शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

..तर शिवसेनाही मध्यावधीसाठी तयार - उद्धव ठाकरे

By admin | Updated: June 15, 2017 20:15 IST

शेगाव (जि. बुलडाणा) :मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव (जि. बुलडाणा) : मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप तयार असल्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चांगलाच समाचार घेतला. शेतकरी कर्जमाफीचा विषय बाजूला ठेवायचा असल्यानेच मुख्यमंत्र्यांनी मध्यावधी निवडणुकांचा विषय काढला असल्याचा टोला हाणत, शिवसेना मध्यावधीसाठी तयार असल्याचा इशारा त्यांनी शेगावात आयोजित पत्रकार परिषदेत दिला. गुरुवार, १५ जून रोजी शेगाव येथे शिवसेनेच्या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरे म्हणाले, की ‘साले’ म्हणणाऱ्यांना शेतकरी रडवल्याशिवाय राहणार नाही. सरकारने जी कर्जमुक्तीची घोषणा केली आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची ताकद आणि बुद्धी सरकारला देवो, अशी प्रार्थना आपण संत गजानन महाराजांकडे केली असल्याचे सांगत, कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत मुख्यमंत्र्यांचे मनसुबे पूर्ण होऊ देणार नाही, शेतकरी कर्जमुक्त नाही झाला, तर राज्यात भूकंप येईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही वेळोवेळी मांडत आलो; पण त्याचे कधीही राजकारण शिवसेना करीत नाही. शिवसेना सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडते. हाच शिवसेनेचा पिंड आहे. ओठात एक आणि पोटात दुसरे, असे शिवसेनेच्या बाबतीत कधी होत नाही. शिवसेना विघ्नसंतोषी नाही, पाप करणाऱ्यांची औलादही शिवसेनेत नाही, शेतकऱ्यांचा विश्वासघात करून राजकीय पोळी शेकणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिक समर्थ आहे, असे प्रतिपादन उद्धव ठाकरे यांनी केले. पत्र परिषदेला शिवसेना उपनेते अरविंद सावंत, ना. रामदास कदम, ना. दिवाकर रावते, खा. प्रतापराव जाधव, खा. भावना गवळी, आ.गुलाबराव पाटील, आ. संजय रायमुलकर, आ. गोपीकिशन बाजोरिया, आ. शशिकांत खेडेकर आदींची उपस्थिती होती. ...तर मुहूर्ताची वाट पाहणार नाही!सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक केली, त्यांना कर्जमाफी प्रामाणिकपणे मिळवून दिली, तर पाच वर्ष हे सरकार पडू देणार नाही. मात्र, शेतकऱ्यांची फसवणूक होत असेल, कर्जमाफीची घोषणा करून त्याची दिशाभूल केली जात असेल, तर शिवसेना राज्यात भूकंप घडवून आणेल. यासाठी कोणत्या मुहूर्ताची वाट पाहणार नाही, असा गर्भित इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला. कर्जमुक्ती ही नोटाबंदीच्या पापाची परतफेड! नोटाबंदीमुळे शेतकरी व सर्वसामान्य माणूस देशोधडीला लागला असून, यातून कोणाचा फायदा झाला ते आपल्याला माहीत नाही; मात्र नोटाबंदीच्या या पापाची परतफेड शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीतून करावी लागल्याची बोचरी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केली. शेगाव येथे गुरुवारी आयोजित शिवसेनेच्या भव्य शेतकरी व पदाधिकारी मेळाव्यास संबोधित करताना ते बोलत होते. तत्त्वत: कर्जमाफीवर आमचा विश्वास नाही. जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नाही आणि कर्जमाफीची पूर्णत: अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.