शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

कृषी विभाग ‘इलेक्शन मोड’वर : पीक नुकसानाची पाहणी रखडली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 14:43 IST

कृषी विभागाचे कर्मचारीही निवडणूक विषयक कामांमध्ये गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.

- देवेंद्र ठाकरेलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : सध्या सगळीकडे विधानसभा निवडणुकीचा माहोल आहे. कृषी विभागाचे कर्मचारीही निवडणूक विषयक कामांमध्ये गुंतले असल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांना सध्या निवडणूक विषयक कामांमध्ये सहभागी करून घेण्यात येत आहे.खामगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचारीही निवडणूक विषयक कामांचे प्रशिक्षण तसेच प्रत्यक्ष कामांमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे साहाजिकच शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गत १५ दिवसांपासून खामगाव तालुक्यात सातत्याने पाऊस पडला.पावसाचे प्रमाणही प्रचंड असल्याने शेकडो हेक्टरवरील पिके धोक्यात आली. उडदाचे पीक हातून गेले. त्यापाठोपाठ अनेक शेतांमध्ये सोयाबीन सडले. पहिल्या पेºयातील ज्वारी सध्या काळी पडण्याची भिती आहे. कपाशीच्या कैºया सडल्या असून उत्पादनात घट येणार आहे. अशा परिस्थितीत शेतकºयांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, या हेतूने पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानाचा सर्व्हे होणे अपेक्षित होते. काही शेतात कृषी विभागाचे कर्मचारीही गेलेही; परंतु या प्रक्रियेला वेग आलेला नाही.परिणामी शेतकºयांचे नुकसान होऊनही त्यांना मदत मिळण्याची आशा धुसर होताना दिसत आहे. खामगाव तालुक्यात विशेष करून पिंपळगाव मंडळामध्ये पावसाचे प्रमाण जास्त आहे.पिंपळगावराजा, भालेगाव, ढोरपगाव, काळेगावसह परिसरात मोठे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. तालुक्यात इतरही भागात पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे कृषी विभागाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे युद्धपातळीवर करावा व मदत मिळवून द्यावी, अशी मागणी शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!गत १५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खामगाव तालुक्यात सुमारे १२०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याबाबत कृषी विभागाशी संपर्क केला असता, नुकसान झालेल्या क्षेत्राची नक्की माहिती देता येणार नाही, असे सांगण्यात आले. तरी सुमारे १००० ते १२०० हेक्टरवर नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला आहे.

सध्या निवडणुकीच्या कामांमध्ये कृषी विभागाचे कर्मचारी गुंतले असले, तरी शेतकºयांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सोमवारपासून प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी करण्यात येईल. त्यानंतरच प्रत्यक्ष किती क्षेत्रावर नुकसान झाले, याची माहिती देता येईल.-गणेश गिरीतालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती