शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२१ हजार २३७ शेतकऱ्यांना दिला कृषी सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:36 IST

बुलडाणा : मागील काही दिवसांपासून येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना हवामान साक्षर करण्याचा वसा घेतला आहे. आतापर्यंत ...

बुलडाणा : मागील काही दिवसांपासून येथील जिल्हा कृषी हवामान केंद्राने शेतकऱ्यांना हवामान साक्षर करण्याचा वसा घेतला आहे. आतापर्यंत केंद्राने जिल्ह्यातील २१ हजार २३७ शेतकऱ्यांपर्यंत कृषी सल्ला पत्रिका पोहोचवली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी संवेदनक्षम हवामान बदलाशी समरस होत असल्याचे दिसून येत आहेत.

पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ व अकोला येथील कृषी विज्ञान केंद्रा अंतर्गत मागील दोन वर्षांपासून जिल्हा कृषी हवामान केंद्राने बुलडाणा जिल्ह्यातील २१ हजार २३७ शेतकऱ्यांपर्यंत आठवड्यातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिका तालुकानिहाय व पीकनिहाय पोहोचविली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना येणाऱ्या पाच दिवसांच्या हवामान अंदाजानुसार शेतातील उभ्या पिकांमध्ये करावयाची कामे, फवारणी, कीडरोग व्यवस्थापन, ओलीत करणे, खत व अन्नद्रव्य व्यवस्थापन, आंतरमशागत, पेरणीपद्धत, मुलस्थानी मृदा व जलसंवर्धन, माती परीक्षण, फळबाग व्यवस्थापन, कापणी व साठवणूक तसेच पशुसंवर्धन, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी संदर्भात कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तंत्रज्ञान योग्यवेळी पिकांची आवश्यकता लक्षात घेऊन पोहोचविले जाते. ज्यामुळे शेतकरी बांधव त्यांच्या शेतीचे अगदी सूक्ष्म व्यवस्थापन करू शकतात. याचा सकारात्मक परिणाम पीक उत्पादनात होऊन जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हवामान बदलाशी समरस होऊन शेती करताना दिसत आहे. जिल्ह्यातील एकूण एक शेतकरी संवेदनक्षम हवामान बदलाशी समरस व्हावा तसेच प्रत्येक शेतकऱ्याने हवामान आधारित कृषी सल्ला पत्रिकेचा अवलंब करून हवामान साक्षर होऊन आपल्या शेतीला शाश्वततेकडे न्यावे, असे आवाहन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले आहे.