शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:33 IST

देऊळगाव राजा : एकीकडे कोरोनाचे संकट असताना त्यातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ ...

देऊळगाव राजा : एकीकडे कोरोनाचे संकट असताना त्यातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली असून याचा फटका प्रत्येकाला बसत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशा संकटाच्या काळात त्यास आर्थिक हातभार लावणे गरजेचे असताना अद्यापही बँकेने पीक कर्ज वाटपास सुरुवात केली नाही. त्यामुळे त्वरित पीक कर्ज वाटपास सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकरीवर्गाला कोरोनाव्यतिरिक्त अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामात व शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च निघणेही अवघड झालेले आहे. यातच केंद्र शासनाने खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. तथापि, कोरोना महामारीच्या संकटाविषयीचा प्रश्न समोर करून अद्यापपर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सुरुवात केली नाही. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहायला नको, तसेच अनेक शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबत फोनवर विचारणा करीत आहे. मात्र, त्यांना बँकेचे अधिकारी काहीच उत्तर देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सर्व बँक शाखेला आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात, तसेच गावनिहाय शेतकऱ्यांना बँकेत बोलावून अथवा गावनिहाय कॅम्पचे आयोजन करून त्वरित पीक कर्ज वाटपसंबंधीच्या प्रक्रियेस सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते आकाश जाधव यांनी केली आहे.