर्षी शेतकरी यावर्षी आस्मानी संकटाने त्रस्त झाला असतानाच आता ऐनवेळी पिकांना आवश्यक असलेल्या युरीयासाठी त्यांची अडवणूक केल्या जात असून जादा किंमत दिली तर सहजरित्या युरीया उपलब्ध होत आहे. २९0 रुपये निर्धारित किंमत असलेल्या युरीयाच्या एका बॅगसाठी २९0 रुपये ऐवजी ३५0 ते ४00 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या विदर्भातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी अशा खत विक्रेत्यांवर कडक कारवाई करुन खत विकत मागणार्‍या शेतकर्‍यांना तात्काळ खत उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात विशेष म्हणजे विदर्भात यावर्षी आता येईल, नंतर येईल असे करता करता पावसाने तब्बल अडीच महिने हुलकावणी दिली. यामुळे अनेकांना वेळेवर पेरणी कर ता न आल्याने उत्पादन व उत्पन्नाचा विचार न करता येणारी पिके घ्यावी लागली. तर अनेकांना पहिल्या पेरणीचा खर्च सहन करुन दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे. यावर्षी मूग वा उडिदाची पिके घेता न आल्याने अद्याप शेतकर्‍यांच्या हाती पिकाचा पैसा नाही. त्यामुळे शेतीमशागतीसाठी उसनवार करावी लागत आहे. त्यात आ ता तूर्त आस्मानी संकट टळल्याने पिकांचा स्थिती चांगली आहे. मात्र युरीया खत पिकांना देण्याची वेळ आल्याने शेतकरी युरीयासाठी गर्दी करीत आहेत. मात्र शेतकर्‍यांची ही गरज ओळखून अनेक खतविक्रेत श्रीमंतीच्या हव्यासाने शेतकर्‍यांची अडवणूक करीत असून युरीया नसल्याने ठरलेले उत्तर शेतकर्‍यांना देत आहेत. तर २९0 रुपये प्रतिबॅग ( ५0 किलो) साठी ३५0 रुपये देणार्‍यांना सहजच हव्या तेवढय़ा युरीया बॅग उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या जादा वसुलीबाबत विविध कारणे सुध्दा शेतकर्‍यांना सांगण्यात येत आहेत. मात्र अशी अडवणूक सुरु असताना अद्याप एकाही अशा खतविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. तर गरजेपोटी अक्कल नसते त्यामुळे शेतकरी सुध्दा तक्रारीच्या भानगडीत न पडता नेहमीच घ्यावे लागते त्यामुळे जादा पैसे देवून युरीया खताची खरेदी करीत आहेत. यामुळे अधिकारी सुध्दा त्याकडे कानाडोळा करीत आहेत. मात्र भारत या कृषीप्रधान समजल्या जाणार्‍या देशा तील जगाचा पोशिंदा शेतकर्‍यांची ही अडवणूक थांबविण्यासाठी अधिकार्‍यांनी अशा ख तविक्रेत्यांवर कारवाई करुन शेतकर्‍यांना निर्धारित भावात खत उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. * शेतकर्‍यांची अडवणूक करुन साठा असतानाही युरीया व इतर रासायनिक खतांची जादा भावाने विक्री करणे हे दरवर्षीचेच झाले आहे. मात्र अल्पभूधारक तसेच बहुतांश शेतकर्‍यांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते खत सुरुवातीला घेवू शकत नाही. त्यामुळे ऐनवेळी ही अडवणूक नित्याचे झाले आहे. मात्र त्यावर अद्यापही संबंधित कृषी विभाग प्रतिबंध लावू शकला नाही.

* अनेक खतविक्रेत्यांजवळील युरीयाचा साठा विक्री झाला आहे. मात्र ग्राहकी असल्याने तसेच शेतकरी सुध्दा गरजेपोटी जादा पैसे देत असल्याने मोठय़ा खतविक्रेत्यांकडून जादा भावाने आणून युरीयाची विक्री केल्या जात आहे.