शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : जम्मूमध्ये अलर्ट, जोधपूरमध्ये शाळा बंद! सीमेवर लष्कर सतर्क; हवाई संरक्षण युनिट्स सक्रिय केल्या
2
“भारत-पाकने संयम राखावा”; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर रशियाशी युद्ध करत असलेल्या युक्रेनचे आवाहन
3
"हम अल्लाह की कसम खाते है...."; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर अल कायदाची भारताला धमकी
4
Operation Sindoor: भारताचा एक घाव अन् उरले भग्न अवशेष! मसूद अजहरच्या अड्ड्याचे सॅटेलाईट फोटो
5
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
6
भारत, पाकिस्तानात जाऊ नका; अमेरिका, चीनसह बड्या देशांनी दिल्या नागरिकांना सूचना
7
Asim Munir Net Worth: रियल इस्टेट, बँक, डेअरी... कंगाल पाकिस्तानचे सेना प्रमुख १०० कंपन्यांचे CEO; किती आहे संपत्ती?
8
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
9
मनसेशी युती केली तर उद्धवसेनेला बळ? ठाकरेंना शह देणे महायुतीला जाईल जड; राजकीय गणिते बदलणार
10
कोहलीने दिला हात, अनुष्का थेट दुर्लक्ष करुन पुढे गेली; 'विरुष्का'चा बंगळुरुमधील Video व्हायरल
11
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹८९,९८९ चं फिक्स व्याज; मिळेल सरकारची गॅरेंटी
12
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
13
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
14
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
15
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
16
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
17
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
18
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
19
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!

राज्यातील आठ लाखांवर शिधापत्रिकांबाबत संदिग्धता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:34 IST

अनिल गवई लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा: पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धान्याची उचल न करणा-या तब्बल ७.९० लक्ष शिधापत्रिका शासनाच्या ...

अनिल गवई

लोकमत न्यूज नेटवर्क

बुलडाणा: पाच महिन्यांपेक्षा अधिक कालावधीपासून धान्याची उचल न करणा-या तब्बल ७.९० लक्ष शिधापत्रिका शासनाच्या रडारवर आहेत. क्षेत्रीय स्तरावर तपासणी होईपर्यंत या शिधापत्रिका धान्य उचलण्यासाठी अपात्र ठरविण्यात येणार आहे. त्यामुळे शिधापत्रिकाधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.

सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत राज्यात (एईपीओएस) प्रणालींतर्गत संगणकीकृत केलेल्या शिधापत्रिकेवरील लाभार्थींनी ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या पाच महिन्यांच्या कालावधीत धान्याची उचल केलेली नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्यातील ७ लक्ष ९५ हजार १६८ शिधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या तपासणीअंती या शिधापत्रिकाबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येणार आहे.

चौकट...

अपात्र, बोगस, अनिच्छुकचा बसणार शिक्का!

पाच महिन्यांपासून धान्याची उचल न करणा-या शिधापत्रिकांची क्षेत्रीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे. यासाठी राज्यातील ७.९० लक्ष शिधापत्रिका संबंधित शिधावाटप निरीक्षकांच्या लॉगीनमध्ये वळत्या केल्या जातील. त्यानंतर अपात्र, बोगस, अनिच्छुक अशी शिधापत्रिकांची वर्गवारी केली जाईल.

चौकट...

ई-पॉसबाबत साशंकता!

राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आलेल्या ई-पॉस मशीनमध्ये अनेकदा तांत्रिक अडचण निर्माण होते. लाभार्थींचे थंब लागत नाही. २-जी नेटवर्क प्रणालीमुळे नेटवर्कचा खोळंबा निर्माण होतो. त्यामुळे आधार लिकिंग असतानाही लाभार्थी धान्यापासून वंचित राहतात. त्यामुळे शासन स्तरावर केल्या जाणा-या क्षेत्रीय स्तरावरील तपासणीबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

चौकट...

पोर्टिबिलिटीसाठी तरतूद आवश्यक!

केंद्र आणि राज्य शासनाकडून ‘वन नेशन वन रेशनकार्ड’ या प्रणालीचा विचार केल्या जात आहे; मात्र पोर्टिबिलीटीसाठी खातरजमा न करताच प्रणाली अस्तित्वात आणल्या जात आहे. संबंधित रेशन दुकानदाराकडे धान्य शिल्लक आहे की नाही, त्याने मागील महिन्यात उचल न केलेल्या धान्याबाबत पारदर्शकतेची तरतूद असणे आवश्यक आहे.

---

चौकट...

अनेकांनी केली नाही धान्याची उचल!

मुंबई आणि लगतच्या जिल्ह्यातील सर्वाधिक शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही. यामध्ये ठाणे १ लक्ष १५ हजार ९०४, वडाळा ८७ हजार १८२, पालघर ४२ हजार ०४, तर नाशिक जिल्ह्यातील ३६ हजार ८३७ शिधापत्रिकाधारकांनी गत पाच महिन्यांत धान्याची उचल केलेली नाही.

----

पश्चिम विदर्भात ४० हजार शिधापत्रिका

पश्चिम विदर्भातील अकोला, वाशिम आणि बुलडाणा जिल्ह्यातील ३९ हजार २२७ हजार शिधापत्रिकाधारकांनी धान्याची उचल केलेली नाही. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील १८ हजार १४३, अकोला जिल्ह्यातील १५ हजार ५०१ तर वाशिम जिल्ह्यातील ५ हजार ५८३ शिधापत्रिकांचा समावेश आहे.

------------