शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

..तर शिवसेनाही मध्यावधीसाठी तयार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 15, 2017 20:15 IST

शेगाव (जि. बुलडाणा) :मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (जि. बुलडाणा) : मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवायचा असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. गुरुवार, १५ जून रोजी शेगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘साले’ म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो, अशी प्रार्थना आपण संत गजानन महाराजांकडे केली असल्याचे सांगत, कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, शेतकरी कर्जमुक्त नाही झाला, तर राज्यात भूकंप येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडत आलो; पण त्याचे कधीही राजकारण शिवसेना करीत नाही. शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते. हाच शिवसेनेचा पिंड आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे, असे शिवसेनेच्या बाबतीत कधी होत नाही. शिवसेना विघ्नसंतोषी नाही, पाप करणाऱ्यांची औलादही शिवसेनेत नाही, शेतकऱ्यांचा विश्वासघात करून राजकीय पोळी शेकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. पत्र परिषदेला शिवसेना उपनेते अरविंद सावंत, ना. रामदास कदम, ना. दिवाकर रावते, खा. प्रतापराव जाधव, खा. भावना गवळी, आ.गुलाबराव पाटील, आ. संजय रायमुलकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. शशिकांत खेडेकर आदींची उपस्थिती होती. ...तर मुहूर्ताची वाट पाहणार नाही!सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली, तर पाच वर्ष हे सरकार पडू देणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, कर्जमाफीची घोषणा करून त्याची दिशाभूल केली जात असेल, तर शिवसेना राज्यात भूकंप घडवून आणेल. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. कर्जमुक्ती ही नोटाबंदीच्या पापाची परतफेड! नोटाबंदीमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणूस देशोधडीला लागला असून, यातून कोणाचा फायदा झाला ते आपल्याला माहीत नाही; मात्र नोटाबंदीच्या या पापाची परतफेड शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीतून करावी लागल्याची बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. शेगाव येथे गुरुवारी आयोजित शिवसेनेच्या भव्य शेतकरी व पदाधिकारी मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. तत्त्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पूर्णत: अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.