शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

अंगणवाड्यांना कच्च्या धान्याचा पुरवठाच नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 16:10 IST

अंगणवाडीत कच्चे धान्य पोहोचलेच नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे.

अनिल गवई।लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: खामगाव तालुक्यातील विविध अंगणवाड्यांसह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या अंगणवाडीत कच्चे धान्य पोहोचलेच नसल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर येत आहे. तर काही ठिकाणी ५० दिवसांच्या किटऐवजी खुली पाकीटं वितरीत केल्या जात आहे. त्यामुळे अनेक लाभार्थी कच्च्या धान्यांपासून वंचित असल्याचे दिसून येते.अंगणवाडी मधील ०६ महिने ते ०३ वर्ष वयोगटातील लाभार्थी, गरोदर व स्तनदा माता तसेच कमी वजनाची बालके आणि ११ ते १४ वर्ष वयोगटातील कुमारवयीन मुलींना लाभार्थी निहाय सीलबंद पाकीटमध्ये कच्चे धान्य पुरवठा करण्यासाठी शासनाने ३० मार्च २०१९ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. यासाठी लाभार्थी निहाय पाककृती निश्चित करून महाराष्ट्र कन्झुमर्स फेडरेशनला पर्यायी व्यवस्थेतंर्गत कंत्राट देण्यात आला आहे. फेडरेशनने यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळे कंत्राटदार नियुक्त केले आहेत. मात्र, या कंत्राटदारांकडून नियमित कच्चे धान्यांचा पुरवठा केला जात नसल्याचे दिसून येते. आयुक्तांच्या ३० मार्च २०१९ च्या आदेशानुसार १५ आॅगस्ट २०१९ पर्यंत ३ वेळा म्हणजे माहे मे/जून (५० दिवस), जुलै/ आॅगस्ट (५० दिवस) आणि सप्टेंबर/ आॅक्टोंबर (५० दिवस) अशा एकुण १५० दिवसांसाठी प्रत्येक लाभार्थ्यांना, त्यांच्या गटानुसार माहे मे -२०१९ पासून आतापर्यंत ३ वेळा म्हणजेच १५० दिवसांचे कच्चे धान्य मिळणे आवश्यक होते. मात्र, खामगावसह अनेक तालुक्यात पूर्ण मालाचे वितरण झालेले नाही. तसेच वितरीत केल्या जाणाऱ्या धान्यांबाबत आदेशाची प्रत मंगळवारी खामगाव येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयात मिळून आली नाही. तसेच पुरवठा करण्यासंदर्भात कोणतेही लेखी निर्देश प्राप्त झाले नाही. तसेच माहे सप्टेंबर/ आॅक्टोबरचा पुरवठा पूर्ण झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली. तसेच येत्या १-२ दिवसांत खामगाव तालुक्यातील सर्वच अंगणवाडीत माल पोहोचणार असल्याचे सुत्रांनी सांगितले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाकडून आयुक्तांनी ठरवून दिलेल्या मालाचे प्रमाण आणि पॅकींगबाबत कमालिची गुप्तता पाळल्या जात असल्याचे दिसते.असे आहे लाभार्थी निहाय धान्य वितरण!०६ महिने ते ३ वर्ष लाभार्थी करीता ५० दिवसांसाठी १ मोठी सीलबंद पिशवी देणे आवश्यक आहे. यात गहू-२.९५० किलो, मसूरडाळ-७५० ग्राम, मुगडाळ- ६६९ ग्राम, मिरची पावडर -२०० ग्राम, हळद-२०० ग्राम, मीठ ४०० ग्राम, सोयाबीन तेल- ५०० ग्राम, चवळी-७५० ग्राम, मटकी-६५० ग्राम याप्रमाणे मोठ्या सीलबंद पिशवीमध्ये एकुण ७ किलो ५० ग्राम कच्चे धान्य देण्याची तरतूद आहे.गरोदर स्त्रीया व स्तनदा माता आणि किशोर वयीन मुलींकरीता - गहू ३.७७५ किलो, मसुरडाळ-९५० ग्राम, मूगडाळ-८२५ ग्राम, मिरची पावडर-२०० ग्राम, हळद- २०० ग्राम, मीठ ४०० ग्राम, सोयाबीन तेल- ५०० ग्राम, चवळी- १ किलो, मटकी- ८२५ ग्राम मिळणे क्रमप्राप्त आहे.

खामगाव तालुक्यातील किती अंगणवाड्यांमध्ये कच्च्या धान्यांचा पुरवठा झालेला नाही. याबाबत पर्यवेक्षकांकडून आढावा घेण्यात आलेला नाही. आढावा घेतल्यानंतर सविस्तर माहिती दिली जाईल.- यु.डी. देशमुखबालविकास प्रकल्प अधिकारी, खामगाव.

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगाव