शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
3
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
4
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
5
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
6
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
7
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
8
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
9
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
10
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
11
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
12
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
13
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
14
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
15
तुळजाभवानी मंदिरात देणगी दर्शन पासच्या शुल्कात दुप्पट वाढ, मात्र अभिषेकाची संख्या वाढवली
16
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
17
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
18
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
19
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
20
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!

बुलडाणा जिल्ह्यात युरियाची कृत्रिम टंचाई

By admin | Updated: September 8, 2014 01:37 IST

जादा किंमत वसूल करण्यासाठी दाखविल्या जाते टंचाई.

खामगाव : यावर्षी शेतकरी यावर्षी आस्मानी संकटाने त्रस्त झाला असतानाच आता ऐनवेळी पिकांना आवश्यक असलेल्या युरीयासाठी त्यांची अडवणूक केल्या जात असून जादा किंमत दिली तर सहजरित्या युरीया उपलब्ध होत आहे. २९0 रुपये निर्धारित किंमत असलेल्या युरीयाच्या एका बॅगसाठी २९0 रुपये ऐवजी ३५0 ते ४00 रुपये द्यावे लागत आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख निर्माण होत असलेल्या विदर्भातील संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी अशा खत विक्रेत्यांवर कडक कारवाई करुन खत विकत मागणार्‍या शेतकर्‍यांना तात्काळ खत उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. यावर्षी संपूर्ण राज्यात विशेष म्हणजे विदर्भात यावर्षी आता येईल, नंतर येईल असे करता करता पावसाने तब्बल अडीच महिने हुलकावणी दिली. यामुळे अनेकांना वेळेवर पेरणी कर ता न आल्याने उत्पादन व उत्पन्नाचा विचार न करता येणारी पिके घ्यावी लागली. तर अनेकांना पहिल्या पेरणीचा खर्च सहन करुन दुबार पेरणी करावी लागली. त्यामुळे शेतकरी आधीच चिंताग्रस्त आहे. यावर्षी मूग वा उडिदाची पिके घेता न आल्याने अद्याप शेतकर्‍यांच्या हाती पिकाचा पैसा नाही. त्यामुळे शेतीमशागतीसाठी उसनवार करावी लागत आहे. त्यात आ ता तूर्त आस्मानी संकट टळल्याने पिकांचा स्थिती चांगली आहे. मात्र युरीया खत पिकांना देण्याची वेळ आल्याने शेतकरी युरीयासाठी गर्दी करीत आहेत. मात्र शेतकर्‍यांची ही गरज ओळखून अनेक खतविक्रेत श्रीमंतीच्या हव्यासाने शेतकर्‍यांची अडवणूक करीत असून युरीया नसल्याने ठरलेले उत्तर शेतकर्‍यांना देत आहेत. तर २९0 रुपये प्रतिबॅग ( ५0 किलो) साठी ३५0 रुपये देणार्‍यांना सहजच हव्या तेवढय़ा युरीया बॅग उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. या जादा वसुलीबाबत विविध कारणे सुध्दा शेतकर्‍यांना सांगण्यात येत आहेत. मात्र अशी अडवणूक सुरु असताना अद्याप एकाही अशा खतविक्रेत्यावर कारवाई झाली नाही. तर गरजेपोटी अक्कल नसते त्यामुळे शेतकरी सुध्दा तक्रारीच्या भानगडीत न पडता नेहमीच घ्यावे लागते त्यामुळे जादा पैसे देवून युरीया खताची खरेदी करीत आहेत. यामुळे अधिकारी सुध्दा त्याकडे कानाडोळा करीत आहेत. मात्र भारत या कृषीप्रधान समजल्या जाणार्‍या देशा तील जगाचा पोशिंदा शेतकर्‍यांची ही अडवणूक थांबविण्यासाठी अधिकार्‍यांनी अशा ख तविक्रेत्यांवर कारवाई करुन शेतकर्‍यांना निर्धारित भावात खत उपलब्ध करुन देण्याची गरज निर्माण झाली आहे. * शेतकर्‍यांची अडवणूक करुन साठा असतानाही युरीया व इतर रासायनिक खतांची जादा भावाने विक्री करणे हे दरवर्षीचेच झाले आहे. मात्र अल्पभूधारक तसेच बहुतांश शेतकर्‍यांची परिस्थिती हलाखीची असल्याने ते खत सुरुवातीला घेवू शकत नाही. त्यामुळे ऐनवेळी ही अडवणूक नित्याचे झाले आहे. मात्र त्यावर अद्यापही संबंधित कृषी विभाग प्रतिबंध लावू शकला नाही.

* अनेक खतविक्रेत्यांजवळील युरीयाचा साठा विक्री झाला आहे. मात्र ग्राहकी असल्याने तसेच शेतकरी सुध्दा गरजेपोटी जादा पैसे देत असल्याने मोठय़ा खतविक्रेत्यांकडून जादा भावाने आणून युरीयाची विक्री केल्या जात आहे.