शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
5
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
6
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
7
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
8
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
9
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
10
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
11
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
12
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
13
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
14
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
15
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
16
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
17
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
18
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
19
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या

तरुणाच्या आत्महत्येनंतर गावकर्‍यांचे आंदोलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 00:19 IST

चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे  तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकर्‍यांनी गावातील  अवैध दारूची दुकाने बंद करण्याकरिता १५ सप्टेंबर रोजी  तीव्र आंदोलन केले. जोपर्यंत दारूची दुकाने व धाबे बंद  करणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार  नसल्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतल्यावर पोलिसांनी दारू  दुकाने बंद करीत पोलीस पाटलाला निलंबित केले. 

ठळक मुद्देदारूबंदीची मागणीमाळशेंबा येथील पोलीस पाटील निलंबित 

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपळगाव सैलानी : चिखली तालुक्यातील माळशेंबा येथे  तरुणाने आत्महत्या केल्यानंतर गावकर्‍यांनी गावातील  अवैध दारूची दुकाने बंद करण्याकरिता १५ सप्टेंबर रोजी  तीव्र आंदोलन केले. जोपर्यंत दारूची दुकाने व धाबे बंद  करणार नाहीत, तोपर्यंत मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार  नसल्याची भूमिका गावकर्‍यांनी घेतल्यावर पोलिसांनी दारू  दुकाने बंद करीत पोलीस पाटलाला निलंबित केले.  सचिन वामन देशमुख (वय २८) याने राहत्या घरात  गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी रायपूर पोलीस  स्टेशनचे पोलीस कर्मचारी पंचनामा करण्यासाठी गेले असता  गावकर्‍यांनी व महिलांनी विरोध केला. सदर तरुण युवकाने  दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.  याला धाब्यावर अवैध दारू विक्री करणारे जबाबदार आहे.  धाबे चालविणार्‍यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही पंचनामा  करू देणार नाही, असा महिलांनी व गावकर्‍यांनी पवित्रा घे तला होता. दोन दिवसांपूर्वीच याच गावातील महिलांनी  माळशेंबा गावातील अवैध दारू विक्री बंद करावी, याचे  बुलडाणा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले होते. गावा तील वातावरण चिघळत चालल्यामुळे बुलडाणा पोलीस उ पविभागीय अधिकारी बी.बी. महामुनी, चिखली तहसीलदार  गायकवाड, रायपूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार जे.एन. सैयद,  चिखली पो.स्टे. ठाणेदार देशमुख, बुलडाणा दंगाकाबू पथक  यांनी माळशेंबा गावाकडे धाव घेऊन तेथील परिस्थिती  जाणून घेतली व या गावच्या परिसरातील सर्व धाब्यांची  तोडफोड करून धाबे बंद करण्यात आले. त्यानंतर गावातील  महिला व गावकर्‍यांशी सर्व अधिकार्‍यांनी संवाद साधून मृ तदेह खाली घेऊन पंचनामा केला. माळशेंबा गावाजवळील  सर्व रस्त्यांच्या दुतर्फा असलेली दुकाने बांधकाम विभागाने  तोडून टाकले. पुढील तपास रायपूर ठाणेदार जे.एन. सैयद व  त्यांचे पोलीस कर्मचारी करीत आहेत. 

आ. राहुल बोंद्रे यांची भेटमाळशेंबा येथे दारूच्या नशेत घरामध्ये तरुणाने गळफास  घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडताच गावकर्‍यांमध्ये  अवैध दारू विक्री करणारांच्या विरोधात आक्रोश निर्माण  झाला होता. या घटनेची माहिती मिळताच आमदार राहुल  बोंद्रे यांनी घटनास्थळावर जाऊन या घटनेची माहिती जाणून  घेतली व गावातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन  केले. या गावातील सर्व अवैध धंदे बंद केले जाईल, असे  आश्‍वासन आ.राहुल बोंद्रे यांनी महिला मंडळांना दिले.