शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जामठी येथे ८.५० काेटींचे प्राथमिक आराेग्य केंद्र मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST

बुलडाणा : मासरुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जामठी येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून ८.५० कोटी ...

बुलडाणा : मासरुळ जिल्हा परिषद मतदारसंघातील जामठी येथे खास बाब म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्राला मंजुरी मिळाली असून ८.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी दिली आहे. त्यामुळे जामठीसह पंचक्रोशीतील नागरिकांच्या आरोग्य समस्येची चिंता मिटणार आहे.

मासरूळ हे मोठे गाव असतानाही याठिकाणी आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहे. त्यामुळे कुटुंब नियोजन व अन्य शस्त्रक्रिया आणि आजारी नागरिकांना तालुका मुख्यालयी जावे लागत होते. त्यातून मार्ग काढण्यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी खासदार प्रतापराव जाधव, आमदार संजय गायकवाड व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा कमल बुधवंत यांच्या माध्यमातून मंत्रालय स्तरावर वारंवार पाठपुरावा केला. या पाठपुराव्याचे फलित सकारात्मक स्वरूपात समोर आले असून जामठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाने १३ ऑगस्ट २०२१ रोजी याविषयी शासन आदेश जारी केला आहे़ या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे जामठी (लोकसंख्या अंदाजे ४०००), शेकापूर (लोकसंख्या अंदाजे ४००), पांगरखेड (६००), सोयगाव(२०००), तराडखेड (४०००), मासरूळ (७५००), डोमरूळ ( २२००), टाकळी (६००), कुंबेफळ (२१००), वरूड (३२००), सातगाव ( ४५००), धामणगाव (लोकसंख्या अंदाजे ३५००) या बारा गावांतील नागरिकांना आरोग्याच्या सुविधा परिसरात उपलब्ध होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या प्राथमिक आरोग्य केंद्रावर एमबीबीएस अथवा समकक्ष दर्जाचे डॉक्टर, नर्स व इतर स्टाफ सुद्धा प्रशासकीय इमारत उभी राहिल्यानंतर लगेच कार्यान्वित होणार असून, त्यांच्या निवासाची व्यवस्थादेखील याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरात होणार आहे. त्यामुळे रात्री-बेरात्री सुद्धा वैद्यकीय कारणासाठी नागरिकांना इतर ठिकाणी जाण्याची गरज पडणार नाही़

मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

कोरोना महामारी व पश्चिम महाराष्ट्रातील पुरामुळे आर्थिक संकटाचे मळभ दाटून आलेले असताना राज्यात विशेष बाब म्हणून केवळ जामठी येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यात आले़ तसेच त्यासाठी निधी सुद्धा लगेच दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे यांचे आभार शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवंत यांनी मानले.