शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:38 IST

देऊळगाव राजा : एकीकडे कोरोनाचे संकट असताना त्यातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ ...

देऊळगाव राजा : एकीकडे कोरोनाचे संकट असताना त्यातच केंद्र सरकारने खतांच्या किमतीत वाढ केली आहे. पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठी वाढ झाली असून याचा फटका प्रत्येकाला बसत आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. अशा संकटाच्या काळात त्यास आर्थिक हातभार लावणे गरजेचे असताना अद्यापही बँकेने पीक कर्ज वाटपास सुरुवात केली नाही. त्यामुळे त्वरित पीक कर्ज वाटपास सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश जाधव यांनी केली आहे.

कोरोना महामारीच्या काळामध्ये शेतकरीवर्गाला कोरोनाव्यतिरिक्त अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ केली. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीकामात व शेतीमाल विक्रीला नेण्यासाठी अधिकचा पैसा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकासाठी केलेला खर्च निघणेही अवघड झालेले आहे. यातच केंद्र शासनाने खताच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली आहे. या दरवाढीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यात येते. तथापि, कोरोना महामारीच्या संकटाविषयीचा प्रश्न समोर करून अद्यापपर्यंत कोणत्याही बँकेने शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास सुरुवात केली नाही. एकही शेतकरी कर्जापासून वंचित राहायला नको, तसेच अनेक शेतकरी पीक कर्ज वाटपाबाबत फोनवर विचारणा करीत आहे. मात्र, त्यांना बँकेचे अधिकारी काहीच उत्तर देत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन सर्व बँक शाखेला आपल्या स्तरावरून सूचना द्याव्यात, तसेच गावनिहाय शेतकऱ्यांना बँकेत बोलावून अथवा गावनिहाय कॅम्पचे आयोजन करून त्वरित पीक कर्ज वाटपसंबंधीच्या प्रक्रियेस सुरुवात करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे युवा नेते आकाश जाधव यांनी केली आहे.