शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
3
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
4
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
5
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
6
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
7
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
8
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
9
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
10
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
11
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
12
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
13
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
14
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
15
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
16
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
17
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
18
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
20
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली

जनावरे दगावलीत, आता पुराने वेढले

By admin | Updated: August 31, 2014 23:53 IST

खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावातील पाच घरे वाहुन गेलीत, शेतजमीन खरडल्यात.

बळीराम वानखडे / खामगाव तालुक्यातील हिवरखेड या गावात नैसर्गिक संकटाने चांगलीच दहशत पसरविली आहे. या गावातील शेकडो जनावरे दगावल्याच्या वृत्ताची शाई वाळत नाही तोच, आज पुन्हा गावात पावसाचा कहर झाला. पहाटे झालेल्या अतवृष्टीमुळे गावातील नदीला पूर आल्याने गावातील पाच घरे वाहून गेली. त्याचप्रमाणे अनेक शेतकर्‍यांची शेती खरडून गेली.जुलै महिन्याच्या अखेरीस अचानक आलेल्या अतवृष्टीमुळे या गावातील पशु पालकांची १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली होती. गावातील तानाजी शिंगाडे या एकाच शेतकर्‍यांची ६0 जनावरे दगावली होती. त्याचप्रमाणे गोपाल हटकर यांच्याही २२ जनावरांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून गावातील नागरिक कसेबसे सावरले असतानाच, आज पुन्हा अतवृष्टीने कहर केला. परिसरात झालेल्या अतवृष्टीमुळे गावातून जाणार्‍या नाल्याला पूर आला. या पुरात लक्ष्मण अशोक अडागळे, अजय अशोक अडागळे, गोपाल हरी अडागळे, सुखदेव नामदेव अडागळे, निमाबाई भगत या नागरिकांची घरे वाहून गेली. निमाबाई भगत या विधवा महिलेच्या घरी तिची डिलेव्हरी झालेली मुलगी एकटीच असताना, घराला पुराने वेढा घातला. या महिलेची कशीबशी सुटका करून गावकर्‍यांनी तिला चिमुकल्यासह ग्रामपंचायत कार्यालयातील एका खोलीत आसरा दिला. लक्ष्मण अडागळे यांच्या घरातील चार हजार रूपये रक्कमेसह संपूर्ण भांडीकुंडीही पुरात वाहून गेली आहे. घर वाहून गेल्याने या कुंटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. नदीला पहाटे पूर आल्याने कोणतीही जिवित हानी झाली नसली तरी मोठय़ाप्रमाणात वित्तहानी झाली आहे. त्याचप्रमाणे गोपाल हटकर, तानाजी शिंगाडे, अशोक हटकर, पंढरी राऊत, निंबाजी शिंगाडे, महादेव खंडारे यांच्यासह अनेक शेतकर्‍यांची शेती खरडून गेली. गोपाल हटकर यांच्या रस्त्यावरील शेतातील कपाशीसोबतच सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे तानाजी शिंगाडे या युवा शेतकर्‍याच्या बागायती शेतातील संत्र्याची व डाळींबाची झाडे वाहून गेली आहेत. पंढरी राऊत यांच्या शेतातील नाशिक कांद्यासह दीड एकर कपाशी पिकाचे नुकसान झाले आहे.*तांत्रिक आधार नसलेली पध्दत अडचणीचीखामगाव तालुक्यातील पर्जन्यमान मोजण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एका बिल्डींगवर आकाशातून पडणार्‍या पाण्याची साठवणूक करणारे यंत्र बसविण्यात आले आहे. या यंत्रात पाणी साचल्यानंतर बाजार समितीतील कोणताही एक कर्मचारी ते पाणी काचेच्या नळीत टाकतो. या नळीत मोजमाप केल्यानंतर पाण्याची आकडेवारी ठरविण्यात येते. पर्जन्यमापक यंत्र नसलेल्या परिसरात पाऊस झाल्यास याची नोंद इथे होत नाही. थोडक्यात या इमारतीच्या परिसरात पडणारा पाऊस म्हणजेच तालुक्यातील पावसाची सरासरी ठरविण्यात येते. त्यामुळे कोणताही तांत्रिक आधार नसलेली ही पद्धत परिसरातील नागरिकांच्या मुळावर उठली आहे. शिरसगाव देशमुख, अंत्रज, गोंधनापूर, वाघळी, गारडगाव, हिवरखेड परिसरात अतवृष्टी झाल्यानंतरही शहरात केवळ १६ मिमी पावसाची नोंद झाली होती. हीच आकडेवारी शासकीय आकडेवारी ठरत आहे.