शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

२ हजारांवर अंगणवाड्यांना पोषण आहाराची प्रतीक्षा! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 00:05 IST

बुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या  अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू  आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण  आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार  ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये  पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.  सध्या जिल्ह्यातील २0 टक्केच अंगणवाड्यांमध्ये पोषण  आहार शिजत असल्याने अद्याप २ हजार १६२  अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराची प्रतीक्षा  आहे. 

ठळक मुद्देसंप काळात आहार सुरू ठेवण्यासाठी प्रयत्नअवघ्या ५७२ अंगणवाड्यात पोषण आहार 

ब्रम्हानंद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या  अंगणवाडी सेविका व मदतनिसांचा राज्यव्यापी संप सुरू  आहे. त्यामुळे या संप काळात अंगणवाडी केंद्राचा पोषण  आहार विनाखंडित सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील २ हजार  ७६४ अंगणवाड्यांपैकी अवघ्या ५७२ अंगणवाड्यांमध्ये  पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे.  सध्या जिल्ह्यातील २0 टक्केच अंगणवाड्यांमध्ये पोषण  आहार शिजत असल्याने अद्याप २ हजार १६२  अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहाराची प्रतीक्षा  आहे. अंगणवाडी केंद्राचे मानधन, कर्मचार्‍यांच्या रिक्त जागा,  सेवानवृत्ती यासह विविध कारणांमुळे राज्यातील अंगणवाडी  केंद्राच्या सेविका व मदतनीस यांनी संप पुकारला आहे.  यामध्ये जिल्ह्यातील सर्वच अंगणवाडी सेविका, मदतनीस  यांचा सहभाग आहे. या संपामुळे सहा वर्षांंपर्यंंतची बालके,  गरोदर महिला, स्तनदा माता व किशोरी मुलींच्या आहार  पोषण व आरोग्यसेवा विषयीच्या विविध सेवांच्या  अंमलबजावणीवर परिणाम झाला आहे; परंतु केंद्र  शासनाच्या धोरणानुसार कुठल्याच परिस्थितीत  अंगणवाडी  केंद्रातील बालकांचा पोषण आहार बंद ठेवता येत नाही.  त्यामुळे अंगणवाडी केंद्रात पोषण आहार विनाखंडित सुरू  ठेवण्यासाठी बालकल्याण विभागाकडून तात्पुरती व्यवस्था  करण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहरी भागातील २५४  अंगणवाड्यांपैकी २२ अंगणवाड्यांमध्ये बचत गटामार्फत  पोषण आहाराची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच  ग्रामीण भागातील २ हजार ५१0 अंगणवाड्यांपैकी ५५0  अंगणवाड्यांमध्ये आशा वर्कर, महिला बचत गट, शालेय  पोषण आहार आदींच्या माध्यमातून पोषण आहाराची व्यवस् था करण्यात आली आहे. अशा प्रकारे शहरी व ग्रामीण भागातील एकूण २ हजार ७६४  अंगणवाड्यांपैकी ५७२ अंगणवाड्यांमध्ये महिला व  बालविकास विभागाने शासनाच्या इतर विभागातील नागरी व  ग्रामीण स्थानिक कर्मचार्‍यांच्या साहाय्याने पोषण आहार  विनाखंड सुरळीत चालू केला आहे; मात्र अद्यापही ८0 टक्के  अंगणवाड्यांमधील पोषण आहार सुरळीत चालू झाला नाही.  त्यामुळे जिल्ह्यातील २ हजार १६२ अंगणवाड्यांमधील  हजारो बालकांना पोषण आहारापासून वंचित राहावे लागत  आहे. 

आजपासून १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये होणार आहार सुरूजिल्ह्यातील शहरी भागातील २५४ अंगणवाड्यांपैकी २२  अंगणवाड्यांमध्ये पोषण आहाराची तात्पुरती व्यवस्था  करण्यात आली आहे; मात्र सोमवारपासून १00 टक्के  अंगणवाड्यांमध्ये आहार विनाखंडित सुरू करण्यात येणार  आहे, तसेच ग्रामीण भागातील सर्व अंगणवाड्यांमध्येसुद्धा  दोन दिवसांत बचत गट, आशा वर्करच्या माध्यमातून  आहाराची व्यवस्था करण्यात येणार आहे. 

आहार पुरवठय़ासाठी यांचा घेतला जातो सहभागअंगणवाडी सेविका व मदनीस यांच्या संप काळात  अंगणवाडी केंद्रातील पोषण आहार सुरळीत राहावा, यासाठी  आशा कर्मचारी किंवा महिला बचत गटावर आहार वाटपाची  जबाबदारी देण्याचे आदेश आहेत; मात्र आशा कर्मचारी  किंवा महिला बचत गटांकडून आहार पुरवठा उपलब्ध होत  नसल्यास त्या कार्यक्षेत्रातील इतर महिला बचत गट,  माध्यमिक शाळेतील मध्यान्ह भोजन पुरविणारी संस्था,  आश्रमशाळेतील भोजन पुरवठा करणारी संस्था किंवा स् थानिक आहार पुरवठादाराची तात्पुरत्या स्वरूपात आहार  देण्यासाठी ग्राम समिती पुरवठादाराची निवड करून त्यांचा  सहभाग आहार वाटपासाठी घेतला जातो. 

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या संप काळात  अंगणवाडी केंद्रावर आहार सुरळीत ठेवण्यासाठी महिला व  बालविकास विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.  जिल्ह्यातील १00 टक्के अंगणवाड्यांमध्ये सोमवारपासून  आहार सुरळीत करण्यात येईल. - सी.बी. चेके,उपमुख्य कार्यकारी अधिकारी,बालविकास, बुलडाणा.