शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची मात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

सध्या राज्यात कोविड - १९ साथरोग संसर्गाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहे. खरिप हंगाम २०२१ ...

सध्या राज्यात कोविड - १९ साथरोग संसर्गाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध जाहीर केले आहे. खरिप हंगाम २०२१ मध्ये बियाणे, खते व किटकनाशकांच्या गुणवत्ता व पुरवठ्याबाबत राज्यातील शेतकरी, उत्पादक, वाहतुकदार, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या अडचणीचे निवारण करण्याकरीता राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरावर जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय व कृषी विभाग जिल्हा परिषद येथे नियंत्रण कक्ष स्थापीत करण्यात आला आहे. या नियंत्रण कक्षाशी २४ तास संपर्क साधता येणार आहे. संपर्कासाठी कृषी विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० देण्यात आला आहे. सोबत अडचण किंवा तक्रार ऑनलाइन पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ई -मेल वर येणाऱ्या अडचणी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिकिंग बाबत असलेल्या तक्रारी नोंदवताना आपले नाव, पत्ता संपर्क क्रमांक थोडक्यात किंवा ही माहिती कोऱ्या कागदावर लिहून त्याचा छायाचित्र व्हॉट्सॲप किंवा ई - मेलवर पाठवल्यास तक्रारींचे निराकरण करणे सोयीस्कर होईल, ज्या शेतकऱ्यांना व्हॉट्सॲप वापर करणे शक्य नसेल त्यांनी भ्रमणध्वनी वर तोंडी तक्रार नोंदवाव्यात, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

ऑनलाइन तक्रारीची सुविधा

अनेक शेतकऱ्यांना पेरणीच्या तोंडावर खत किंवा बियाणे मिळत नाही. कृषी केंद्रावर शेतकऱ्यांना अडचणी येतात. निकृष्ठ बियाण्यांचा प्रश्न असतो. त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केल्याने त्यांचा चांगला उपयोग शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच ऑनलाइन तक्रारीची शेतकऱ्यांना करता येणार आहेत.

काय म्हणतात शेतकरी

खरीप हंगामाच्या पेरणीच्या काळात शेतकऱ्यांना अनेक अडचणी येतात. परंतू आता शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केल्याने त्याचे सकारात्मक परिणामच समोर येतील.

संतोष लाटे, शेतकरी.

शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे, मात्र त्याठिकाणी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनही व्हायला पाहिजे. तक्रारींचा नुसता ढीग साचायला नको. त्यावर योग्य अंमलबजावणी होणे अपेक्षीत आहे.

नामदेवराव जाधव, शेतकरी नेते.