शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरात द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:36 IST

चिखली : जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेस मंजुरात देण्यात यावी, अशी मागणी माजी उदयोग मंत्री ...

चिखली : जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असलेल्या पेनटाकळी प्रकल्पाच्या चतुर्थ प्रशासकीय मान्यतेस मंजुरात देण्यात यावी, अशी मागणी माजी उदयोग मंत्री भारत बोंद्रे यांनी एका निवेदनाव्दारे जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे केली आहे.

यांसदर्भाने दिलेल्या निवेदनात भारत बोंद्रे यांनी नमूद केले आहे की, पेनटाकळी प्रकल्प हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प असून या प्रकल्पावर चौदा हजार हेक्टर सिंचन अपेक्षित आहे. प्रकल्पाचे १०० टक्के काम पूर्ण झाले असून कालव्यांची देखील ९५ टक्के कामे पूर्ण झालेली आहेत. प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रातील चिखली तालुक्यातील मौजे घानमोड, मानमोड, देवदरी तसेच पांढरदेव येथील पुनर्वसनाची कामे अपूर्ण आहेत. सदर प्रकल्पाचा ४१६ कोटी रुपयांचा सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव देखील सादर करण्यात आला आहे; मात्र, त्यास अद्यापही मान्यता देण्यात आलेली नाही. त्यामुळे वरील बुडित क्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी व कालव्यांची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेस मंजुरी आवश्यक आहे. याची दखल घेत प्रकल्पाच्या प्रशासकीय मान्यतेस मंजुरी प्रदान करण्यात यावी अशी मागणी भारत बोंद्रे यांनी ना.जयंत पाटील यांची बुलडाणा दौऱ्यादरम्यान प्रत्यक्ष भेट घेऊन केली आहे. यावेळी वल्लभराव देशमुख, शंतनु बोंद्रे, नंदू आंभोरे, रवि तांबट, रवि जाधव, शिवाजी वाघमारे, विलास वसु, अशोक पाटील, भागवत काकडे, रवि डाळीमकर, अनिल जाधव, अमोल जाधव, मदन वाघ, रवि घाडगे, अच्युतराव पाटील, बबन जाधव, बंडू जाधव, सुभाष जाधव, बबलु वाघ, अनिमन्यू जाधव, सुखदेव पाटील, वसंता पाटील, गजानन जाधव, संतोष जाधव, रामु झिने, शेख आझम, निबराव देशमुख, शेनफडराव धुबे आदींहस राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.