शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जनावरे दगावलीत, आता पुराने वेढले

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील पाच घरे वाहुन गेलीत, शेतजमीन खरडल्यात.

बळीराम वानखडे / खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावात नैसर्गिक संकटाने चांगलीच दहशत पसरविली आहे. या गावातील शेकडो जनावरे दगावल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच, आज पुन्हा गावात पावसाचा कहर झाला. पहाटे झालेल्या अतवृष्टीमुळे गावातील नदीला पूर आल्याने गावातील पाच घरे वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्‍यांची शेती खरडून गेली.जुलै महिन्याच्या अखेरीस अचानक आलेल्या अतवृष्टीमुळे या गावातील पशु पालकांची १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली होती. गावातील तानाजी शिंगाडे या एकाच शेतकर्‍यांची ६0 जनावरे दगावली होती. त्याचप्रमाणे गोपाल हटकर यांच्याही २२ जनावरांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून गावातील नागरिक कसेबसे सावरले असतानाच, आज पुन्हा अतवृष्टीने कहर केला. परिसरात झालेल्या अतवृष्टीमुळे गावातून जाणार्‍या नाल्याला पूर आला. या पुरात लक्ष्मण अशोक अडागळे, अजय अशोक अडागळे, गोपाल हरी अडागळे, सुखदेव नामदेव अडागळे, निमाबाई भगत या नागरिकांची घरे वाहून गेली. निमाबाई भगत या विधवा महिलेच्या घरी तिची डिलेव्हरी झालेली मुलगी एकटीच असताना, घराला पुराने वेढा घातला. या महिलेची कशीबशी सुटका करून गावकर्‍यांनी तिला चिमुकल्यासह ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत आसरा दिला. लक्ष्मण अडागळे यांच्या घरातील चार हजार रूपये रक्कमेसह संपूर्ण भांडीकुंडीही पुरात वाहून गेली आहे. घर वाहून गेल्याने या कुंटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. नदीला पहाटे पूर आल्याने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी मोठय़ाप्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्याचप्रमाणे गोपाल हटकर, तानाजी शिंगाडे, अशोक हटकर, पंढरी राऊत, निंबाजी शिंगाडे, महादेव खंडारे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची शेती खरडून गेली. गोपाल हटकर यांच्या रस्त्यावरील शेतातील कपाशीसोबतच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तानाजी शिंगाडे या युवा शेतकर्‍याच्या बागायती शेतातील संत्र्याची व डाळींबाची झाडे वाहून गेली आहेत. पंढरी राऊत यांच्या शेतातील नाशिक कांद्यासह दीड एकर कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.*तांत्रिक आधार नसलेली पध्दत अडचणीचीखामगाव तालुक्यातील पर्जन्यमान मोजण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बिल्डींगवर आकाशातून पडणार्‍या पाण्याची साठवणूक करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रात पाणी साचल्यानंतर बाजार समितीतील कोणताही एक कर्मचारी ते पाणी काचेच्या नळीत टाकतो. या नळीत मोजमाप केल्यानंतर पाण्याची आकडेवारी ठरविण्यात येते. पर्जन्यमापक यंत्र नसलेल्या परिसरात पाऊस झाल्यास याची नोंद इथे होत नाही. थोडक्यात या इमारतीच्या परिसरात पडणारा पाऊस म्हणजेच तालुक्यातील पावसाची सरासरी ठरविण्यात येते. त्यामुळे कोणताही तांत्रिक आधार नसलेली ही पद्धत परिसरातील नागरिकांच्या मुळावर उठली आहे. शिरसगाव देशमुख, अंत्रज, गोंधनापूर, वाघळी, गारडगाव, हिवरखेड परिसरात अतवृष्टी झाल्यानंतरही शहरात केवळ १६ मिमी पावसाची नोंद झाली होती. हीच आकडेवारी शासकीय आकडेवारी ठरत आहे.